शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राज्यातील ‘दिव्यांगां’चा निधी अन्यत्र वळविण्यावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 4:12 PM

 दिव्यांगांच्या उत्थानासाठी राखीव ठेवलेला ३ टक्के निधी त्यांच्यावर खर्च करावा, कुठल्याही परिस्थितीत तो इतरत्र वळवू नये, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग करण्याची ताकीद ‘सरकार’ने दिली आहे.

ठळक मुद्देअन्यथा शिस्तभंगमहापालिका नगरपालिकांना निर्देश

प्रदीप भाकरे/अमरावतीआॅनलाईन लोकमत दिव्यांगांच्या उत्थानासाठी राखीव ठेवलेला ३ टक्के निधी त्यांच्यावर खर्च करावा, कुठल्याही परिस्थितीत तो इतरत्र वळवू नये, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग करण्याची ताकीद ‘सरकार’ने दिली आहे.महापालिका व नगरपालिकांना त्यांच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या कल्याणासाठी ३ टक्के निधी राखीव ठेवून तो इतर प्रयोजनार्थ न वळविता नागरी भागातील दिव्यांगांसाठीच खर्च करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने १४ नोव्हेंबर रजी परिपत्रक काढून दिव्यांगांच्या कल्याणार्थ ठेवलेला निधी वापराबाबत ‘गाईड लाईन्स’ दिल्या आहेत.राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांनी त्यांचा अर्थसंकल्पातील दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी ३ टक्के निधी राखीव ठेवावा, तो निधी दिव्यांगांसाठीच खर्च करणे अनिवार्य असेल. हा निधी रद्दही करता येणार नाही, अर्थात ज्या वर्षासाठी निधी राखीव ठेवला त्याच वर्षात तो खर्च करणे बंधनकारक असेल.३ टक्के निधी राखीव ठेवणे व तो निधी त्याच कामासाठी खर्च करणे अभिप्रेत असताना बहुतांश महापालिका व नगरपालिकांशी हा निधी आरक्षितच केला नाही तर कुठे अन्य कामासाठी वापरल्याचे निरीक्षण नगरविकासला नोंदविले. या निधीचा अन्य प्रयोजनासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री व नगरविकास राज्यमंत्र्यांनी बैठक घेतली. निर्देशप्रमाणे महापालिका आयुक्तांना दिव्यांगांसाठी राखीव ३ टक्के निधीचा वापराबाबत त्या आर्थिक वर्षाच्या मे आॅगस्ट, नोव्हेंबर व फेब्रुवारीच्या १५ तारखेपर्यंत त्यांच्या महापालिकांमधील आढावा घेणे बंधनकारक आहे. तो अहवाल नगरविकास विभागाला सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांचे विषय हाताळण्यासाठी एका उपायुक्तांवर जबाबदारी सोपवावी व त्याची माहिती शासनास सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.संपूर्ण खर्च अनिवार्यजर एखाद्या अधिकाऱ्याने ३ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यास, खर्च करण्यास कसूर केला, सदर निधी दिव्यांग व्यक्तीच्या प्रयोजनाव्यतिरिक्त अन्य कामासाठी वापरल्यास पूर्णपणे खर्च न केल्यास संबंधित अधिकारी शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र ठरणार आहे.मायक्रो प्लॅनिंगमहापालिका आयुक्त व मुख्याधिकारी दिव्यांगांच्या ३ टक्के निधीबाबत आर्थिक वर्षाच्या प्रारंभी ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे. त्याची संबंधित आर्थिक वर्षात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासने दिले आहेत. याबाबत आढावा मंत्रालयातील सह तथा उपसचिवही आढावा घेतील.

टॅग्स :Governmentसरकार