शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
5
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
7
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
8
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
9
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
10
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
11
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
12
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
13
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
14
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
15
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
16
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
17
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
18
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
19
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
20
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत आरपीएफने ७३३ मुलांची केली सुटका

By गणेश वासनिक | Updated: October 11, 2023 10:54 IST

मुंबई मध्य रेल्वे विभागाची कार्यवाही, एप्रिल ते सप्टेंबर सहा महिन्यांत मोहीम

अमरावती : मुंबई विभागाने एप्रिल ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्वाधिक म्हणजे २०६ मुलांची सुटका केली आहे. आरपीएफ ने सप्टेंबर २०२३ मध्ये  ३९,५१,९३५ रुपयांपेक्षा  जास्त किमतीचे अंदाजे १२८ सामान/वस्तू परत मिळवले. प्रवासी आणि त्यांची मालमत्ता सुरक्षित करताना रेल्वे संरक्षण दलाने मानवता दाखवली आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF)  “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून शासकीय रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ७३३ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ५१७ मुले आणि २१६  मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे. 

काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.  रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सुटका केलेल्या मुलांचे विभागनिहाय आकडेवारी

◆ मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २०६ मुलांची सुटका केली, ज्यात १३९ मुले आणि ६७ मुली.◆ भुसावळ विभागाने २०५ मुलांची सुटका केली असून त्यात १२८  मुले आणि ७७ मुली◆ पुणे विभागाने १८८ मुलांची सुटका केली असून यामध्ये १८१ मुले आणि ७ मुली.◆ नागपूर विभागाने सुटका केलेल्या ९५ मध्ये ४७ मुले आणि ४८ मुली.◆ सोलापूर विभागाने ३९ मुलांची सुटका केली ज्यामध्ये २२ मुले आणि १७ मुली.आरपीएफने तीन जणांचे वाचविले प्राण, अंमली पदार्थ तस्करी रोखली

"मिशन जीवन रक्षा" मध्ये आरपीएफचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत.  सप्टेंबर २०२३ मध्ये आरपीएफ जवानांनी ३ मौल्यवान जीव वाचवले. ऑपरेशन “अमानत” अंतर्गत सामान पुनर्प्राप्त करणे आणि सुपूर्द करणे – बरेच प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा ट्रेन/स्टेशन सोडण्याच्या घाईत सामान/मोबाइल यांसारखे सर्व सामान घेणे विसरतात.  या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ कर्मचारी अशा वस्तू सुरक्षित करण्यात मदत करतात आणि योग्य मालकाला परत मिळवून देतात.  या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ ने सप्टेंबर २०२३ मध्ये अंदाजे  ३९,५१,९३५ रुपयांपेक्षा  जास्त किमतीचे  १२८ सामान/वस्तू परत मिळवल्या.   

आरपीएफला देखील अंमली पदार्थांची तस्करी, रेल्वेमार्गे बेकायदेशीर दारूच्या समस्येला सामोरे जाण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये, आरपीएफ ने  २३,७५,८४० किमतीचे ९५.२०० किलो गांजाचे ९ प्रकरणे आणि  ७५,१५० रुपये किमतीची (१३४.१९ लिटर)  ९ मद्य प्रकरणे नोंद केली. मध्य रेल्वेने ३ जणांच्या अटकेसह ४८३ कासवांच्या वन्यजीव जप्तीचे १ प्रकरण देखील जप्त केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीIndian Railwayभारतीय रेल्वे