शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

नगरविकास मंत्रालयात अडकली स्वच्छ प्रभागांची पारितोषिके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 18:30 IST

स्वच्छ वॉर्ड स्पर्धा संपुष्टात आल्याच्या साडेतीन महिन्यानंतरही या स्पर्धांचे निकाल नगरविकास विभागाकडे रखडले आहेत. विजेते वॉर्ड कोणते, पुरस्काराची रक्कम कुणी द्यायची, कुठल्या शीर्षातून ती खर्च करायची, याबाबत या खात्याकडून स्पष्ट निर्देश नसल्याने नपा- महापालिकांचीही गोची झाली आहे.

 अमरावती -  स्वच्छ वॉर्ड स्पर्धा संपुष्टात आल्याच्या साडेतीन महिन्यानंतरही या स्पर्धांचे निकाल नगरविकास विभागाकडे रखडले आहेत. विजेते वॉर्ड कोणते, पुरस्काराची रक्कम कुणी द्यायची, कुठल्या शीर्षातून ती खर्च करायची, याबाबत या खात्याकडून स्पष्ट निर्देश नसल्याने नपा- महापालिकांचीही गोची झाली आहे. शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे या स्पर्धेतील विजेत्या प्रभागांची नावे, पारितोषिक रक्कम व ती पारितोषिके कुठून द्यायची, असा साराच मामला प्रलंबित आहे. 

स्वच्छ महाराष्टÑ अभियानामध्ये सहभागी होण्यास लोकांना उद्युक्त कारणे, हगणदारीमुक्त व स्वच्छतेबाबत शहरांचे कायमस्वरूपी क्षमता वाढविणे, स्वच्छ महाराष्ट्राच्या दिशेने जो प्रवास चालला आहे - त्यामध्ये समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करणे, यासाठी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली. याच काळात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ची अंमलबजावणी सुरू असल्याने या स्पर्धेलाही व्यापक प्रतिसाद मिळाला. मार्च महिन्यात प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील या स्पर्धेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी व २० मार्च २०१८ पर्यंत गुणानुक्रमानुसार पहिली तीन बक्षिसे देण्यात यावी, असे निर्देश नगरविकासने दिले होते. या स्पर्धेची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करून घेण्यात आल्यावर त्याबाबतचा अहवाल २५ मार्चपर्यंत राज्य शासनास पाठवावा; तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर या बक्षीस योजनेसाठी कोणाला निधीमधून खर्च करावा, याबाबतचे आदेश शासन देईल, असे मंत्रालयातील उपसचिव सुधाकर बोबडे यांनी म्हटले होते. त्यानुसार बहुतांश सर्व महापालिका, नगरपालिकांनी त्याबाबतचे अहवाल नगरविकास मंत्रालयाकडे पाठविले. मात्र, एप्रिल आणि त्यापाठोपाठ जून संपत असताना या बक्षीस योजनेसाठी कोणत्या निधीमधून खर्च करावा, याबाबतचे स्पष्ट आदेश नगरविकास विभागाने दिलेले नाहीत. महापालिका प्रशासनाने याबाबत बोबडे यांच्याही संपर्कही साधला. मात्र, २४ जूनपर्यंत तरी निकाल आणि पारितोषिकाबाबत नगरविकास विभागाने कोणतेही आदेश पारित केले नाहीत.

पालिका स्तरावर सामसूम अमरावती महापालिका क्षेत्रात कोणत्या प्रभागात प्रभावीपणे स्वच्छ वॉर्ड स्पर्धा राबविण्यात आली, पहिले तीन स्वच्छ प्रभाग कोणते, याबाबतचा अहवाल त्रयस्थ संस्थेने महापालिकेला दिला आहे. मात्र, ती रक्कम कोणत्या निधीतून खर्च करायची, याबाबतचे निर्देश नसल्याने पालिकेने निकाल गुलदस्त्यात ठेवले आहेत. 

असे आहेत पारितोषिकेअ व ब वर्ग महापालिकांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ५० लाख, द्वितीयसाठी ३५ लाख व तृतीयसाठी २० लाख, तर क व ड महापालिकांतील पहिल्या तीन स्वच्छ प्रभागांना अनुक्रमे ३०, २० व १५ लाख रुपये बक्षिसे देण्यात येतील. अ वर्ग नगरपालिकांमधील स्वच्छ प्रभागांना अनुक्रमे ३०, २० व १५ लाख, ब वर्ग नगर परिषदांना २०, १५ व १० लाख, तर क वर्ग नगर परिषदांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ प्रभागाला अनुक्रमे १५ लाख, १० लाख व ५ लाख मिळतील.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAmravatiअमरावती