शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

ट्विटर, फेसबुकवरील आक्षेपार्ह ‘पोस्ट’ची चिरफाड, पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 18:31 IST

ट्विटर व फेसबुकवरील 'त्या' पोस्ट शहरात जातीय तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी ‘वन टू वन’ पोस्टची पाहणी केल्यानंतर कोतवाली, राजापेठ पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची कारवाई, जातीय तेढ

अमरावती : मागील आठवड्यातील १२ व १३ रोजी उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हल्लेखोर व आंदोलकांची धरपकड सुरू असताना इंटरनेट बंदी उठल्यानंतर ट्विटर, फेसबुकवरील आक्षेपार्ह ‘पोस्ट’ची चिरफाड सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल निर्माण करण्यात आला असून, ‘वन टू वन’ पोस्टची पाहणी केल्यानंतर ट्विटर व फेसबुकवरील पाच पोस्टप्रकरणी पाच जणांविरुद्ध भादंविच्या ५०५ (२) या गंभीर व अजामीनपात्र कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तीन आक्षेपार्ह पोस्ट ट्विटरवर तर, दोन पोस्ट फेसबुकवर अपलोड करण्यात आल्या आहेत. दोन भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने त्या पोस्ट करण्यात आल्या. त्यात आक्षेपार्ह फोटोदेखील पाठविण्यात आले. ट्विटरवरील तीन पोस्ट अनुक्रमे १३ नोव्हेंबरला सायंकाळी ६.१, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ व त्याच दिवशी सकाळी ९.२२ मिनिटांनी अपलोड करण्यात आल्या तर फेसबुकवर १५ नोव्हेंबर सकाळी ११.५७ व १९ नोव्हेंबरला दुपारी ३.४२ मिनिटांनी अपलोड केल्याचे निदर्शनास आले आहे.

ट्विटरवरील ‘त्या’ पोस्टमुळे जातीय तेढ?

ट्विटर व फेसबुकवरील त्या पोस्ट शहरात जातीय तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली, राजापेठ पोलिसांनी पाच अकाऊंट धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शहरात १२ नोव्हेंबरला दुपारनंतर निघालेल्या मोर्चादरम्यान दगडफेक, लूटमार करण्यात आली होती. त्या निषेधार्थ १३ नोव्हेंबरला भाजपने बंदची हाक दिली. त्यादिवशीदेखील अनेक भागांत हिंसाचार उफाळून आला १३ नोव्हेंबरला सकाळीच संचारबंदी व इंटरनेट बंदी लागू करण्यात आली. इंटरनेट बंदी असताना विशिष्ट समुदायाचे नाव नमूद असलेल्या अकाैंटधारकांनी त्या दोन घटनांच्या अनुषंगाने दोन भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने छायाचित्रे व पोस्ट प्रसारित केली.

काय आहे ५०५ (२)?

ज्या विधानांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येईल. समाजांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होईल अशा विधानांबाबत भारतीय दंडविधानाची कलम ५०५ (२) आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंत शिक्षा, दंड वा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर