शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

समृद्धी महामार्गात भोगवटदार दोनला मिळाला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:22 IST

समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते नागपूर असा जोडणारा असून, १० जिल्हे, २६ तालुके व ३९० गावांतून जात आहे.

गणेश वासनिक । लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते नागपूर असा जोडणारा असून, १० जिल्हे, २६ तालुके व ३९० गावांतून जात आहे. खासगी जमीन खरेदी करून हा मार्ग साकारत असल्याचे चित्र उभे करण्यात येत असले तरी भोगवटदार वर्ग २ च्या वर्ग १ झालेल्या जमिनींचा यात समावेश असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून समृद्धी महामार्ग नावारूपास येत आहे. हा महामार्ग वनजमिनीतून जात नाही, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ३९० गावांचे सन- १८८२ चे गाव नकाशे, त्या गावांचे टोपोशिटमधील क्षेत्र, स्क्रब तथा पाश्चर फॉरेस्ट आता गायरान, वनविभागाने इतर विभागांना दिलेल्या वनजमिनी व त्यांचा वैधानिक दर्जा हा राखीव व संरक्षित वन आहे. ज्या जमिनीवर समृद्धी महामार्ग निर्माण केला जात आहे, त्या वनजमिनी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, नागपूर येथील मुख्य वनसंरक्षकांनी कशाच्या आधारे दिले, हे गुपित आहे. जमिनींचा वैधानिक दर्जा हा राखीव अथवा संरक्षित वन आहे. तसेच वनजमिनी या सन १९६० ते २००५ या कालावधीत महसूलच्या अधिकाºयांनी वाटप केलेल्या आहेत. परंतु, त्या सर्व वनजमिनी निर्वानीकरण झालेल्या नाहीत, हे माहीत असूनही राजकीय दबावापोटी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी वनसंवर्धन कायदा गुंडाळल्याचे वास्तव आहे. ‘वन’संज्ञा जमिनींचा वापर केला जात नाही, अशा प्रकारे खोटे दाखले देण्याचा प्रकार मुख्य वनसंरक्षकांनी केला आहे. समद्धी महामार्गात वनजमिनींचा वापर होत असल्याप्रकरणी वनसंवर्धन कायदा १९८० कलम २ व ३, वनसंवर्धन नियम१९८१/२००३ नियम ९ (१), सर्वोच्च न्यायालय याचिका क्र.२०२/९५ व १७१/ ९६ टीएन गोदावरम निकाल दि.४/३/१९९७, समथा विरूद्ध आंध्रप्रदेश, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तील तरतुदी आणि पर्यावरण कायदा १९९४ चा भंग होत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच २०१५ च्या शासन निर्णयानुसार वर्ग २ च्या वर्ग १ मध्ये रुपांतरित झालेल्या जमिनींची खरेदीदेखील करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला तिलांजली

समृद्धी महामार्गाचे वन संज्ञेच्या जमिनींचा वापर होत नसल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी खोटे प्रमाणपत्र जारी करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला तिलांजली दिली आहे. संघटितपणे खोटे दाखले देऊन केंद्र सरकारच्या आदेशानुसार यंत्रणेकडून दुप्पट रोपवन खर्चाचे पाचपट दंडाची वसुली करणे नियमावली आहे. मात्र, वनविभागाकडून समृद्धी महामार्ग निर्मितीतील उणिवा दडपल्या जात आहेत.

'लिगल सर्च’अहवालाच्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार जमीन खरेदीचे व्यवहार झाले. वर्ग २ च्या वर्ग १ झालेल्या जमिनींची खरेदी झाली आहे. यात काही वनजमिनींचा समावेश असून, त्यांचे वर्ग करण्याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ८० टक्के जमीन खरेदीची प्रक्रिया आटोपली आहे.

- विवेक घोडके, (उपजिल्हाधिकारी, समृद्धी महामार्ग अमरावती)

टॅग्स :Amravatiअमरावतीroad transportरस्ते वाहतूक