शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने वाढणार, जिल्ह्यांकडून मागवले प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 17:19 IST

गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने करण्याचा विचार शासनस्तरावर सुरूपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांद्वारा जिल्हा पुरवठा अधिका-यांना अभिप्राय मागविले आहेतगरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली

अमरावती : शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. यासाठी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांद्वारा जिल्हा पुरवठा अधिका-यांना अभिप्राय मागविले आहे. त्यानुसार पश्चिम विदर्भात केंद्रसंख्येत ४ ने वाढ व अस्तित्वातील केंद्रात थाळ्यांच्या संख्यावाढीचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहे. यानुसार पश्चिम विदर्भात ९५० थाळ्यांची संख्यावाढ अपेक्षित आहे.गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली. यामध्ये १० रुपयांमध्ये शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी भात व १ वाटी वरण समाविष्ट असलेली थाळी उपलब्ध करण्यात आलेली आहे. योजनेला वाढता प्रतिसाद असल्याने तासभरात शिवभोजनाचा लाभ बंद करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शिवभोजन सुरू असलेल्या केंद्रांमध्ये अपेक्षित वाढींची संख्या व यासोबतच जिल्हा रुग्णालये, बसस्थानके, रेल्वे स्टेशन परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये याठिकाणची मागणी व वर्दळीचे ठिकाण यांचा सर्वंकक्ष अभ्यास करून पुरवठा विभागाने जिल्हास्तरावरून तत्काळ अहवाल मागितले आहेत.

यासोबतच संबंधित शहरात ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू झालेली आहेत, त्या केंद्रांची अपेक्षित वाढीव थाळींची संख्या आणि अपेक्षित वाढीव केंद्रांमधील थाळींची संख्या याची बेरीज ही मंजूर केलेल्या थाळीसंख्येच्या दुपटीपेक्षा अधिक व कमीही नसावी व अस्तित्वातील  व नवीन केंद्रातील थाळीची संख्या ही २०० च्या मर्यादेत असावी, असे पुरवठा विभागाचे अवर सचिवांनी स्पष्ट केले.  शिवथाळींची जिल्हानिहाय वाढअमरावती जिल्ह्यात ३ नवीन केंद्रांची वाढ व ४०० थाळी संख्या, अकोला जिल्ह्यात २ नवीन केंद्र व ३०० थाळी, वाशीम जिल्ह्यात अस्तित्वातील २ केंद्रात १०० थाळींनी वाढ, यवतमाळ जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ३ केंद्रांमध्ये १०० थाळ्यांची संख्यावाढ व बुलडाणा जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या ३ केंद्रांपैकी १ केंद्रात ५० थाळींनी संख्यावाढ आवश्यक असल्याचा अहवाल विभागीय आयुक्तस्तरावश्रून पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र