शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

आ अब लौट चले... कारागृहाचे कैद्यांना आवाहन, प्रशासनाकडृून थेट पत्रव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 16:52 IST

कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश  कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देपोलीस उपअधीक्षकांनाही पत्र 

गणेश वासनिकअमरावती : कोरोना काळात कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी अटी, शर्थेीच्या आधारे काही कैद्यांना कोरोना आकस्मिक अभिवचन रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र, दोन वर्ष कारागृहाबाहेर राहून शिक्षाधीन कैदी चांगलेच रमले आहेत. मात्र, राज्याच्या गृह विभागाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेल्या कैद्यांना कारागृहात परत येणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने कारागृहातून थेट रजेवरील कैद्यांना परत येण्यासाठी पत्रव्यवहार केला जात आहे. काही कैदी कारागृहात परतले आहेत.

राज्याच्या कारागृह विभागाचे उपसचिव अनिरूद्ध जेवळीकर यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवरील कैद्यांना पुन्हा कारागृहात परतण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील कारागृहातून रजेवर गेलेले तब्बल पाच हजार कैदी परत आणण्यासाठी कारागृह अधीक्षकांनी कैद्यांना पत्र पाठविण्यासह संबंधित यंत्रणांना सुद्धा पत्रव्यवहार चालविला आहे.

गत १५ दिवसात कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवरील ५० टक्के कैदी कारागृहात परतल्याची माहिती आहे. रजेवरील कैदी पुन्हा कारागृहात कसे परत येतील, यासाठी पोलीस निरीक्षक, जामिनदारांना पत्र पाठवून अवगत केेले जात आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपायुक्तांना सुद्धा पत्रव्यवहार केला जात आहे. मे अखेरपर्यत रजेवरील कैदी परत येण्यासाठी कारागृह प्रशासनाने नियोजन आखले आहे.काही कैदी अंडरग्राऊंड

कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश  कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अभिवचन रजेसाठी ज्यांनी जामीन घेतला, त्यांना पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्याने भंबेरी उडाली आहे. रजेवरील कैदी कारागृहात परत आणण्यासाठी पोलीस प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. यात काही कैदी अट्टल गुन्हेगार, खून, दरोड्यातील असल्याची माहिती आहे. अभिवचन रजेवरील कैद्यांना थेट पत्र पाठविले जात आहे. ठाणेदार, जामीनदार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा पत्रव्यवहार करण्यात येत आहे. आतापर्यत ६५ कैदी अभिवचन रजेवरून परतले आहेत. ३०० च्या जवळपास कैदी परत आणण्यासाठी नियाेजन सुरू आहे. - भारत भोसले, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगPoliceपोलिसAmravatiअमरावतीPrisonतुरुंग