शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

भारनियमनामुळे रबी हंगामही धोक्यात

By admin | Updated: December 6, 2014 00:51 IST

निवडणूक संपताच भारनियमनाचा कहर वाढला असल्याने शेतकऱ्यांचा रबीचा हंगाम धोक्यात आला आहे.

वरूड : निवडणूक संपताच भारनियमनाचा कहर वाढला असल्याने शेतकऱ्यांचा रबीचा हंगाम धोक्यात आला आहे. दिवस-रात्र एक करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भारनियमनामुळे रबी हंगामातील कपाशी, मिरचीसह संत्राचे पीक धोक्यात आले आहे. तालुक्यात शेतकऱ्यांना नियमीत वीज देण्याची मागणी केली आहे.वरुड तालुक्यावर निसर्गाची अवकृपा असल्याने कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला येथील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. गारपिटीच्या नुकसानीमुळे येथील शेतकरी पूर्णत: खचला आहे. संत्रा आंबिया बहरावर संत्रा उत्पादकांनी समाधान मानले. परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने शेतातील कपाशी, मिरची, सोयाबीन, तूर सुकायला लागली तर संत्रा फळेसुध्दा गळायला लागली. नर्सरीत लावलेली जंभेरीची रोपटेसुध्दा सुकायला लागली. विहिरीत पाणी आहे. परंतु वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. यामुळे अनेकवेळा वीज वितरण कंपनीकडे ेतक्रार करुनही दखल घेतली जात नाही. अभियंते म्हणतात, भारनियमनाचे अधिकार आमच्याकडे ेनाही. यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर आस्मानीसह सुलतानी संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष उफाळला असून कोणत्याही क्षणी असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तालुक्यातील गाडेगाव, शेंदूरजनाघाट, पुसलासह आदी वीज कार्यालयांवर शेतकऱ्यांनी धडक देऊन तातडीने भारनियमन कमी करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही भारनियमन कमी झालेले नाही. तालुक्यात कृषीपंपासाठी असलेला वीज पुरवठा वारंवार खंडीत असतो. भारनियमनसुध्दा वाढले असल्याने अनेकांना भारनियमनाचा फटका बसू लागला आहे.काही भागात विद्युत रोहित्रामध्ये बिघाड तर काही भागात वीजपुरवठा खंडित अशी अवस्था असल्याने कपाशी, मिरची, संत्राचे पिक बुडण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. विदर्भाचा कॅलिफार्निया म्हणून नावारुपास आलेल्या वरुड तालुक्यातील शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार, असे चित्र दिसू लागले आहे. एकीकडे निवडणूकीत कोरुटावधी रुपयाची उधळण तर दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होण्याची चिंता आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने तरी शेतकऱ्यावर सहानूभूती दाखवून वीज पुरवठा नियमीत करावा, अशी मागणी सर्वत्र केल्या जात आहे. वरुड तालुक्यात संत्रा, मिरची आणि कपाशी उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून डौलदार पिकांना ओलीत करण्याची गरज असताना वीज पुरवठ्या अभावी ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. भारनियमनामुळे तालुक्यातील लघुउद्योजकसुध्दा अडचणीत आले आहेत. बाजाराच्या दिवशी सायंकाळी विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांची चांगलीच परवड होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचाही खेळखंडोबा होत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवित्याचा विचार करून राज्य विद्युत कंपनीने तालुक्यातील भारनियमन ताबडतोब कमी केले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)