शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

निकालापूर्वीच गुणांकनाचे गोडवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:57 IST

‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०१८ चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच उत्तम गुणांकनाचे गोडवे गायिले जात आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण : शहराचे डायनॅमिक रॅकिंग ४२

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०१८ चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच उत्तम गुणांकनाचे गोडवे गायिले जात आहेत. देशभरातील ४०४१ शहरांच्या तुलनेत शहराची डायनॅमिक रॅकिंग ४२ अशी असल्याचा दावा होत असून प्रत्यक्षात ती रॅकिंग केवळ स्वच्छता अ‍ॅपवर आधारित असल्याची वस्तुस्थिती नाकारली जात आहे.स्वच्छ सर्वेक्षणात शहर देशभरात ४२ व्या क्रमांकावर असल्याचे ढोल बडवायचे आणि प्रत्यक्षात निकाल अपेक्षेनुरुप लागला नाही तर अधिनिस्थ यंत्रणेवर त्याचे खापर फुटू नये, या भूमिकेतून प्रशासनाने ४२ व्या रॅकिंगची वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशी अपेक्षा अमरावतीकरांकडून व्यक्त होत आहे.गतवर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात एकूण ५०० शहरांपैकी अमरावती २३१ व्या क्रमांकावर राहिले होते. त्या अनुषंगाने यंदा महापालिकेने जोरकस प्रयत्न केले. फेब्रुवारीत क्युसीआयच्या चमुने शहराची स्वच्छताविषयक तपासणी केली. या सर्वेक्षणात देशातील ४०४१ शहरे सहभागी झाली आहेत. १० मार्च रोजी संपुष्टात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल एप्रिल अखेर वा मे च्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. तत्पूर्वी केंद्रशासनाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित शहराचे डायनॅमिक रॅकिंग दैनंदिन प्रसिद्ध केले. यात शहराची बेस्ट रॅकिंंग २४ होती. १० मार्चला ते रॅकिंग ४२ व्या क्रमांकावर गेले.तथापि ते रॅकिंंग संपूर्ण देशभरातील असल्याचा भ्रम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत शहर ४२ व्या क्रमांकावर असल्याची हाकाटी पिटविली जात आहे. पहिल्या २५ मध्ये असल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला. मात्र ते रॅकिंग ४०४१ शहरांच्या तुलनेत नव्हे तर केवळ स्वच्छता अ‍ॅपचा वापर आणि १ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधील असल्याची वस्तुस्थिती नाकारण्यात आली. शहर २०० वा ३०० व्या क्रमांकापर्यंत गेल्यास ४२ वा क्रमांक सांगून दिशाभूल तर करण्यात आली नाही ना ? असा सवाल व्यक्त होऊ शकतो. देशभरात स्वच्छतेच्या बाबतीत ४२ व्या क्रमांकावर असल्याचे सांगून अनेकजण उर बडवून घेत आहेत. तथापि वस्तुस्थिती वेगळीच आहे.तीन घटकांवर रॅकिंगस्वच्छता अ‍ॅप युझर एंगेजमेंट, एजन्सी रिस्पॉन्सिव्हनेस व युझर हॅपीनेस या तीन घटकांवर डायनॅमिक रॅकिंंग रोजच्या रोज ठरविली गेली. त्यासाठी १ एप्रिल २०१७ ते १० मार्च २०१८ या कालावधीतील अ‍ॅप डाऊनलोडिंग,तक्रारींचे निराकरण आणि नागरिकांचा सकारात्मक अभिप्राय विचारात घेण्यात आला. त्यानंतर स्वच्छता अ‍ॅपवर आधारित शहराची डायनॅमिक रॅकिंग ठरविण्यात आली. ४००० गुणांंच्या स्वच्छता सर्वेक्षण परीक्षेशी त्या रॅकिंगचा सुतराम संबंध नाही.