शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त अर्थव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचा घात : विजय जावंधिया

By admin | Updated: December 24, 2016 01:43 IST

नापिकी असताना देखील १९७२ मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. परंतु आजमितीला नापिकी

पुष्प पहिले : डॉ.पंजाबराव देशमुख व्याख्यानमाला अमरावती : नापिकी असताना देखील १९७२ मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. परंतु आजमितीला नापिकी सोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे हा दुर्देवी प्रसंग शेतकऱ्यांवर का आला, या गंभीर समस्येचा शोध घेणे गरजेचे असून मुक्त अर्थव्यवस्थेमुळेच शेतकऱ्यांचा घात झाल्याचा आरोप विजय जावंधिया यांनी केला. श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा आयोजित डॉ.पंजाबराव देशमुख व्याख्यामालेचे प्रथम पुष्प विजय जावंधिया यांनी गुंफले. व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, समिती सचिव प्राचार्य स्मिता देशमुख, राजेश मिरगे उपस्थित होते. शेतीचे अर्थशास्त्र या विषयावर बोलताना त्यांनी आजचा आणि कालचा शेतकरी या परिस्थितीबाबत सविस्तर दाखले दिले. बाजारपेठेम्त मालाची मंदी असतानाही आयात वस्तुवर कर लावला जात नाही. त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. खुल्या व मुक्त अर्थव्यवस्थेमुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत सापडला आहे. शेतकऱ्याचे अर्थशास्त्र पूर्णत: कोलमडून गेले आहे. शेतात राबणाऱ्या मजुरांची मजुरी वाढल्याशिवाय गरिबी कशी दूर होणार हा प्रश्न निर्माण होतानाच जावंधिया यांनी शासनाच्या अन्न सुरक्षा बिलाला विरोध दर्शवीत हे गरिबांना गुलाम बनविणारे शस्त्र असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडत असताना आयात होणाऱ्या वस्तुवर कर लावल्या जात नाही. याबाबत शंका उपस्थित करून शेतीचे खरे अर्थशास्त्र बाहेर का येत नाही, कोण ते लपविते याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांचे विक्रमी उत्पन्न दाखविले जाते. परंतु त्याचे कष्ट, त्या पिकामुळे आत्महत्या केलेल्या व उद्धवस्त झालेल्या कुटुंबाची स्टोरी कोणी दाखवत नाही. आपण जी व्यवस्था स्वीकारली तिच्याविरुद्ध उभे राहून हक्क मागणारी शेतकऱ्यांची मजबूत संघटना उभी व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. शेतीचा विकास हे शेतकऱ्यांच्या वाढलेल्या उत्पन्नावर मोजावे. आज विविध प्रकारचे आयोग, नीती ठरविले जाते. परंतु शेतकऱ्यांना कुठलाही नीती, वेतन आयोग नाही. आजच्या खाऊजा संस्कृतीत शेतीचे प्रश्न हरविले आहे. नुसती ग्रामगीता वाचली तरी शेतीचे अर्थशास्त्र बरोबर होऊ शकते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणातून अरुण शेळके यांनी शेतकऱ्यांचा कणा मोडणारा खरा गुन्हेगार राजसिंहावर बसलेला आहे, असा आरोप केला. मजुराला मिळते तेवढाही रोज शेतकऱ्याच्या नशिबी पडत नाही. कृषक उन्नतीचा वारसा शेतकऱ्यांनी जोपासावा. शेतकऱ्यांची ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य स्मिता देशमुख, संचालन राजेश मिरगे व आभार प्रदर्शन किशोर फुले यांनी केले. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य वि. गो. भांबुरकर, स्वीकृत सदस्य प्राचार्य वि. गो. ठाकरे, अरुण सांगोळे, अरविंद मंगळे, दिलीप जाणे, प्राचार्य चिखले, प्राचार्य वनिता काळे व संस्थेचे सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)