शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

रेशनचे धान्य विक्रीला, तीन रुपये किलोने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:16 AM

गल्लोगल्ली फिरून ग्रामीण भागातून खरेदी करतात तांदूळ वरूड/अमरावती : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदाराकडून खुल्या बाजारात विकले जात ...

गल्लोगल्ली फिरून ग्रामीण भागातून खरेदी करतात तांदूळ

वरूड/अमरावती : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदाराकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता लाभार्थीच तीन रुपये किलोचा तांदूळ १० ते १५ रुपये प्रतिकिलोने खुल्या बाजारात विकत आहेत. व्यापाऱ्यांचे दलाल गल्लोगल्ली फिरून रेशनचा तांदूळ खरेदी करीत आहेत. जिल्हाभरातून दररोज शेकडो क्विंटल तांदूळ अशाप्रकारे जमा केला जातो. महसूल प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.

गोरगरिबांनी नेलेला महिनावारी तांदूळ, गहू खुल्या बाजारात खरेदी करणारे रॅकेट सक्रिय असून ग्रामीणसह शहरी भागातूनसुद्धा केवळ १० ते १५ रुपये दराने तांदूळ खरेदी करणारे दलाल गल्लोगल्ली भटकंती करून १५ रुपये भावाने तांदूळ खरेदी करतात. भंगारवाल्यासारखे गावागावात जाऊन शेकडो क्विंटल तांदूळ व्यापाऱ्यांच्या घशात घातला जात असल्याची ओरड वरूड तालुक्यात आहे. एका दिवसाला १० ते १५ क्विंटल तांदूळ खरेदी करून व्यापाऱ्याला विकला जातो. व्यापारी या फिरस्त्या दलालांकडून घेतलेला तांदूळ ट्रकमधून भंडारा गोंदियाकडे रवाना करतो. फिल्टर करून तोच तांदूळ एक तर शासनाला किंवा खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलो दराने विकून शासनाच्या योजनेला हरताळ फासण्याचा प्रकार सुरू आहे.

बॉक्स

तीन रुपये किलो तांदूळ

कोरोनाकाळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली. यामध्ये प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्यात येते. यात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे सूत्र आहे, तर अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गतसुद्धा धान्यवाटप केले जाते.

बॉक्स

हे घ्या पुरावे

भातकुली

सरकारकडून तांदूळ भरपूर मिळत आहे. ते आपले अन्नच नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी गहू मिळविण्यासाठी तांदूळ विकत असल्याचे एका व्यक्तीने सांगितले.

बॉक्स

वरूड

तांदळाचा साठा करून तो जिल्ह्याबाहेर विकण्याचा प्रकार वारंवार उघडकीस येतो. अलीकडेच मोठा तांदूळ साठा पकडला गेला आहे.

कोट

केंद्र व राज्य शासनाकङून गरजू लाभार्थींना रेशन दुकानदारांमार्फत धान्य पुरवठा केला जातो. अशा प्रकारच्या धान्यविक्रीबाबत पुरवठा विभागाकडे कुणाचीही तक्रार नाही. तक्रार आल्यास चौकशी व कारवाई करू.

- अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी