शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वनकर्मचाऱ्यांना डावलून कंत्राटींना दिले क्वाॅर्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक कार्यालय प्रसिद्धी झोतात ...

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक कार्यालय प्रसिद्धी झोतात आले आहे. मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यालयात सात ते आठ कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले असून, या सर्वांना निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याने वनविभागाचे क्वॉर्टर्स त्यांना निवासासाठी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी रात्री ८ वाजता गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेतील प्रमुख आराेपी गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वे स्थानकाहून २६ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. याच दिवशी वनमंत्रालयाने एम.एस. रेड्डी यांची नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बलप्रमुख) या मुख्यालयी बदली केली. दीपाली यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात विनोद शिवकुमार, एम.एस. रेड्डी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार रेड्डी व विनोद शिवकुमार हे दाेन्ही आयएफएस अधिकारी हे वनकर्मचाऱ्यांना मानसिक तणावात ठेवणे, आर्थिक नुकसान करणे आणि अपमानास्पद वागणूक देत होते, अशा अनेक तक्रारींचा ओघ आता वाढत आहे.

रेड्डी याने मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात विविध कामांसाठी सात ते आठ कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले आहेत. यात अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, लिपिक आदींचा समावेश आहे. यातील बहुतांश नागपूर येथील असल्याची माहिती आहे. मात्र, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना निवासाची सोय व्हावी, यासाठी रेड्डी याने नियमित वनकर्मचाऱ्यांना क्वॉर्टरमधून हाकलून लावले. त्याऐवजी मर्जीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयानजीकचे क्वॉर्टर दिले. स्वत:च्या लाभासाठी अनेक नियमबाह्य कामे रेड्डी हा करायचा. मात्र, तो वरिष्ठ अधिकारी असल्याने त्याच्या गैरप्रकाराला कोणीही आळा घालू शकत नव्हते. रेड्डी याच्या पाठीशी मंत्रालयातील अतिरिक्त सचिव असल्यामुळे वनविभागातील मराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्याने अन्याय केल्याचे बोलले जात आहे.

-------------

कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून नियमबाह्य कामे

मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात विविध कामांसाठी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, रेड्डी याने जी कामे शासकीय कर्मचाऱ्यांनाच करणे अनिवार्य आहे, ती कामेदेखील कंत्राटी अभियंते, सहायक अभियंते, लिपिकांकडून करवून घेतली. निविदा प्रक्रिया, नोटशिट लिहिणे, सर्वेक्षण आदी कामे नियमबाह्य झाली आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कशाच्या आधारे क्वाॅर्टर बहाल केले, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.