शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत तंत्राव्दारे बहरली डाळिंबे

By admin | Updated: March 14, 2015 00:42 IST

कृषी व्यवसायात नवनवीन बदल होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे.

गजानन मोहोड अमरावतीकृषी व्यवसायात नवनवीन बदल होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे. मूळचे तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना बाजार येथील सध्या शहरात स्थायिक झालेले राजेश महादेवराव कुरळकर यांची बोरगाव (धर्माळे) येथील १० एकरातील डाळांबाची बाग पाहिल्यावर याची प्रचिती येते. शेती करायची, परंतु ध्येय समोर ठेवून, यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र पालथा घातला. शेकडो बगीच्यांना भेटी दिल्यात, चर्चा केली व फक्त डाळिंबाची लागवड करायचा निश्चय केला. यासाठी वाशीम जिल्ह्यातील बागायतदार कुलदीप पाटील यांचा सल्ला मोलाचा ठरला. सध्या त्यांनी लागवड केलेली डाळिंबाची ३ हजार झाडे दीड वर्षांची झाली आहेत. पहिला बहर आला असून एका झाडाला सध्या १०० ग्रॅम वजनाची ७५ ते १०० फळे आहेत. या बहराला बाजार भाव योग्य मिळाल्यास ५० ते ६० लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माळरानात नव्हे पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या बगीच्यात तर आपण उभे नाही, असा भास व्हावा, अशा प्रकारे डाळिंबाचा बगीचा बहरला आहे. वास्तविकत: कुरळकर यांचा व्यवसाय ठेकेदारीचा. परंतु शेती करायचीच असा निश्चय करुन त्यांनी नांदगाव पेठ लगतच्या बोरगाव (धर्माळे) या शिवारात १० एकर शेती विकत घेतली. ही मध्यम स्वरुपाची जमीन. येथे विहीर खोदून ३००० भगवा वानाची डाळिंबाची रोपे जालना येथून आणली. दोन रोपांच्या मधात १० फुटाचे अंतर व १४ फुटाचा रस्ता मशागतीसाठी अशी लागवड केली. खासगी कृषी कन्संल्टंटचा सल्ला ते घेतात. दर दोन आठवड्यांनी त्यांची भेट व मार्गदर्शन त्यांना मिळते. शेती करायची परंतु, कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुनच असे मनाशी ठाम ठरवून सुरूवात केली. दररोज सकाळी ७ त ११ पर्यंत ते स्वत: राबतात. रोपांना ड्रिप पद्धतीने सिंचन करण्यात येते. सेंद्रीय खत, गांडूळ खत, शेणखत याचाच वापर करण्यात येतो. निंबोळी अर्काचा फवारादेखील मारण्यात येतो. यासाठी त्यांनी गांडूळ खताचा प्लाँट शेतात तयार केला आहे. मशागतीसाठी छोट्या ट्रॅकरचा वापर करण्यात येतो. कीटकनाशक फवारणीसाठी छोट्या ट्रॅक्टरला ‘ब्लोअर’ यंत्र जोडून फवारणी करण्यात येते. सध्या ही झाडे दीड वर्षांची झाली आहे. वर्षाला तीन बहर डाळींबाचा येतात. यामध्ये पाणी मुबलक असल्यास हस्त, कमी असल्यास मृग व आंबिया बहर उपयोगाचा असतो, असे त्यांनी सागितले. सुरूवातील उत्पादन खर्च येतो. परंतु हा उत्पादन खर्च पहिल्याच बहरात निघतो. नंतर झाडांची वाढ होते. फळांच्या संख्येतही वाढ होते. त्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे. मात्र उत्पन्न अधिक आहे. प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा सहकार्याने शेतीमधून हमखास असे उत्पन्न घेता येते. पहिला बहर एकरी किमान ५ लाखांचे उत्पन्न देतो. दरवर्षी फळांची संख्या वाढून कमी उत्पादन खर्चात भरघोस उत्पन्न घेता येते, असे त्यांनी सांगितले.पहिले नियोजन, मग सुरूवातपहिले नियोजन करावे व मग सुरूवात करावी, हा यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे. शेती करायची तर काय करावे, यासाठी राज्यात ३००० किमी फिरलो, प्रगत शेती आपल्या भागात कशी करता येईल याचे नियोजन केले. डाळिंबाची बाग करायची असे मनासी ठाम करुन सुरूवात केली. दरदिवशी किमान सहा तास शेतीला देतो. नंतर इतर व्यवसाय सांभाळतो. शेतीचे दर दिवसाचे नियोजन ठरले आहे. दर १५ दिवसांनी खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेतो. पहिलाच बहर आला आहे. लोकं भेट देतात, योग्य भाव न मिळाल्यास स्वत: मार्केटिंग करु ६० ते १०० रुपये किलोपर्यंत भाव आहे. या अंदाजाने किमान ५० ते ६० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. जिल्ह्यातील युवकांनी पारंपरिक शेतीसोबत प्रगत कृषितंत्रज्ञानाचा वापर करावा, असे राजेश कुरळकर यांनी सांगितले.१८ महिन्यांनंतर बहराला सुरूवातसंत्र्याचे उत्पादन साधारणपणे पाचव्या वर्षांपासून सुरू होते. याउलट डाळिंबाला २५ ते १८ महिन्यांनंतर पहिला बहर घेता येतो. यासाठी तंज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार झाडाची फवारणी करुन पानगळ करावी लागते. दोन आठवड्यांनंतर झाडाला फुले येण्यास सुरूवात होते. झाडाच्या क्षमतेनुसार फुले ठेवावी. कुरळकर यांच्या शेतातील दीड वर्षांच्या एका झाडाला साधारणपणे ७५ ते १०० फळे आहेत. एका फळाचे वजन १०० ग्रॅम आहे. फळाच्या दर्जाची काळजी घ्यावी लागते. दररोज काय काम करावे, याचा तपशील तयार आहे.