शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत आरपीएफने ७३३ मुलांची केली सुटका

By गणेश वासनिक | Updated: October 11, 2023 10:54 IST

मुंबई मध्य रेल्वे विभागाची कार्यवाही, एप्रिल ते सप्टेंबर सहा महिन्यांत मोहीम

अमरावती : मुंबई विभागाने एप्रिल ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्वाधिक म्हणजे २०६ मुलांची सुटका केली आहे. आरपीएफ ने सप्टेंबर २०२३ मध्ये  ३९,५१,९३५ रुपयांपेक्षा  जास्त किमतीचे अंदाजे १२८ सामान/वस्तू परत मिळवले. प्रवासी आणि त्यांची मालमत्ता सुरक्षित करताना रेल्वे संरक्षण दलाने मानवता दाखवली आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF)  “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून शासकीय रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ७३३ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ५१७ मुले आणि २१६  मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे. 

काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.  रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सुटका केलेल्या मुलांचे विभागनिहाय आकडेवारी

◆ मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २०६ मुलांची सुटका केली, ज्यात १३९ मुले आणि ६७ मुली.◆ भुसावळ विभागाने २०५ मुलांची सुटका केली असून त्यात १२८  मुले आणि ७७ मुली◆ पुणे विभागाने १८८ मुलांची सुटका केली असून यामध्ये १८१ मुले आणि ७ मुली.◆ नागपूर विभागाने सुटका केलेल्या ९५ मध्ये ४७ मुले आणि ४८ मुली.◆ सोलापूर विभागाने ३९ मुलांची सुटका केली ज्यामध्ये २२ मुले आणि १७ मुली.आरपीएफने तीन जणांचे वाचविले प्राण, अंमली पदार्थ तस्करी रोखली

"मिशन जीवन रक्षा" मध्ये आरपीएफचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत.  सप्टेंबर २०२३ मध्ये आरपीएफ जवानांनी ३ मौल्यवान जीव वाचवले. ऑपरेशन “अमानत” अंतर्गत सामान पुनर्प्राप्त करणे आणि सुपूर्द करणे – बरेच प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा ट्रेन/स्टेशन सोडण्याच्या घाईत सामान/मोबाइल यांसारखे सर्व सामान घेणे विसरतात.  या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ कर्मचारी अशा वस्तू सुरक्षित करण्यात मदत करतात आणि योग्य मालकाला परत मिळवून देतात.  या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ ने सप्टेंबर २०२३ मध्ये अंदाजे  ३९,५१,९३५ रुपयांपेक्षा  जास्त किमतीचे  १२८ सामान/वस्तू परत मिळवल्या.   

आरपीएफला देखील अंमली पदार्थांची तस्करी, रेल्वेमार्गे बेकायदेशीर दारूच्या समस्येला सामोरे जाण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये, आरपीएफ ने  २३,७५,८४० किमतीचे ९५.२०० किलो गांजाचे ९ प्रकरणे आणि  ७५,१५० रुपये किमतीची (१३४.१९ लिटर)  ९ मद्य प्रकरणे नोंद केली. मध्य रेल्वेने ३ जणांच्या अटकेसह ४८३ कासवांच्या वन्यजीव जप्तीचे १ प्रकरण देखील जप्त केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीIndian Railwayभारतीय रेल्वे