शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पश्चिम विदर्भातील साडे सात लाख हेक्टरमधील रब्बी ‘रामभरोसे’, शेतकऱ्यांची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 11:58 IST

अपुऱ्या पावसाळ्यामुळे जमिनीत आर्द्रतेचा अभाव

गजानन मोहोड

अमरावती : मान्सूनच्या आगमनाला तीन आठवडे झालेला विलंब आणि ऑगस्टमधील पावसाच्या खंडाने पश्चिम विदर्भ यवतमाळ वगळता सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने रब्बी हंगामातील पेरणी कशी करावी, हा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत रब्बीचे ७.४६ लाख हेक्टर क्षेत्र रामभरोसेच राहणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

महिनाभरापासून रब्बीचा हंगाम सुरु झालेला असताना आतापर्यंत फक्त ३५,२०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. काही भागात संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने आता पेरणीला सुरुवात होत आहे. मात्र, जमिनीचे पुनर्भरण झालेले नसल्याने भूजल पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी हंगामापर्यंत पुरणार की नाही, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.

पश्चिम विदर्भात यंदाच्या रब्बी हंगामाकरिता ७,४५,८५१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत सद्य स्थितीत फक्त चार टक्केच क्षेत्रात पेरणी झालेली आहे. आता सोयाबीनचा हंगाम शेवटाला आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करीत आहे. प्रत्यक्षात जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने त्या भागात जिरायती हरभऱ्याची उगवणदेखील पुरेशी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

रब्बीची जिल्हानिहाय स्थिती

१) अमरावती जिल्ह्यात १,४७,३५० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सद्यस्थितीत २,८४८ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात १,६०,४०२ (४७६०), अकोला १,२१,१०४ (१०,२९०), वाशिम ८९,७८२ (४४९७) व बुलडाणा जिल्ह्यात २,२७,२१३ हेक्टरच्या तुलनेत १२,८०५ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे.

२) यंदाच्या रब्बीमध्ये सर्वाधिक ५.२७ लाख हेक्टरमध्ये हरभरा, १.८४ लाख हेक्टरमध्ये गहू, १७,३९१ ज्वारी १४,३२१ मका व ८३४ हेक्टरमध्ये करडईचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे.

रब्बीच्या पेरण्या सुरु झालेल्या आहेत. यंदा काही भागातील जमिनीत आर्द्रता कमी आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत पेरणीची टक्केवारी थोडी कमी राहण्याची शक्यता आहे.

- किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती