शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

भारनियमनामुळे रबी हंगामही धोक्यात

By admin | Updated: December 6, 2014 00:51 IST

निवडणूक संपताच भारनियमनाचा कहर वाढला असल्याने शेतकऱ्यांचा रबीचा हंगाम धोक्यात आला आहे.

वरूड : निवडणूक संपताच भारनियमनाचा कहर वाढला असल्याने शेतकऱ्यांचा रबीचा हंगाम धोक्यात आला आहे. दिवस-रात्र एक करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भारनियमनामुळे रबी हंगामातील कपाशी, मिरचीसह संत्राचे पीक धोक्यात आले आहे. तालुक्यात शेतकऱ्यांना नियमीत वीज देण्याची मागणी केली आहे.वरुड तालुक्यावर निसर्गाची अवकृपा असल्याने कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला येथील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. गारपिटीच्या नुकसानीमुळे येथील शेतकरी पूर्णत: खचला आहे. संत्रा आंबिया बहरावर संत्रा उत्पादकांनी समाधान मानले. परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने शेतातील कपाशी, मिरची, सोयाबीन, तूर सुकायला लागली तर संत्रा फळेसुध्दा गळायला लागली. नर्सरीत लावलेली जंभेरीची रोपटेसुध्दा सुकायला लागली. विहिरीत पाणी आहे. परंतु वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. यामुळे अनेकवेळा वीज वितरण कंपनीकडे ेतक्रार करुनही दखल घेतली जात नाही. अभियंते म्हणतात, भारनियमनाचे अधिकार आमच्याकडे ेनाही. यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर आस्मानीसह सुलतानी संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष उफाळला असून कोणत्याही क्षणी असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तालुक्यातील गाडेगाव, शेंदूरजनाघाट, पुसलासह आदी वीज कार्यालयांवर शेतकऱ्यांनी धडक देऊन तातडीने भारनियमन कमी करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही भारनियमन कमी झालेले नाही. तालुक्यात कृषीपंपासाठी असलेला वीज पुरवठा वारंवार खंडीत असतो. भारनियमनसुध्दा वाढले असल्याने अनेकांना भारनियमनाचा फटका बसू लागला आहे.काही भागात विद्युत रोहित्रामध्ये बिघाड तर काही भागात वीजपुरवठा खंडित अशी अवस्था असल्याने कपाशी, मिरची, संत्राचे पिक बुडण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. विदर्भाचा कॅलिफार्निया म्हणून नावारुपास आलेल्या वरुड तालुक्यातील शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार, असे चित्र दिसू लागले आहे. एकीकडे निवडणूकीत कोरुटावधी रुपयाची उधळण तर दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होण्याची चिंता आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने तरी शेतकऱ्यावर सहानूभूती दाखवून वीज पुरवठा नियमीत करावा, अशी मागणी सर्वत्र केल्या जात आहे. वरुड तालुक्यात संत्रा, मिरची आणि कपाशी उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून डौलदार पिकांना ओलीत करण्याची गरज असताना वीज पुरवठ्या अभावी ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. भारनियमनामुळे तालुक्यातील लघुउद्योजकसुध्दा अडचणीत आले आहेत. बाजाराच्या दिवशी सायंकाळी विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांची चांगलीच परवड होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचाही खेळखंडोबा होत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवित्याचा विचार करून राज्य विद्युत कंपनीने तालुक्यातील भारनियमन ताबडतोब कमी केले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)