शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

पावसामुळे कापूस भिजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:00 AM

अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

ठळक मुद्देतुरीचा फुलोर गळाला : संत्राही अडचणीत, शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या अवकाळी पावसाने पुन्हा झाडावरील फुटलेला कापूस भिजला, तर तुरीचा फुलोर गळून पडला आहे. संत्रा उत्पादकही अडचणीत आला आहे.अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा घराच्या टिनावर हा कापूस शेतकऱ्यांनी वाळविला. पण, त्यातली आर्द्रता कमी होऊ शकली नाही. अखेर पडत्या किमतीत शेतकºयाने वजनात कटोती देत कापूस विकला. दरम्यान पाऊस थांबला.शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्यात. परंतु १२ डिसेंबर रोजी रात्री दरम्यान धो-धो पाऊस बरसला. यात शेतातील होता नव्हता तोही कापूस ओला झाला. याच पावसाने तुरीचाही बार गळाल्याने नुकसान झाले. तुरीचा फुलोर गळून पडला. ढगाळ वातावरणाने तुरीवर रोग, अळ्याही वाढल्या आहेत. ९ हजार ३८६ हेक्टरमधील तूर पिकाचे नुकसान झाले आहेआधीच सुलतानी संकटाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने घाला घातला. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. रासायनिक खते व फवाऱ्यांचा वापर करत शेतकºयांनी कपाशीला उभारी दिली. मात्र, काल परवाच्या पावसाने पुन्हा कापसाच्या वाता झाल्या असून, दरही पडले आहेत. आता केवळ रबीतील गहू व हरभरा या दोन पिकांवर लाखो शेतकऱ्यांची मदार आहे.

आंबिया बहरवर परिणामसततच्या पावसात संत्रा उत्पादक शेतकऱ्याला संत्राझाडांना तडन देता आली नाही. दरम्यान पाऊस थांबल्यामुळे संत्राबगीचे आंबिया बहारकरिता शेतकऱ्यांनी तडनवर सोडले. परंतु गुरूवारी पडलेल्या अवकाळी पावसाने परत जमीन भिजली. यात त्या तडनवर परिणाम झाल्यामुळे पुढे फुटणाऱ्या आंबिया बहारावरही त्याचा परिणाम बघायला मिळणार आहे. बगिचे पाहिजे त्या प्रमाणात फुटणार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून गुरूवारचा पाऊस तालुक्यात सर्वदूर झाल्याची नोंद आहे.

टॅग्स :cottonकापूसRainपाऊस