शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पावसामुळे विभागातील ३२१ किमीचे रस्ते, १८१ पूल क्षतिग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST

(कॉमन) संदीप मानकर - अमरावती : सप्टेंबर महिन्यात विभागातील पाचही जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच अनेक पुलांवरून पाणी वाहिल्याने ...

(कॉमन)

संदीप मानकर - अमरावती : सप्टेंबर महिन्यात विभागातील पाचही जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच अनेक पुलांवरून पाणी वाहिल्याने पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील तात्पुरत्या स्वरूपात ३२१.८५ किमीचे रस्ते खराब झाले आहेत. १८१ पूल क्षतिग्रस्त ठरल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाने दिली.

अकोला जिल्ह्यात पावसामुळे १८२.३० किमी रस्त्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्याची तातपुरत्या स्वरूपात डागडुजी करणे तसेच पुलांची दुरुस्ती करण्यासाठी निधी मिळावे, याकरिता ३०७२.९३ लाखांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला पाठविला.

अमरावती जिल्ह्यातील ५५.५० किमी, अकोला १८२.३० किमी, वाशिम २१.१० किमी, यवतमाळ ४७.३९ किमी तयार बुलडाणा जिल्ह्यात १५.५६ किमीचे रस्ते उखडले आहे. अनेक मार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तथा खड्डे बुजविणे गरजेचे आहे.

जिल्हा रस्ते किमी क्षतिग्रस्त पूल नुकसान (लाखात)

अमरावती ५५.५० ४७ ११२६.०३

अकोला १८२.३० ४४ १२८८

वाशिम २१.१० ३४ १४८.७२

यवतमाळ ४७.३९ २९ ३२१.९९

बुुुलडाणा १५.५६ २७ १८८.२५

एकूण ३२१.८५ १८१ ३०७२.९३

बॉक्स :

२११ पुलांच्या कामांचा प्रस्ताव

विभागात २११ क्षतिग्रस्त पूल कायमस्वरूपी दुरुस्तीकरिता प्रस्ताव बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. रस्ते, पुलाचे तात्पुरती कामे तसेच पुलांचे कायमस्वरूपी कामांसाठी एकूण ३८०.३६ कोटींची आवश्यकता असून त्याचा एकत्रित प्रस्ताव बांधकाम विभागाने शासनाकडे सादर करून निधीची मागणी केली आहे.

कोट

पावसाळ्यामुळे विभागात रस्त्याचे व पुलांचे मोठे नुकसान झाले. त्याचा एकत्रित प्रस्ताव शासनाकडे पाठविला. ज्या पुलांचे मोठे नुकसान झाले, ती कामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार कामे केली.

- गिरीश जोशी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती