शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शाळेला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:12 PM

प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने .....

ठळक मुद्देसहनशक्ती संपली : चांदूर रेल्वे बस आगाराचा कारभार नियोजनशून्य

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने याच बसमधून प्रवास करू द्यावा, नसल्यास दुसºया बसची व्यवस्था करावी. मात्र, तोपर्यंत आम्ही ही बस पुढे जाऊ देणार नाही, असे या बालप्रवाशांनी ठणकावून सांगितले. मुलांच्या या पवित्र्यामुळे चांदूरहून दुसरी बस सोडावी लागली. दरम्यान, घटनास्थळावर आलेल्या कुºह्याच्या ठाणेदारांना बालकांनी या रोजच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली.तिवस्याहून चांदूर रेल्वेकरिता कुºहामार्गे पहिली बस पंक्चर झाल्याने त्यानंतरच्या तिवसा-चांदूर रेल्वे बसवर बरीच गर्दी होती. सकाळी १०.३० वाजता कुºहा येथून सुमारे ७० प्रवासी चढले. वाढोणा थांब्यावर आमला, चांदूर रेल्वे येथे शिक्षणासाठी जाणारे २५ ते ३० विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत होते. जागा नसल्याचे पाहून चालक-वाहकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी त्वरेने बसपुढे येत ती अडवून धरली व रस्त्यावर झोपले. जोपर्यंत आम्हाला घेत नाही किंवा दुसरी बस येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. बसमधील प्रवाशांनीही त्यांचे समर्थन केले. ही बाब चालक-वाहकांनी चांदूर आगाराला कळविली. त्यांनी कुऱ्हा पोलिसांना माहिती दिल्यामुळे पोलीस पथक उपनिरीक्षक प्रणीत पाटील यांच्या नेतृत्वात पोहोचले. पंचायत समिती सदस्य मंगेश भगोलेदेखील यावेळी पोहोचले. त्यांच्यासह विद्यार्थ्यांची रास्त मागणी प्रवाशांनी उचलून धरल्यामुळे चांदूर आगाराहून दुसरी पाठवून हा गुंता सोडविण्यात आला.कुºहा पोलिसांनी वाढोणा बस थांबा गाठला आणि विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. दुसरी बसच्या प्रतीक्षेत मुलांना शाळेत उशीर झाला असता. त्यातच काही मुलांचे पेपर होते. यामुळे पीएसआय प्रणीत पाटील यांनी पोलीस जीपने मुलांना आमला येथे पोहचविले आणि त्यांची गैरसोय टाळली. याबद्दल विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार मानले.कुºह्याहून बसमध्ये प्रवासी, विद्यार्थ्यांची दाटी झाली, की पुढच्या स्टॉपवर बस थांबवली जात नाही. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांची गर्र्दी पुढच्या बसची वाट पाहत राहते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून, चांदूर आगाराने शाळेच्या वेळेला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडावी.- अर्चना तिरमारे, शिक्षिकानेहमीच मुले बसच्या प्रतीक्षेत आढळून येतात. या मार्गावर धावणाºया चांदूर आगाराच्या बस एक तर वाईट अवस्थेला पोहोचल्या आहेत. दुसरीकडे बसफेºयांसाठी वेळेचे नियोजन पाळले जात नाही. याबाबत महामंडळाच्या वरिष्ठांकडे आगार व्यवस्थापकाची तक्रार करणार आहे.- मंगेश भगोले, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :Schoolशाळा