शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

समृद्धी महामार्गात भोगवटदार दोनला मिळाला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:22 IST

समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते नागपूर असा जोडणारा असून, १० जिल्हे, २६ तालुके व ३९० गावांतून जात आहे.

गणेश वासनिक । लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते नागपूर असा जोडणारा असून, १० जिल्हे, २६ तालुके व ३९० गावांतून जात आहे. खासगी जमीन खरेदी करून हा मार्ग साकारत असल्याचे चित्र उभे करण्यात येत असले तरी भोगवटदार वर्ग २ च्या वर्ग १ झालेल्या जमिनींचा यात समावेश असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून समृद्धी महामार्ग नावारूपास येत आहे. हा महामार्ग वनजमिनीतून जात नाही, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ३९० गावांचे सन- १८८२ चे गाव नकाशे, त्या गावांचे टोपोशिटमधील क्षेत्र, स्क्रब तथा पाश्चर फॉरेस्ट आता गायरान, वनविभागाने इतर विभागांना दिलेल्या वनजमिनी व त्यांचा वैधानिक दर्जा हा राखीव व संरक्षित वन आहे. ज्या जमिनीवर समृद्धी महामार्ग निर्माण केला जात आहे, त्या वनजमिनी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, नागपूर येथील मुख्य वनसंरक्षकांनी कशाच्या आधारे दिले, हे गुपित आहे. जमिनींचा वैधानिक दर्जा हा राखीव अथवा संरक्षित वन आहे. तसेच वनजमिनी या सन १९६० ते २००५ या कालावधीत महसूलच्या अधिकाºयांनी वाटप केलेल्या आहेत. परंतु, त्या सर्व वनजमिनी निर्वानीकरण झालेल्या नाहीत, हे माहीत असूनही राजकीय दबावापोटी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी वनसंवर्धन कायदा गुंडाळल्याचे वास्तव आहे. ‘वन’संज्ञा जमिनींचा वापर केला जात नाही, अशा प्रकारे खोटे दाखले देण्याचा प्रकार मुख्य वनसंरक्षकांनी केला आहे. समद्धी महामार्गात वनजमिनींचा वापर होत असल्याप्रकरणी वनसंवर्धन कायदा १९८० कलम २ व ३, वनसंवर्धन नियम१९८१/२००३ नियम ९ (१), सर्वोच्च न्यायालय याचिका क्र.२०२/९५ व १७१/ ९६ टीएन गोदावरम निकाल दि.४/३/१९९७, समथा विरूद्ध आंध्रप्रदेश, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तील तरतुदी आणि पर्यावरण कायदा १९९४ चा भंग होत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच २०१५ च्या शासन निर्णयानुसार वर्ग २ च्या वर्ग १ मध्ये रुपांतरित झालेल्या जमिनींची खरेदीदेखील करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला तिलांजली

समृद्धी महामार्गाचे वन संज्ञेच्या जमिनींचा वापर होत नसल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी खोटे प्रमाणपत्र जारी करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला तिलांजली दिली आहे. संघटितपणे खोटे दाखले देऊन केंद्र सरकारच्या आदेशानुसार यंत्रणेकडून दुप्पट रोपवन खर्चाचे पाचपट दंडाची वसुली करणे नियमावली आहे. मात्र, वनविभागाकडून समृद्धी महामार्ग निर्मितीतील उणिवा दडपल्या जात आहेत.

'लिगल सर्च’अहवालाच्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार जमीन खरेदीचे व्यवहार झाले. वर्ग २ च्या वर्ग १ झालेल्या जमिनींची खरेदी झाली आहे. यात काही वनजमिनींचा समावेश असून, त्यांचे वर्ग करण्याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ८० टक्के जमीन खरेदीची प्रक्रिया आटोपली आहे.

- विवेक घोडके, (उपजिल्हाधिकारी, समृद्धी महामार्ग अमरावती)

टॅग्स :Amravatiअमरावतीroad transportरस्ते वाहतूक