शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

समृद्धी महामार्गात भोगवटदार दोनला मिळाला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:22 IST

समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते नागपूर असा जोडणारा असून, १० जिल्हे, २६ तालुके व ३९० गावांतून जात आहे.

गणेश वासनिक । लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते नागपूर असा जोडणारा असून, १० जिल्हे, २६ तालुके व ३९० गावांतून जात आहे. खासगी जमीन खरेदी करून हा मार्ग साकारत असल्याचे चित्र उभे करण्यात येत असले तरी भोगवटदार वर्ग २ च्या वर्ग १ झालेल्या जमिनींचा यात समावेश असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून समृद्धी महामार्ग नावारूपास येत आहे. हा महामार्ग वनजमिनीतून जात नाही, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ३९० गावांचे सन- १८८२ चे गाव नकाशे, त्या गावांचे टोपोशिटमधील क्षेत्र, स्क्रब तथा पाश्चर फॉरेस्ट आता गायरान, वनविभागाने इतर विभागांना दिलेल्या वनजमिनी व त्यांचा वैधानिक दर्जा हा राखीव व संरक्षित वन आहे. ज्या जमिनीवर समृद्धी महामार्ग निर्माण केला जात आहे, त्या वनजमिनी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, नागपूर येथील मुख्य वनसंरक्षकांनी कशाच्या आधारे दिले, हे गुपित आहे. जमिनींचा वैधानिक दर्जा हा राखीव अथवा संरक्षित वन आहे. तसेच वनजमिनी या सन १९६० ते २००५ या कालावधीत महसूलच्या अधिकाºयांनी वाटप केलेल्या आहेत. परंतु, त्या सर्व वनजमिनी निर्वानीकरण झालेल्या नाहीत, हे माहीत असूनही राजकीय दबावापोटी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी वनसंवर्धन कायदा गुंडाळल्याचे वास्तव आहे. ‘वन’संज्ञा जमिनींचा वापर केला जात नाही, अशा प्रकारे खोटे दाखले देण्याचा प्रकार मुख्य वनसंरक्षकांनी केला आहे. समद्धी महामार्गात वनजमिनींचा वापर होत असल्याप्रकरणी वनसंवर्धन कायदा १९८० कलम २ व ३, वनसंवर्धन नियम१९८१/२००३ नियम ९ (१), सर्वोच्च न्यायालय याचिका क्र.२०२/९५ व १७१/ ९६ टीएन गोदावरम निकाल दि.४/३/१९९७, समथा विरूद्ध आंध्रप्रदेश, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तील तरतुदी आणि पर्यावरण कायदा १९९४ चा भंग होत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच २०१५ च्या शासन निर्णयानुसार वर्ग २ च्या वर्ग १ मध्ये रुपांतरित झालेल्या जमिनींची खरेदीदेखील करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला तिलांजली

समृद्धी महामार्गाचे वन संज्ञेच्या जमिनींचा वापर होत नसल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी खोटे प्रमाणपत्र जारी करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला तिलांजली दिली आहे. संघटितपणे खोटे दाखले देऊन केंद्र सरकारच्या आदेशानुसार यंत्रणेकडून दुप्पट रोपवन खर्चाचे पाचपट दंडाची वसुली करणे नियमावली आहे. मात्र, वनविभागाकडून समृद्धी महामार्ग निर्मितीतील उणिवा दडपल्या जात आहेत.

'लिगल सर्च’अहवालाच्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार जमीन खरेदीचे व्यवहार झाले. वर्ग २ च्या वर्ग १ झालेल्या जमिनींची खरेदी झाली आहे. यात काही वनजमिनींचा समावेश असून, त्यांचे वर्ग करण्याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ८० टक्के जमीन खरेदीची प्रक्रिया आटोपली आहे.

- विवेक घोडके, (उपजिल्हाधिकारी, समृद्धी महामार्ग अमरावती)

टॅग्स :Amravatiअमरावतीroad transportरस्ते वाहतूक