शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा दररोज नावेतून जीवघेणा प्रवास; पुलाच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2022 15:10 IST

महिनाभरापासून तुटला शाळेशी संपर्क

संदीप राऊत

तिवसा (अमरावती) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा तालुक्यातील ३५० लोकसंख्या वस्तीचे नमस्कारी गाव. दळणवळणाच्या सोयींचा अभाव, जेमतेम माध्यमिक शिक्षणाची सोय. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना सर्वस्वी वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते. मात्र, दोन्ही गावांच्यामध्ये असलेल्या वर्धा नदीला पूर आला की, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन नावेतून शैक्षणिक प्रवास करावा लागतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आजतागायत या नदीवरील पुलाची मागणी पूर्ण न होणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे वास्तव अधोरेखित करणारे आहे.

दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र नावेतून ओलांडणे म्हणजे प्राणाची बाजी लावणे होय. अशा जोखमेतून नमस्कारी येथील २५ शालेय विद्यार्थ्यांचा खडतर शैक्षणिक प्रवास नावाड्याच्या नौकेवर झुलताना दिसतो आहे. तिवसा तालुक्यातील फत्तेपूर, इसापूर, काटपूर व नमस्कारी अशी चार गावांची सात सदस्यीय गटग्रामपंचायत. माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते.

विद्यार्थी अशाही परिस्थितीत नावेत बसून शाळेची वाट धरतात; परंतु लहानशा नावेतून नदी ओलांडताना विद्यार्थ्यांना खूप जोखीम पत्करावी लागते. नदीतील पाण्याचा अंदाज घेऊनच नावाडी नदीत नौका टाकतो. नागरिकांनासुद्धा दळणवळणासाठी या एकमेव नावेचा आधार आहे. शासनाने नदीवर पूल उभारावा, एवढीच मागणी गेल्या कित्येक दशकांपासून नागरिक करीत आहेत.

महिनाभरापासून अप्पर वर्धा धरणाचा विसर्ग वर्धा नदीत करण्यात येत आहे. पाणीपातळीत वाढ असल्यास विद्यार्थ्यांची नावच पुढे सरकत नाही. यामुळे शाळेशी संपर्क तुटला आहे. सन २००८ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिलीप काळबांडे यांनी तत्कालीन सीईओ मुथ्युकृष्णन शंकरनारायणन व तत्कालीन अतिरिक्त सीईओ के. एम. अहमद यांच्यामार्फत शासनाकडून नाव उपलब्ध झाली होती. कालांतराने ती नाव वापरण्यायोग्य राहिली नाही.

हा विषय जलसंपदा व अप्पर वर्धा विभागाच्या अखत्यारीत येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासोबतच तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. पुराच्या पाण्याने विहिरीवरून पाणी वाहून जाते. याबाबत आपण संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करणार आहोत.

- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाAmravatiअमरावतीriverनदी