शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

साल गड्याचा मोबदला लाखाचा उंबरठा पार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

चांदूर बाजार : दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठेवून शेती काम करण्यास शेतकरी सज्ज होतात. परंतु गेल्या काही वर्षात ...

चांदूर बाजार : दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठेवून शेती काम करण्यास शेतकरी सज्ज होतात. परंतु गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे, तर शेती जास्त असलेले शेतकरी काही शेती बटाई पद्धतीने देण्यावर जास्त भर देत आहेत. संपूर्ण शेती घरी करावयाची असल्यास सालगडी ठेवावा लागतो. मात्र, सालगड्याचे भाव वधारले आहेत. यावर्षी सालगड्याचा भाव लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे बोलले जात आहे.

यावर्षी अतिवृष्टी झाल्याने ओल्या दुष्काळाचे चटके शेतकऱ्यांना सहन करण्याची वेळ येत आहे. चारा टंचाई व पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण होत आहेत. अनेक जंगलव्याप्त भागात पाण्याची टंचाई उद्भवत असल्याने पशुपालक व शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे. शिवाय पशुखाद्य महाग झाल्यामुळे चाऱ्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंत्रयुगात शेती महागडी झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे अवघड झाले असल्याने बटाईने शेती घेण्याससुद्धा कोणी तयार होत नाही.

कसे बसे शक्य झाले तर नापिकी व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेती करण्यासाठी सालगडी ठेवणेही कठीण झाले आहे. पूर्वी मोठ्या शेतकऱ्यांकडे तीन ते चार सालगडी असायचे. परंतु आता सालगड्याचे भाव वधारल्याने पगार देण्यासाठी नगदी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी ग्रामीण भागात वर्षभरासाठी सालगडी ठेवला जातो. परंतु तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात मोजण्याइतके शेतकरी सोडले तर कोणी शेतकरी सालगडी ठेवण्यास धजावत नाहीत.

गतवर्षी सालगड्याचा दर ७० ते ८० हजार रुपये प्रतिवर्ष होते. यंदा यात मोठी वाढ झाली असल्याचे बोलले जात असून, ८० ते ९० हजार रुपये वर्ष याप्रमाणे पैसे द्यावे लागत आहेत. सततच्या दुष्काळाने सालगडी ठेवणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी आता आपली शेती बटाईने देण्याचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे. सालगड्याला पगार देण्यापेक्षा शेतात जाऊन काम केलेले पुरेल. एकंदरीत शेताची अवस्था दयनीय झाली असून, शेतकऱ्यांमध्येसुद्धा उत्साह दिसत नाही.

शेतकरी निरूत्साही

शेतकऱ्यांसाठी गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण आहे. हे नवे शेतीचे वर्ष म्हणून शेतकरी नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून करतात. नवीन शेतात नवीन रोप बनवणे, रोपांची लागवड करणे, आदी काम गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केली जातात. मात्र, यावर्षी शेतकरी सालगडी शोधण्याच्या प्रयत्नात दिसत नाहीत. गेल्या चार वर्षांपासूनच्या सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. लावलेला खर्चही शेतातून निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी सालगडीसुद्धा ठेवण्याच्या मनस्थितीत नाही.