शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

शिवभोजनाला लग्न समारंभातून अन्न मिळावं, बच्चू कडूंची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 18:10 IST

जिथं जिथं अन्नदान आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, तेथून शिवभोजन थाळीसाठी

अमरावती - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेला आजपासून सुरुवात करण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, अमरावती जिल्ह्यातील बाजार समिती परिसरात या शिवभोजनालयाचे उद्घाटन करताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. तर, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ज्यांची ऐपत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन केले. 

अजित पवार यांनी पुण्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत तर बच्चू कडू यांनी अमरावती येथे या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भावनिक साद घातली. शिवभोजनाचा आनंद आहे, पण आपण जेवण कोणाला देतोय याचं दु:ख आहे. कारण, 10 रुपयांत जेवण जेवण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यांवर, लोकांवर का येते हा चिंतेचा विषय आहे, असे कडू यांनी म्हटले. तसेच, आपण सर्वांनी शिवभोजनासाठी साथ आणि मदत केली पाहिजे. शिवभोजनाची व्याप्ती वाढविण्यासाठी आपलेही सहाकार्य गरजेचं आहे. एखाद्या लग्नसमारंभाच्या ठिकाणी जेवणाच्या पंगती बसतात. मग, याच मंगलकार्यालयातून शिवभोजनासाठी काही अन्न लाभलं तर नक्कीच हे स्वागतार्ह पाऊल असेल, असेही ते म्हणाले.   

जिथं जिथं अन्नदान आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, तेथून शिवभोजन थाळीसाठी अन्न यायला हवं. आपला सहभाग लाभल्यास या योजनेची व्याप्ती नक्कीच वाढेल. माझ्या आईनं आमच्या घराशेजारी असलेल्या मानसिक रुग्णाला 25 वर्षे दोन वेळचं जेवण दिलं. भूक भागविण्यासाठी माती खाणारा तो रुग्ण जेवण करायला लागला. आम्ही प्रहारच्या माध्यमातून 700 लोकांना जेवणाचा दररोज डब्बा पुरवतो. कारण, परिस्थिती भीषण असून भूकेल्यांची संख्या जास्त आहे. नातं हे जाती-धर्मातून नव्हे तर सेवेतून निर्माण करता आलं पाहिजे, असे म्हणत बच्चू कडू यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली.  

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूshiv bhojnalayaशिवभोजनालयministerमंत्रीmarriageलग्नfoodअन्नAmravatiअमरावती