शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मनाईहुकूम झुगारून आमदार राणा गावांत शिरले, गावकऱ्यांना धान्यही वाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 22:21 IST

प्रवीण परदेशींशी बोलणी, केले धान्यवाटपही!

अमरावती : वनविभागाशी उडालेल्या सशस्त्र संघर्षानंतर मेळघाटातील आठ गावांमधील आदिवासींमध्ये प्रचंड दहशत आहे. गावांत दडून असलेल्या आदिवासींची उपासमार सुरू आहे. वनखात्याने मनाई केल्यामुळे स्थानिक आमदार वा पालकमंत्र्यांनी आदिवासींपर्यंत पोहोचण्याचे धैर्य दाखविले नाही. तथापि, शुक्रवारी आमदार रवि राणा यांनी वनखात्याचा मनाईहुकूम झुगारून त्या गावांत प्रवेश केला आणि तेथील नागरिकांना धान्यवाटप केलं.  

21 जानेवारी रोजी केलपाणी व गुल्लरघाट भागात पुनर्वसित आदिवासींचा पोलीस व वनविभागाशी सशस्त्र संघर्ष उडाला. केलपाणी, धारगड, गुल्लरघाटसह आठही गावांबाहेर अटकेसाठी वनखात्याचे जवान तैनात असल्याने आठही गावांमधील लोक घटनेनंतर गावाबाहेरच निघाले नाहीत. आले की अटक करायची, अशी योजना प्रशासनाची होती. धान्य संपल्यामुळे आदिवासींची उपासमार सुरू झाली. राणा यांनी आदिवासींना धान्य वितरीत केले. आदिवासींना दशहतीत ठेवणारा बंदोबस्त मागे घ्या, राहण्यासाठी आणि शेतीसाठीची जमीन अमरावती जिल्ह्यातच द्या, अशी मागणी त्यांनी प्रवीण परदेसी यांच्याकडे फोनद्वारे केली. आठ गावांत सुमारे दोन हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. 

रेड्डी म्हणाले; जाऊ नका!मेळघाटातील त्या आठ गावांमध्ये जाऊ नये, अशी सूचना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी आ. रवि राणा यांना केली. तेथे गेल्यास आम्हाला गुन्हे दाखल करावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, राणा यांनी रेड्डींचा इशारा जुमानला नाही.  

प्रवीण परदेशींची मध्यस्थीआ. रवि राणा हे केलपाणी व अन्य गावात आदिवासींशी संवाद साधत असताना, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी राणा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनीही मेळघाटमध्ये न जाण्याची विनंती राणा यांना केली. ती नाकारून राणा यांनी प्रकल्पबाधितांची समस्या परदेशी यांना ऐकविल्या. त्यावर त्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून, तोडगा काढण्यासाठी लवकरच एक बैठक लावण्याची हमी परदेशी यांनी राणा यांना दिली. मध्यप्रदेशातील आदिवासी बांधव आणि देशभरातील आदिवासी संघटना मेळघाटात या अन्यायाविरुद्ध एकवटू शकतात, असा इशारा आमदार राणा यांनी सीएमओला दिल्यावर एकूणच गांभीर्य लक्षात घेतले गेले. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा नवा प्रस्ताव !मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ज्या आठ गावांचे पुनर्वसन अकोला जिल्ह्यात करण्यात आले. ते आदिवासी आठवड्यापूर्वी  मेळघाटातील मूळ गावी परतले होते. मेळघाटालगतच अमरावती जिल्ह्यातच पुनर्वसन व्हावे, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने मेळघाटात ई-क्लास जमिनीचा शोध घेऊन शासनाकडे नव्याने प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने चालविल्या आहेत. जागांच्या पुनसर्वेक्षणाची प्रक्रिया विनाविलंब करण्यात येईल, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :MLAआमदारRavi Ranaरवी राणाTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाMelghatमेळघाट