शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा दररोज नावेतून जीवघेणा प्रवास; पुलाच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2022 15:10 IST

महिनाभरापासून तुटला शाळेशी संपर्क

संदीप राऊत

तिवसा (अमरावती) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा तालुक्यातील ३५० लोकसंख्या वस्तीचे नमस्कारी गाव. दळणवळणाच्या सोयींचा अभाव, जेमतेम माध्यमिक शिक्षणाची सोय. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना सर्वस्वी वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते. मात्र, दोन्ही गावांच्यामध्ये असलेल्या वर्धा नदीला पूर आला की, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन नावेतून शैक्षणिक प्रवास करावा लागतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आजतागायत या नदीवरील पुलाची मागणी पूर्ण न होणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे वास्तव अधोरेखित करणारे आहे.

दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र नावेतून ओलांडणे म्हणजे प्राणाची बाजी लावणे होय. अशा जोखमेतून नमस्कारी येथील २५ शालेय विद्यार्थ्यांचा खडतर शैक्षणिक प्रवास नावाड्याच्या नौकेवर झुलताना दिसतो आहे. तिवसा तालुक्यातील फत्तेपूर, इसापूर, काटपूर व नमस्कारी अशी चार गावांची सात सदस्यीय गटग्रामपंचायत. माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते.

विद्यार्थी अशाही परिस्थितीत नावेत बसून शाळेची वाट धरतात; परंतु लहानशा नावेतून नदी ओलांडताना विद्यार्थ्यांना खूप जोखीम पत्करावी लागते. नदीतील पाण्याचा अंदाज घेऊनच नावाडी नदीत नौका टाकतो. नागरिकांनासुद्धा दळणवळणासाठी या एकमेव नावेचा आधार आहे. शासनाने नदीवर पूल उभारावा, एवढीच मागणी गेल्या कित्येक दशकांपासून नागरिक करीत आहेत.

महिनाभरापासून अप्पर वर्धा धरणाचा विसर्ग वर्धा नदीत करण्यात येत आहे. पाणीपातळीत वाढ असल्यास विद्यार्थ्यांची नावच पुढे सरकत नाही. यामुळे शाळेशी संपर्क तुटला आहे. सन २००८ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिलीप काळबांडे यांनी तत्कालीन सीईओ मुथ्युकृष्णन शंकरनारायणन व तत्कालीन अतिरिक्त सीईओ के. एम. अहमद यांच्यामार्फत शासनाकडून नाव उपलब्ध झाली होती. कालांतराने ती नाव वापरण्यायोग्य राहिली नाही.

हा विषय जलसंपदा व अप्पर वर्धा विभागाच्या अखत्यारीत येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासोबतच तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. पुराच्या पाण्याने विहिरीवरून पाणी वाहून जाते. याबाबत आपण संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करणार आहोत.

- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाAmravatiअमरावतीriverनदी