शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

जलयुक्तच्या गाळाने शिवार समृद्ध, ३,९६० कामांतून १७० लाख घनमीटर काढला गाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 4:48 PM

अमरावती : टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून विभागातील १५१९ गावांतील कामांमधून १७०.१५ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला.

- गजानन मोहोडअमरावती : टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून विभागातील १५१९ गावांतील कामांमधून १७०.१५ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला. शेतक-यांना विनारॉयल्टी गाळ मिळाल्याने हजारो हेक्टर शेतजमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. यामुळे शिवार समृद्ध झाले आहे.दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाचे जलसंपदा, कृषी, लघुसिंचन, जिल्हा परिषद यांसह अन्य विभागांच्या वतीने १५१९ नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. यापैकी ८४४ शासकीय व ३९० कामे लोकसहभागातून करण्यात आली. या सर्व कामांमधून साधारणपणे १७०.१५ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ शेतक-यांना विनारॉयल्टी केवळ वाहतूक खर्च सहन करून नेण्याची मुभा आहे. शेकडो वर्षांपासून नदी-नाल्यांत जमा झालेला गाळ सुपीक असल्याने विभागातील हजारो हेक्टर शेती समृद्ध होत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यास या गाळामुळे मदत होत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांमध्ये शासकीय कामांमधून ६४.२२ व लोकसहभागातून झालेल्या कामांमधून १०५.९७ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला आहे. हा गाळ काढल्यामुळे शासकीय ५८०.१६ किमी व लोकसहभागातील १४३.४० किमी लांबीची कामे झाली आहेत. अशी एकूण ७२३.५६ किमी लांबीची कामे झालीत. याचा दुहेरी लाभ शेतक-यांना झाला. या सर्व कामांवर १५८.६९ कोटींचा निधी खर्च झालेला आहे. या कामांमुळे संबंधित गावांमधील जलस्तर वाढल्यासोबतच शेतीसाठी गाळ उपलब्ध झाल्यामुळे शिवाराची सुपीकता वाढून शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.जिल्हानिहाय काढलेला गाळजलयुक्तच्या ३,९६० कामांमधून १०५.९७ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३८.२१, अकोला ४७, यवतमाळ १०.७७, बुलडाणा ४२.१५ व वाशीम जिल्ह्यात १२.७२ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला.३९६० कामांवर १५८ कोटींचा खर्चअमरावती विभागातील १५१९ गावांमधील ३,९६० कामांवर गेल्या दोन वर्षांत १५८ कोटी ६९ लाखांचा खर्च करण्यात आला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४६.४५ कोटी, अकोला ३५.८, यवतमाळ १२.५४, बुलडाणा ४४.३२ व वाशिम जिल्ह्यात १४.५७ कोटींचा निधी खर्च झाला. विभागात सद्यस्थितीत ८१२ कामे प्रगतीत आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAmravatiअमरावती