शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
5
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
6
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
7
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
8
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
9
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
11
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
12
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
13
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
14
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
16
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
17
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
18
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
19
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
20
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विधवा निराधार स्वावलंबन योजना बारगळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:10 IST

राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेतून नि:शुल्क आॅटोरिक्षा परवाने देण्याची योजना आहे

गणेश वासनिकअमरावती : राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेतून नि:शुल्क आॅटोरिक्षा परवाने देण्याची योजना आहे. मात्र, या योजनेचा प्रसार व प्रचार झाला नसल्याने मयत शेतकºयांच्या विधवांना उपजिविकेचे साधन म्हणून आॅटोरिक्षा घेता आले नाही. विशेषत: विदर्भात ही योजना बारगळल्याचे वास्तव आहे.टंचाई, गारपीट, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि कर्जफेडीचा तगादा आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब शासन निदर्शनास आली आहे. त्यामुळे राज्य शासन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयास सानुग्राह अनुदान म्हणून एक लाख रुपये तातडीची मदत देते. मात्र, मयत शेतकºयांच्या विधवा महिलांना विशेष बाब म्हणून गृहविभागाने २१ जानेवारी २०१६ रोजी आॅटोरिक्षा परवाने देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी ग्राह्य ठरवलेली आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांची यादी या योजनेच्या लाभासाठी आवश्यक आहे. परंतु १०,५०० रूपये शुल्क असलेले आॅटोरिक्षा परवाने हे नि:शुल्क मिळत असताना या योजनेचा लाभ विधवांना मिळालेला नाही. एवढेच नव्हे, तर आॅटोरिक्षा घेण्यासाठी शेतकºयांच्या विधवांना बुलडाणा अर्बन को.आॅप क्रेडिट सोसायटीने १०० टक्के कर्जपुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, ही निराधार स्वावलंबन योजना आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या दारी पोहचलेली नाही. शासनाने या योजनेला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले असताना विदर्भातील शिवसैनिकांनी शेतकरी विधवांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचा फारसा प्रयत्न केला नाही, हे विशेष. त्यामुळे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या विदर्भात ही योजना बारगळल्याचे वास्तव आहे.

असे मिळेल ऑटोरिक्षा१९ डिसेंबर २००५ आणि २२ जानेवारी २००६ च्या शासन निर्णयानुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना १ लाख रूपयांचे अनुदान मिळालेल्या महिलांना प्राधान्य असेल. आॅटोरिक्षा परवाने देताना अटी, शर्ती शिथिल धोरण राबविले जाईल. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या इंधनावर चालणारे आॅटोरिक्षा मिळेल. आॅटोरिक्षासाठी बँकेतून कर्जाबाबत जामीनदार नियुक्त केले जातील.

दोन वर्षांत सहा जिल्ह्यांत २,१४३ शेतकरी आत्महत्याअमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा हे सहा जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून शासनाने घोषित केले. सन २०१६ व २०१७ या दोन वर्षांत २१४३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासन दत्फरी आहे. यात अमरावती जिल्ह्यात ६१०, अकोला ३२०, यवतमाळ ५०९, बुलडाणा ५४६, वाशिम १५८ तर वर्धा २३५ असे शेतकरी आत्महत्या झालेल्यांचा समावेश आहे.

योजनेचे उद्दिष्ट चांगले आहे. परंतु, ही योजना ज्या कुटुंबीयांसाठी लागू केली, त्यांच्यापर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे शेतकरी विधवांना पाहिजे त्या प्रमाणात आॅटोरिक्षा परवाने मिळाले नाही.- विजय काठोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती