शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत आरपीएफने ७३३ मुलांची केली सुटका

By गणेश वासनिक | Updated: October 11, 2023 10:54 IST

मुंबई मध्य रेल्वे विभागाची कार्यवाही, एप्रिल ते सप्टेंबर सहा महिन्यांत मोहीम

अमरावती : मुंबई विभागाने एप्रिल ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्वाधिक म्हणजे २०६ मुलांची सुटका केली आहे. आरपीएफ ने सप्टेंबर २०२३ मध्ये  ३९,५१,९३५ रुपयांपेक्षा  जास्त किमतीचे अंदाजे १२८ सामान/वस्तू परत मिळवले. प्रवासी आणि त्यांची मालमत्ता सुरक्षित करताना रेल्वे संरक्षण दलाने मानवता दाखवली आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF)  “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून शासकीय रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ७३३ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ५१७ मुले आणि २१६  मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे. 

काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.  रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सुटका केलेल्या मुलांचे विभागनिहाय आकडेवारी

◆ मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २०६ मुलांची सुटका केली, ज्यात १३९ मुले आणि ६७ मुली.◆ भुसावळ विभागाने २०५ मुलांची सुटका केली असून त्यात १२८  मुले आणि ७७ मुली◆ पुणे विभागाने १८८ मुलांची सुटका केली असून यामध्ये १८१ मुले आणि ७ मुली.◆ नागपूर विभागाने सुटका केलेल्या ९५ मध्ये ४७ मुले आणि ४८ मुली.◆ सोलापूर विभागाने ३९ मुलांची सुटका केली ज्यामध्ये २२ मुले आणि १७ मुली.आरपीएफने तीन जणांचे वाचविले प्राण, अंमली पदार्थ तस्करी रोखली

"मिशन जीवन रक्षा" मध्ये आरपीएफचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत.  सप्टेंबर २०२३ मध्ये आरपीएफ जवानांनी ३ मौल्यवान जीव वाचवले. ऑपरेशन “अमानत” अंतर्गत सामान पुनर्प्राप्त करणे आणि सुपूर्द करणे – बरेच प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा ट्रेन/स्टेशन सोडण्याच्या घाईत सामान/मोबाइल यांसारखे सर्व सामान घेणे विसरतात.  या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ कर्मचारी अशा वस्तू सुरक्षित करण्यात मदत करतात आणि योग्य मालकाला परत मिळवून देतात.  या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ ने सप्टेंबर २०२३ मध्ये अंदाजे  ३९,५१,९३५ रुपयांपेक्षा  जास्त किमतीचे  १२८ सामान/वस्तू परत मिळवल्या.   

आरपीएफला देखील अंमली पदार्थांची तस्करी, रेल्वेमार्गे बेकायदेशीर दारूच्या समस्येला सामोरे जाण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये, आरपीएफ ने  २३,७५,८४० किमतीचे ९५.२०० किलो गांजाचे ९ प्रकरणे आणि  ७५,१५० रुपये किमतीची (१३४.१९ लिटर)  ९ मद्य प्रकरणे नोंद केली. मध्य रेल्वेने ३ जणांच्या अटकेसह ४८३ कासवांच्या वन्यजीव जप्तीचे १ प्रकरण देखील जप्त केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीIndian Railwayभारतीय रेल्वे