शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रहारचा मोर्चा

By admin | Updated: November 17, 2014 22:45 IST

अमरावतीसह विदर्भात दुष्काळ घोषित करावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार, किसान मित्र-शेतकरी संघटना यांच्यावतीने नेहरू मैदान येथून सोमवारी सायंकाळी ७ वाजता

प्रशासनाची तारांबळ : विभागीय आयुक्त रात्री पोहोचले कार्यालयातअमरावती : अमरावतीसह विदर्भात दुष्काळ घोषित करावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार, किसान मित्र-शेतकरी संघटना यांच्यावतीने नेहरू मैदान येथून सोमवारी सायंकाळी ७ वाजता मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा रात्री ८.३० वाजता विभागीय कार्यालयावर पोहोचला. आमदार बच्चू कडू यांच्यासह मोर्चेकऱ्यांना कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी रोखून धरले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री ९ वाजता विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी कार्यालयात येऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली. भाजपा सरकारच्या वचननाम्यात शेतकऱ्यांच्या स्थितीची जाणीव ठेऊन पन्नास टक्के नफा धरून शेतमालाचे भाव देऊ व डॉ. स्वामीनाथन शेती आयोगाची व डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालातील ज्या शिफारसी आहेत त्या लागू करू अशी शेतकऱ्यांची हमी घेणाऱ्या शासनाने पन्नास टक्के नफा धरून शेतमालाचे भाव काढून जाहीर करावे. याला वेळ लागत असेल तर सद्याचे जाहीर भाव व पन्नास टक्के नफा धरून मिळणारे भाव यामधील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून द्यावी, वचननाम्यानुसार शेतकऱ्यांना दिवसा १२ तास पूर्ण व्होल्टेजसह वीज मिळावी, सद्या नादुरूस्त असलेल्या डीबी दुरूस्त कराव्यात व पुढे नादुरूस्त होणाऱ्या डीबी २४ तासाच्या आत दुरूस्त होतील असे आदेश द्यावे, अनिश्चित लहरी पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या परिस्थितीचा विचार करून विदर्भ, मराठवाडा दुष्काळग्रस्त घोषित करावा व शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी प्रति हेक्टर १० हजार रूपये मदत द्यावी, कोरडवाहू शेती जोपर्यंत सिंचनाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याला दरवर्षी प्रति एकर १० हजार रूपये आर्थिक सहाय्यता देण्यात यावी, राज्याच्या नरेंद्र जाधव समितीने केलेल्या शिफारसीची अंमलबजावणी त्वरीत करावी व केंद्र सरकारने डॉ. एस. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या शेतकरी आयोगाच्या शिफारसीवर अंमलबजावणी करावी यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.