शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

झोपेतच झाली घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:56 IST

दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने पै पै जोडून संसार उभा केला. हात मजुरीवर जीवनाचा हा डोलारा कसाबसा चालू असताना अचानक शनिवारी पहाटे पाच वाजता आतापर्यंतच्या आयुष्याची कमावलेल्या पूंजीची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. पती-पत्नी झोपेतच होते. अचानक घराने पेट घेतला. त्या पेटत्या घरातील आगीचा चटका या दाम्पत्यास लागला. क्षणात झोप उघडली आणि ते दोघेही घराबाहेर पळाले म्हणून बचावले. चिखलदरा तालुक्याच्या सोनापूर येथील या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदाम्पत्य बचावले : मेळघाटच्या सोनापूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने पै पै जोडून संसार उभा केला. हात मजुरीवर जीवनाचा हा डोलारा कसाबसा चालू असताना अचानक शनिवारी पहाटे पाच वाजता आतापर्यंतच्या आयुष्याची कमावलेल्या पूंजीची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. पती-पत्नी झोपेतच होते. अचानक घराने पेट घेतला. त्या पेटत्या घरातील आगीचा चटका या दाम्पत्यास लागला. क्षणात झोप उघडली आणि ते दोघेही घराबाहेर पळाले म्हणून बचावले. चिखलदरा तालुक्याच्या सोनापूर येथील या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.सुरेश शालिकराम हरसुले (३०, रा सोनापूर) असे घर जळालेल्या इसमाचे नाव आहे. सुरेश व त्यांची पत्नी रोशनी हे नेहमीप्रमाणे घरात झोपले असताना शनिवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान अचानक घराने पेट घेतला. यात भांडीकुंडी, कपडे, बिस्तरे, धान्य व साहित्य आदी जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सर्व गाव झोपेत असताना हरसुले दाम्पत्याने आरडाओरड केली. गावकरीही हातात मिळेल त्या भांड्यात पाणी घेऊन घर विझवण्यासाठी धावले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सर्व सामान जळाले. सुरेश व रोशनी या दांपत्याला आयुष्याची सुरुवात करतानाच आपल्या स्वप्नांच्या घराची राखरांगोळी पहावी लागली. त्यांच्या लग्नाला केवळ दोन वर्षे झालीत. हरसुले दाम्पत्य शिक्षित असल्याने मजुरी करीत असतानाही त्यांच्याकडे लॅपटॉप, मोबाईल होते. या आगीत त्यांचा लॅपटॉप, मोबाईल, मंगळसूत्र, आधार कार्ड, ओळखपत्र, टीसी आदी महत्त्वपूर्ण दस्तावेज सुद्धा जळून राख झाली. पटवारी एन. डी. तांडीलकर यांनी पंचनामा केला.

मेळघाटात घरांना आगी, अग्निशमन यंत्रणा नाहीमेळघाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जंगलासह आदिवासी पाड्यांमध्ये अग्नितांडवामुळे आदिवासींच्या घरांची राखरांगोळी होते. चुलीतील विस्तव, शॉर्टसर्किट, कचऱ्याच्या ढिगाऱ्यास लावलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आगी लागल्याची कारण आतापर्यंत पुढे आली आहे. गतवर्षी सेमाडोह येथे ढाण्यात ३० पेक्षा अधिक घरांची राखरांगोळी झाली होती. शनिवारी धारणी तालुक्याच्या लवादा येथे सुद्धा घराला आग लागली. सोनापूर येथे आग कशाने लागली, याचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही. जंगलात आगी लावल्या जात असल्याचे सर्वविदिेत सत्य आहे. मात्र ते विझवण्यासाठी कुठेच अग्निशमन यंत्रणा नाही.