शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

ट्विटर, फेसबुकवरील आक्षेपार्ह ‘पोस्ट’ची चिरफाड, पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 18:31 IST

ट्विटर व फेसबुकवरील 'त्या' पोस्ट शहरात जातीय तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी ‘वन टू वन’ पोस्टची पाहणी केल्यानंतर कोतवाली, राजापेठ पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची कारवाई, जातीय तेढ

अमरावती : मागील आठवड्यातील १२ व १३ रोजी उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हल्लेखोर व आंदोलकांची धरपकड सुरू असताना इंटरनेट बंदी उठल्यानंतर ट्विटर, फेसबुकवरील आक्षेपार्ह ‘पोस्ट’ची चिरफाड सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल निर्माण करण्यात आला असून, ‘वन टू वन’ पोस्टची पाहणी केल्यानंतर ट्विटर व फेसबुकवरील पाच पोस्टप्रकरणी पाच जणांविरुद्ध भादंविच्या ५०५ (२) या गंभीर व अजामीनपात्र कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तीन आक्षेपार्ह पोस्ट ट्विटरवर तर, दोन पोस्ट फेसबुकवर अपलोड करण्यात आल्या आहेत. दोन भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने त्या पोस्ट करण्यात आल्या. त्यात आक्षेपार्ह फोटोदेखील पाठविण्यात आले. ट्विटरवरील तीन पोस्ट अनुक्रमे १३ नोव्हेंबरला सायंकाळी ६.१, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ व त्याच दिवशी सकाळी ९.२२ मिनिटांनी अपलोड करण्यात आल्या तर फेसबुकवर १५ नोव्हेंबर सकाळी ११.५७ व १९ नोव्हेंबरला दुपारी ३.४२ मिनिटांनी अपलोड केल्याचे निदर्शनास आले आहे.

ट्विटरवरील ‘त्या’ पोस्टमुळे जातीय तेढ?

ट्विटर व फेसबुकवरील त्या पोस्ट शहरात जातीय तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली, राजापेठ पोलिसांनी पाच अकाऊंट धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शहरात १२ नोव्हेंबरला दुपारनंतर निघालेल्या मोर्चादरम्यान दगडफेक, लूटमार करण्यात आली होती. त्या निषेधार्थ १३ नोव्हेंबरला भाजपने बंदची हाक दिली. त्यादिवशीदेखील अनेक भागांत हिंसाचार उफाळून आला १३ नोव्हेंबरला सकाळीच संचारबंदी व इंटरनेट बंदी लागू करण्यात आली. इंटरनेट बंदी असताना विशिष्ट समुदायाचे नाव नमूद असलेल्या अकाैंटधारकांनी त्या दोन घटनांच्या अनुषंगाने दोन भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने छायाचित्रे व पोस्ट प्रसारित केली.

काय आहे ५०५ (२)?

ज्या विधानांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येईल. समाजांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होईल अशा विधानांबाबत भारतीय दंडविधानाची कलम ५०५ (२) आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंत शिक्षा, दंड वा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर