शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो गावांची तहान भागविणारी ‘पूर्णा माय’ कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:31 IST

तालुक्यातील पूर्णा धरणाची पातळी दहा वर्षानंतर पहिल्यांदाच अल्प पावसामुळे खालावली आहे.

ठळक मुद्देजलसंकट : २७ टक्केच जलसाठा शिल्लक, दिवसाआड पाणी

सुमीत हरकुटलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तालुक्यातील पूर्णा धरणाची पातळी दहा वर्षानंतर पहिल्यांदाच अल्प पावसामुळे खालावली आहे. धरणात ७ आॅगस्टपर्यंत अल्प जलसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात तालुक्यातील जलसमस्या गंभीर होणार आहे. शेकडो गावांची तहान भागवणारी पूर्णामाय पहिल्यांदाच कोरडी पडल्याची स्थिती आहे.जिल्ह्यातील १०७ गावांची तहान भागविण्याकरिता सातपुड्याच्या पायथ्याशी विश्रोळी गावाजवळ पूर्णा नदीवर प्रकल्प उभारण्यात आला आहे. याप्रकल्पात सध्या ९.६२३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाणीसाठ्याची टक्केवारी २७.२१ टक्के इतकी आहे. यामुळे कालव्याद्वारे शेतीला पाणी पुरवणे बंद करण्यात आले आहे तर चांदूरबाजार व भातकुली तालुक्यातील १०७ गावांना याधरणाचा पिण्याकरिता पाणीपुरवठा करण्यात येतो. दररोज यागावांना १९ दशलक्ष लीटर प्रतिदिवस शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्यात येतो तर ५४०० हेक्टर शेतीला सुद्धा पाणी पुरविण्यात येत होते. धरणात मागीलवर्षी आजपर्यंत २१.८८५२ द.ल.घ.मी. म्हणजेच ६१.८८ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यातुलनेत यावर्षी अल्प पावसामुळे हा जलसाठा अतिशय कमी असल्याने यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. मागीलवर्षी २ नोव्हेंबर रोजी धरणात ९४.६८ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे धरणातून कालव्याच्या मार्गे हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरविणे शक्य झाले होते. मात्र, यावर्षी पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही धरणात पाणी गोळा झालेले नाही. त्यामुळे यावर्षी नागरिकांनी पाणी जपून वापरावे म्हणजे पेयजलाची टंचाई भासणार नाही. यंदा धरणाचे दरवाजे एकदाही उघडण्यात आले नसल्याची माहिती पूर्णा प्रकल्पाचे उपअभियंता अक्षय इरजकर यांनी दिली.जलसंकट : २७ टक्केच जलसाठा शिल्लक, दिवसाआड पाणीपाण्याची काटकसर गरजेचीसद्यस्थितीत धरणात अल्प जलसाठा उपलब्ध असून विसर्ग करणाºया गेटवर फक्त १४ सें.मी. इतके पाणी आहे. या धरणातून चांदूरबाजार शहरात एक दिवसीआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र,पुढेही पाऊस न पडल्यास पाण्यासाठी परिसरात हाहाकार माजू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आजच पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे झाले आहे.तीर्थ विसर्जनासाठीही नाही पाणीआसेगाव पूर्णा : पूर्णानदीच्या काठावर अनेक गावे आहेत. या गावांमध्ये सणानिमित्त पूर्णानदीत तीर्थ विर्सजन करण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा अत्यल्प पावसामुळे पूर्णा नदीपात्रात पाणी नसल्याने नळाच्या पाण्याने नदीत तीर्थ विसर्जन करण्याची वेळ नागरिकांवर आली. नागपंचमीच्या दिवशी नागरिकांनी नळाचे पाणी पाईपच्या सहाय्याने नदीपर्यंत आणून नागपंचमीचे सोपस्कार पूर्ण केले. यावेळी देवाकडे पाण्यासाठी साकडे घालण्यात आले.