शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने रस्त्यांची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:12 IST

शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे.

ठळक मुद्देमहापालिका अन् ‘बी अ‍ॅन्ड सी’चा घोळ : चौकाचौकात तुंबले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे.शहरात २४ तासांत २२ मिमी पावसाची नोंद झाली, तर चार दिवसांपासून झड आहे. यात मधेमधे जोराचा पाऊस होत असल्याने शहरातील अनेक खोलगट भागात पाणी साचले आहे. यामध्ये नाल्यांची सफाई झाल्याने पाणी तुंबले नसले तरी यावेळी रस्त्यांचे नवीन संकट ओढावले आहे. रस्त्यांची कामे करताना चौकाचौकांतील काँक्रीटीकरण सोडण्यात आले. त्यामुळे या खोलगट भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहन चालविताना खड्ड्याचा व पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहनचालकांचा तोल गेल्याने वाहनासह पडल्याचे अपघाताच्या घटना घडल्या.अनेक रस्त्यांचे डांबरीकरण उखडल्याने रस्त्यांची चाळण झाली व या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने अंदाज येत नसल्यानेही वाहनचालकांना अपघात होत आहेत.पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे करणे अनिवार्य असताना शहरात सर्वच नियमांना हरताळ फासला गेला आहे. महापालिका की सार्वजनिक बांधकाम विभाग, यामध्ये रस्त्यांची विभागणी झाल्यामुळे दोन्ही विभागांद्वारे रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भर पावसाळ्यात अमरावतीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. हे सत्र केव्हा थांबेल, याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्ती कागदावरचदरवर्षी महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. मात्र, यंदा पावसाळा दीड महिना उशिराने सुरू झाला असतानाही रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. हे खड्डे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरणारे आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे खड्ड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असताना ती का करण्यात आली नाही, हा संशोधनाचा विषय आहे.