शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

रेल्वे सुरक्षा बलाच्या ‘मिशन जीवन रक्षक’ ने वाचविले ६६ लोकांचे प्राण

By गणेश वासनिक | Updated: November 28, 2023 15:22 IST

एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान कार्यवाही, मध्य रेल्वेच्या आरपीएफने २.७७ कोटींचे प्रवाशांचे सामान केले परत.

अमरावती: मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) ही रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्यासह प्रवाशांच्या प्राणांचे रक्षण, पळून गेलेल्या मुलांचे रेस्क्यूअर्स आणि लगेज रिट्रीव्हर अशा अनेक भूमिका बजावतात. त्यानुसार एप्रिल-ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आरपीएफ जवानांनी ‘मिशन जीवन रक्षक’ अंतर्गत स्वतःचा जीव धोक्यात घालून ६६ जणांचे प्राण वाचविले आहेत.

यामध्ये मुंबई विभागात १९, भुसावळ विभागात १३, नागपूर विभागात १४, आणि सोलापूर विभागात ५ पुणे विभागात १५ जणांचा समावेश आहे. आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. प्रवाशी निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचविला आहे.

रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त ‘अमानत‘ या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे आणि त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू, प्रवाशांचे दागिने, रोख आदी परत मिळवून दिले आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू आर्थिक वर्षात, ऑपरेशन 'अमानत' अंतर्गत, आरपीएफ ने सुमारे ८५७ प्रवाशांचे २.७७ कोटी रुपयांचे सामान परत मिळवून दिले आहे. या ८५७ प्रवाशांपैकी ३७७ प्रवाशांचे १.६३ कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले.

यात भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाखांच्या किमतीचे सामान; नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख रूपये किमतीचे सामान; पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख रूपये किमतीचे सामान; सोलापूर विभाग ७२ प्रवाशांचे १३.९९ लाखांच्या किमतीचे सामानांचा समावेश आहे.

रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीला अडथळा आदी विविध सुरक्षा आव्हानांनाही तोंड द्यावे लागते. अत्यंत समर्पण सतर्कतेने आणि धैर्याने आरपीएफ आपली कर्तव्ये पार पाडतात. त्यामुळे प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू नये किंवा उतरू नये. जीव अमूल्य आहे.- शिवाजी मानसपुरे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :Amravatiअमरावतीrailwayरेल्वेPoliceपोलिस