शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

आ अब लौट चले... कारागृहाचे कैद्यांना आवाहन, प्रशासनाकडृून थेट पत्रव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 16:52 IST

कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश  कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देपोलीस उपअधीक्षकांनाही पत्र 

गणेश वासनिकअमरावती : कोरोना काळात कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी अटी, शर्थेीच्या आधारे काही कैद्यांना कोरोना आकस्मिक अभिवचन रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र, दोन वर्ष कारागृहाबाहेर राहून शिक्षाधीन कैदी चांगलेच रमले आहेत. मात्र, राज्याच्या गृह विभागाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेल्या कैद्यांना कारागृहात परत येणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने कारागृहातून थेट रजेवरील कैद्यांना परत येण्यासाठी पत्रव्यवहार केला जात आहे. काही कैदी कारागृहात परतले आहेत.

राज्याच्या कारागृह विभागाचे उपसचिव अनिरूद्ध जेवळीकर यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवरील कैद्यांना पुन्हा कारागृहात परतण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील कारागृहातून रजेवर गेलेले तब्बल पाच हजार कैदी परत आणण्यासाठी कारागृह अधीक्षकांनी कैद्यांना पत्र पाठविण्यासह संबंधित यंत्रणांना सुद्धा पत्रव्यवहार चालविला आहे.

गत १५ दिवसात कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवरील ५० टक्के कैदी कारागृहात परतल्याची माहिती आहे. रजेवरील कैदी पुन्हा कारागृहात कसे परत येतील, यासाठी पोलीस निरीक्षक, जामिनदारांना पत्र पाठवून अवगत केेले जात आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपायुक्तांना सुद्धा पत्रव्यवहार केला जात आहे. मे अखेरपर्यत रजेवरील कैदी परत येण्यासाठी कारागृह प्रशासनाने नियोजन आखले आहे.काही कैदी अंडरग्राऊंड

कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश  कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अभिवचन रजेसाठी ज्यांनी जामीन घेतला, त्यांना पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्याने भंबेरी उडाली आहे. रजेवरील कैदी कारागृहात परत आणण्यासाठी पोलीस प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. यात काही कैदी अट्टल गुन्हेगार, खून, दरोड्यातील असल्याची माहिती आहे. अभिवचन रजेवरील कैद्यांना थेट पत्र पाठविले जात आहे. ठाणेदार, जामीनदार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा पत्रव्यवहार करण्यात येत आहे. आतापर्यत ६५ कैदी अभिवचन रजेवरून परतले आहेत. ३०० च्या जवळपास कैदी परत आणण्यासाठी नियाेजन सुरू आहे. - भारत भोसले, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगPoliceपोलिसAmravatiअमरावतीPrisonतुरुंग