शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

महिला रोजगाराला प्राधान्य, दोन कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 1:27 AM

शेतकरी विधवा, परित्यक्ता व कुटुंबातून दुरावलेल्या एकल महिलांचे प्रश्न सरकारला कळावेत, वंचित-शोषित या वर्गासाठी शासनाने धोरण ठरवावे, या मुद्द्यावर अमरावती येथे एकल महिला किसान संघटनच्यावतीने रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देविजया रहाटकर : एकल महिला परिषद, धोरण ठरविण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी विधवा, परित्यक्ता व कुटुंबातून दुरावलेल्या एकल महिलांचे प्रश्न सरकारला कळावेत, वंचित-शोषित या वर्गासाठी शासनाने धोरण ठरवावे, या मुद्द्यावर अमरावती येथे एकल महिला किसान संघटनच्यावतीने रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित परिषदेला मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, गोव्यासह मराठवाड्यातील दोन जिल्हे आणि विदर्भातील सात जिल्ह्यांतील एकल महिला उपस्थित होत्या.मुंबई येथील अ‍ॅक्शन एड या संस्थेच्या निरजा भटनाकर व यवतमाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन वैशाली येडे यांनी परिषदेचे उद्घाटन केले. खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, कमर फातिमा (मध्य प्रदेश), सीमा कुलकर्णी, किसान मित्रच्या डॉ. उपमा दिवाण, अपेक्षा होमिओ सोसायटीच्या डॉ. मधुकर गुबळे, संजीवनी पवार, मारोती चवरे, सुनील धनविजय, दीपाली शर्मा, भावना हस्तक, विलास लोखंडे उपस्थित होते.याप्रसंगी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी संबोधित केले. राज्यातील ४० लाख महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने दोन कोटींची तरतूद केली आहे. येत्या रक्षाबंधनाच्या पर्वावर त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रहाटकर यांनी दिली.यावेळी आमदार बच्चू कडू व आमदार यशोमती ठाकूर यांनी एकल महिलांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या सभागृहात महिलांच्या समस्या विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले. खासदार नवनीत रवि राणा यांनीसुद्धा महिलांना धीर देत संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. राज्यातील ४० लाख महिलांचे पती कर्जापायी, आर्थिक संकटाचा सामना करू न शकल्याने मृत्यू पावले. त्यानंतर त्यांच्या परिवाराचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी या अर्धांगिनींवर आपसुकच आली. त्यामुळे विविध संकटांचा सामना करताना महिलांची वाताहत होत असल्याचा सूर परिषदेत निघाला.