शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतच झाली घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:56 IST

दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने पै पै जोडून संसार उभा केला. हात मजुरीवर जीवनाचा हा डोलारा कसाबसा चालू असताना अचानक शनिवारी पहाटे पाच वाजता आतापर्यंतच्या आयुष्याची कमावलेल्या पूंजीची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. पती-पत्नी झोपेतच होते. अचानक घराने पेट घेतला. त्या पेटत्या घरातील आगीचा चटका या दाम्पत्यास लागला. क्षणात झोप उघडली आणि ते दोघेही घराबाहेर पळाले म्हणून बचावले. चिखलदरा तालुक्याच्या सोनापूर येथील या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदाम्पत्य बचावले : मेळघाटच्या सोनापूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने पै पै जोडून संसार उभा केला. हात मजुरीवर जीवनाचा हा डोलारा कसाबसा चालू असताना अचानक शनिवारी पहाटे पाच वाजता आतापर्यंतच्या आयुष्याची कमावलेल्या पूंजीची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. पती-पत्नी झोपेतच होते. अचानक घराने पेट घेतला. त्या पेटत्या घरातील आगीचा चटका या दाम्पत्यास लागला. क्षणात झोप उघडली आणि ते दोघेही घराबाहेर पळाले म्हणून बचावले. चिखलदरा तालुक्याच्या सोनापूर येथील या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.सुरेश शालिकराम हरसुले (३०, रा सोनापूर) असे घर जळालेल्या इसमाचे नाव आहे. सुरेश व त्यांची पत्नी रोशनी हे नेहमीप्रमाणे घरात झोपले असताना शनिवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान अचानक घराने पेट घेतला. यात भांडीकुंडी, कपडे, बिस्तरे, धान्य व साहित्य आदी जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सर्व गाव झोपेत असताना हरसुले दाम्पत्याने आरडाओरड केली. गावकरीही हातात मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन घर विझवण्यासाठी धावले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सर्व सामान जळाले. सुरेश व रोशनी या दांपत्याला आयुष्याची सुरुवात करतानाच आपल्या स्वप्नांच्या घराची राखरांगोळी पहावी लागली. त्यांच्या लग्नाला केवळ दोन वर्षे झालीत. हरसुले दाम्पत्य शिक्षित असल्याने मजुरी करीत असतानाही त्यांच्याकडे लॅपटॉप, मोबाईल होते. या आगीत त्यांचा लॅपटॉप, मोबाईल, मंगळसूत्र, आधार कार्ड, ओळखपत्र, टीसी आदी महत्त्वपूर्ण दस्तावेज सुद्धा जळून राख झाली. पटवारी एन. डी. तांडीलकर यांनी पंचनामा केला.

मेळघाटात घरांना आगी, अग्निशमन यंत्रणा नाहीमेळघाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जंगलासह आदिवासी पाड्यांमध्ये अग्नितांडवामुळे आदिवासींच्या घरांची राखरांगोळी होते. चुलीतील विस्तव, शॉर्टसर्किट, कचऱ्याच्या ढिगाऱ्यास लावलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आगी लागल्याची कारण आतापर्यंत पुढे आली आहे. गतवर्षी सेमाडोह येथे ढाण्यात ३० पेक्षा अधिक घरांची राखरांगोळी झाली होती. शनिवारी धारणी तालुक्याच्या लवादा येथे सुद्धा घराला आग लागली. सोनापूर येथे आग कशाने लागली, याचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही. जंगलात आगी लावल्या जात असल्याचे सर्वविदिेत सत्य आहे. मात्र ते विझवण्यासाठी कुठेच अग्निशमन यंत्रणा नाही.