शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

निकालापूर्वीच गुणांकनाचे गोडवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:57 IST

‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०१८ चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच उत्तम गुणांकनाचे गोडवे गायिले जात आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण : शहराचे डायनॅमिक रॅकिंग ४२

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०१८ चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच उत्तम गुणांकनाचे गोडवे गायिले जात आहेत. देशभरातील ४०४१ शहरांच्या तुलनेत शहराची डायनॅमिक रॅकिंग ४२ अशी असल्याचा दावा होत असून प्रत्यक्षात ती रॅकिंग केवळ स्वच्छता अ‍ॅपवर आधारित असल्याची वस्तुस्थिती नाकारली जात आहे.स्वच्छ सर्वेक्षणात शहर देशभरात ४२ व्या क्रमांकावर असल्याचे ढोल बडवायचे आणि प्रत्यक्षात निकाल अपेक्षेनुरुप लागला नाही तर अधिनिस्थ यंत्रणेवर त्याचे खापर फुटू नये, या भूमिकेतून प्रशासनाने ४२ व्या रॅकिंगची वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशी अपेक्षा अमरावतीकरांकडून व्यक्त होत आहे.गतवर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात एकूण ५०० शहरांपैकी अमरावती २३१ व्या क्रमांकावर राहिले होते. त्या अनुषंगाने यंदा महापालिकेने जोरकस प्रयत्न केले. फेब्रुवारीत क्युसीआयच्या चमुने शहराची स्वच्छताविषयक तपासणी केली. या सर्वेक्षणात देशातील ४०४१ शहरे सहभागी झाली आहेत. १० मार्च रोजी संपुष्टात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल एप्रिल अखेर वा मे च्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. तत्पूर्वी केंद्रशासनाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित शहराचे डायनॅमिक रॅकिंग दैनंदिन प्रसिद्ध केले. यात शहराची बेस्ट रॅकिंंग २४ होती. १० मार्चला ते रॅकिंग ४२ व्या क्रमांकावर गेले.तथापि ते रॅकिंंग संपूर्ण देशभरातील असल्याचा भ्रम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत शहर ४२ व्या क्रमांकावर असल्याची हाकाटी पिटविली जात आहे. पहिल्या २५ मध्ये असल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला. मात्र ते रॅकिंग ४०४१ शहरांच्या तुलनेत नव्हे तर केवळ स्वच्छता अ‍ॅपचा वापर आणि १ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधील असल्याची वस्तुस्थिती नाकारण्यात आली. शहर २०० वा ३०० व्या क्रमांकापर्यंत गेल्यास ४२ वा क्रमांक सांगून दिशाभूल तर करण्यात आली नाही ना ? असा सवाल व्यक्त होऊ शकतो. देशभरात स्वच्छतेच्या बाबतीत ४२ व्या क्रमांकावर असल्याचे सांगून अनेकजण उर बडवून घेत आहेत. तथापि वस्तुस्थिती वेगळीच आहे.तीन घटकांवर रॅकिंगस्वच्छता अ‍ॅप युझर एंगेजमेंट, एजन्सी रिस्पॉन्सिव्हनेस व युझर हॅपीनेस या तीन घटकांवर डायनॅमिक रॅकिंंग रोजच्या रोज ठरविली गेली. त्यासाठी १ एप्रिल २०१७ ते १० मार्च २०१८ या कालावधीतील अ‍ॅप डाऊनलोडिंग,तक्रारींचे निराकरण आणि नागरिकांचा सकारात्मक अभिप्राय विचारात घेण्यात आला. त्यानंतर स्वच्छता अ‍ॅपवर आधारित शहराची डायनॅमिक रॅकिंग ठरविण्यात आली. ४००० गुणांंच्या स्वच्छता सर्वेक्षण परीक्षेशी त्या रॅकिंगचा सुतराम संबंध नाही.