बैलजोडींची खरेदी-विक्री बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:01:20+5:30
अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अंजनगाव सुर्जी येथील गुरांच्या बाजारात बाजारात बैलजोडी खरेदी-विक्री बंद आहे. त्यामुळे दीड महिन्यांत लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे बैलांकरवी होणाºया शेतीच्या मशागतीअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.
अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.
ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही. मात्र, अजूनही शेतीच्या बºयाच कामांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे. खरीप हंगामात शेतीची तयारी करीत असताना सरी पाडणे, वखरवाहीसाठी बैलजोडीला प्राधान्य दिले जाते. त्याच बरोबर गावांत शेतरस्ते नाहीत. तेथे शेतमाल वाहतुकीसाठी तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैलजोडी महत्त्वाची असते. बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने वखरणी बंद झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
अमरावती शहराव्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा अधिक शिरकाव झाला नसल्याने शेतकरी खरीपाच्या पूर्वमशागतीला लागले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरची मागणी अचानक वाढली आहे. त्यात वखरणी, नांगरणीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बैलजोडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र बाजार लॉकडाऊन झाल्यामुळे बैलांचे खरदी-विक्री व्यवहार थांबलेले आहेत. दरम्यान पुण्या-मुंबईहून अनेकजण परतले असून ते पारंपारिक शेतीकडे वळले आहेत.
घरातील कर्ता पुरूष शेती कसत असताना दुसरा आल्याने शेतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेकांचा मक्त्याने शेती करण्याकडे कल असून त्यांच्याकडूनही बैलजोडीबाबत विचारणा केली जात आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
दलाल चिंतेत
बैलजोड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावणाºया दलालांना बाजार बंद असल्याने हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यांचा रोजगार बुडाला आहे. करोनाचे संकट दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी मनोमन प्रार्थना ते करीत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात गुरांच्या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. गर्दी होईल. त्यामुळे शासनादेशाने बाजार बंद आहे. दुसरीकडे शेतकºयांना बैलजोडी आवश्यक आहे, हे आम्ही जाणतो. त्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- गजानन नवघरे,
सचिव, बाजार समिती,
अंजनगाव सुर्जी