शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

झोपेतच झाली घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:56 IST

दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने पै पै जोडून संसार उभा केला. हात मजुरीवर जीवनाचा हा डोलारा कसाबसा चालू असताना अचानक शनिवारी पहाटे पाच वाजता आतापर्यंतच्या आयुष्याची कमावलेल्या पूंजीची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. पती-पत्नी झोपेतच होते. अचानक घराने पेट घेतला. त्या पेटत्या घरातील आगीचा चटका या दाम्पत्यास लागला. क्षणात झोप उघडली आणि ते दोघेही घराबाहेर पळाले म्हणून बचावले. चिखलदरा तालुक्याच्या सोनापूर येथील या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदाम्पत्य बचावले : मेळघाटच्या सोनापूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने पै पै जोडून संसार उभा केला. हात मजुरीवर जीवनाचा हा डोलारा कसाबसा चालू असताना अचानक शनिवारी पहाटे पाच वाजता आतापर्यंतच्या आयुष्याची कमावलेल्या पूंजीची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. पती-पत्नी झोपेतच होते. अचानक घराने पेट घेतला. त्या पेटत्या घरातील आगीचा चटका या दाम्पत्यास लागला. क्षणात झोप उघडली आणि ते दोघेही घराबाहेर पळाले म्हणून बचावले. चिखलदरा तालुक्याच्या सोनापूर येथील या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.सुरेश शालिकराम हरसुले (३०, रा सोनापूर) असे घर जळालेल्या इसमाचे नाव आहे. सुरेश व त्यांची पत्नी रोशनी हे नेहमीप्रमाणे घरात झोपले असताना शनिवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान अचानक घराने पेट घेतला. यात भांडीकुंडी, कपडे, बिस्तरे, धान्य व साहित्य आदी जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सर्व गाव झोपेत असताना हरसुले दाम्पत्याने आरडाओरड केली. गावकरीही हातात मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन घर विझवण्यासाठी धावले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सर्व सामान जळाले. सुरेश व रोशनी या दांपत्याला आयुष्याची सुरुवात करतानाच आपल्या स्वप्नांच्या घराची राखरांगोळी पहावी लागली. त्यांच्या लग्नाला केवळ दोन वर्षे झालीत. हरसुले दाम्पत्य शिक्षित असल्याने मजुरी करीत असतानाही त्यांच्याकडे लॅपटॉप, मोबाईल होते. या आगीत त्यांचा लॅपटॉप, मोबाईल, मंगळसूत्र, आधार कार्ड, ओळखपत्र, टीसी आदी महत्त्वपूर्ण दस्तावेज सुद्धा जळून राख झाली. पटवारी एन. डी. तांडीलकर यांनी पंचनामा केला.

मेळघाटात घरांना आगी, अग्निशमन यंत्रणा नाहीमेळघाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जंगलासह आदिवासी पाड्यांमध्ये अग्नितांडवामुळे आदिवासींच्या घरांची राखरांगोळी होते. चुलीतील विस्तव, शॉर्टसर्किट, कचऱ्याच्या ढिगाऱ्यास लावलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आगी लागल्याची कारण आतापर्यंत पुढे आली आहे. गतवर्षी सेमाडोह येथे ढाण्यात ३० पेक्षा अधिक घरांची राखरांगोळी झाली होती. शनिवारी धारणी तालुक्याच्या लवादा येथे सुद्धा घराला आग लागली. सोनापूर येथे आग कशाने लागली, याचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही. जंगलात आगी लावल्या जात असल्याचे सर्वविदिेत सत्य आहे. मात्र ते विझवण्यासाठी कुठेच अग्निशमन यंत्रणा नाही.