शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

शरद पवार यांची मंडल यात्रा म्हणजे फुसका बार : बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 14:58 IST

Amravati : ४० वर्षे सत्तेत असताना ओबीसी समाजासाठी काय केले याचे उत्तर द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शरद पवार हे ४० ते ५० वर्षे सत्तेत होते. त्या काळात ओबीसी समाजासाठी काय केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आधी मराठा समाजात भांडण लावले. आता ओबीसींमध्ये वाद लावण्याचे काम ते करीत आहेत. मात्र, ओबीसी समाज शरद पवार यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. खरे तर शरद पवार यांची मंडल यात्रा म्हणजे नौटंकी आणि फुसका बार आहे, अशी टीका राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे केली.

अमरावतीत एका कार्यक्रमासाठी आले असताना बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ९ ऑगस्ट रोजी नागपुरातून मंडल यात्रेला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सत्तेत असले की ओबीसीला विचारायचे नाही आणि सत्ता गेली की ओबीसींचा पुळका आणायचा, ही पवार यांची जुनी राजकीय खेळी आहे.

केंद्र व राज्यात त्यांनी सत्तेत अनेक महत्त्वाची पदे भूषविली. परंतु ओबीसीला कधीही न्याय दिला नाही. जातनिहाय जनगणना केली नाही. ओबीसीला खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला. ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू केले. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आरक्षणाची लढाई लढली.

त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये १३ हजार पदांवर ओबीसींना न्याय मिळेल. राज्यात ओबीसी महामंडळांना संवैधानिक दर्जा दिला. १८ महामंडळे वेगवेगळ्या समाजाला दिलेत. असे एक ना अनेक निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले आहेत. त्यामुळे ओबीसी समाज शरद पवार यांच्या मंडल यात्रेच्या नौटंकीला बळी पडणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.

येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार

  • येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदार यादी आताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बघून घ्यावी. आताच ऑब्जेक्शन घेऊन टाका नाही तर उद्या हरल्यावर पुन्हा म्हणतील मतदार याद्या चुकीच्या होत्या.
  • ऑब्जेक्शन घ्या, आम्ही ५१ टक्के मतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जिंकणार आहोत. आणि राहुल गांधींच्या गुडबुकमध्ये येण्याकरिता यशोमती ठाकूर व विजय वडेट्टीवार बोलत आहेत.
  • राहुल गांधींना या देशाची व विकासाची नाळ कळली नाही. पवित्र निवडणूक आयोगाच्या कामावरती ते आक्षेप घेतात, असे बावनकुळे म्हणाले.
टॅग्स :AmravatiअमरावतीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSharad Pawarशरद पवार