शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा दररोज नावेतून जीवघेणा प्रवास; पुलाच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2022 15:10 IST

महिनाभरापासून तुटला शाळेशी संपर्क

संदीप राऊत

तिवसा (अमरावती) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा तालुक्यातील ३५० लोकसंख्या वस्तीचे नमस्कारी गाव. दळणवळणाच्या सोयींचा अभाव, जेमतेम माध्यमिक शिक्षणाची सोय. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना सर्वस्वी वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते. मात्र, दोन्ही गावांच्यामध्ये असलेल्या वर्धा नदीला पूर आला की, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन नावेतून शैक्षणिक प्रवास करावा लागतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आजतागायत या नदीवरील पुलाची मागणी पूर्ण न होणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे वास्तव अधोरेखित करणारे आहे.

दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र नावेतून ओलांडणे म्हणजे प्राणाची बाजी लावणे होय. अशा जोखमेतून नमस्कारी येथील २५ शालेय विद्यार्थ्यांचा खडतर शैक्षणिक प्रवास नावाड्याच्या नौकेवर झुलताना दिसतो आहे. तिवसा तालुक्यातील फत्तेपूर, इसापूर, काटपूर व नमस्कारी अशी चार गावांची सात सदस्यीय गटग्रामपंचायत. माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते.

विद्यार्थी अशाही परिस्थितीत नावेत बसून शाळेची वाट धरतात; परंतु लहानशा नावेतून नदी ओलांडताना विद्यार्थ्यांना खूप जोखीम पत्करावी लागते. नदीतील पाण्याचा अंदाज घेऊनच नावाडी नदीत नौका टाकतो. नागरिकांनासुद्धा दळणवळणासाठी या एकमेव नावेचा आधार आहे. शासनाने नदीवर पूल उभारावा, एवढीच मागणी गेल्या कित्येक दशकांपासून नागरिक करीत आहेत.

महिनाभरापासून अप्पर वर्धा धरणाचा विसर्ग वर्धा नदीत करण्यात येत आहे. पाणीपातळीत वाढ असल्यास विद्यार्थ्यांची नावच पुढे सरकत नाही. यामुळे शाळेशी संपर्क तुटला आहे. सन २००८ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिलीप काळबांडे यांनी तत्कालीन सीईओ मुथ्युकृष्णन शंकरनारायणन व तत्कालीन अतिरिक्त सीईओ के. एम. अहमद यांच्यामार्फत शासनाकडून नाव उपलब्ध झाली होती. कालांतराने ती नाव वापरण्यायोग्य राहिली नाही.

हा विषय जलसंपदा व अप्पर वर्धा विभागाच्या अखत्यारीत येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासोबतच तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. पुराच्या पाण्याने विहिरीवरून पाणी वाहून जाते. याबाबत आपण संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करणार आहोत.

- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाAmravatiअमरावतीriverनदी