लग्न समारंभाना घ्यावी लागणार परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:49+5:302021-03-28T04:12:49+5:30
अमरावती : लग्नसमारंभ आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी अपेक्षित उपस्थित व्यक्तींच्या यादी सादर करून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी प्राधिकारी ...

लग्न समारंभाना घ्यावी लागणार परवानगी
अमरावती : लग्नसमारंभ आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी अपेक्षित उपस्थित व्यक्तींच्या यादी सादर करून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी प्राधिकारी म्हणून अमरावती शहरासाठी महापालिका आयुक्तांना, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधितांनी परवानगी देताना सर्व लोकांची कोविड तपासणी झाल्याची खात्री करूनच परवानगी द्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
लग्न समारंभाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर व सर्व नियमांचे पालन होणे बंधनकारक आहे. कुठेही नियमभंग आढळल्यास आयोजकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, वधू-वर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
लग्नसमारंभ आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी अपेक्षित उपस्थित व्यक्तींच्या यादी सादर करून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी प्राधिकारी म्हणून अमरावती शहरासाठी महापालिका आयुक्तांना, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधितांनी परवानगी देताना सर्व लोकांची कोविड तपासणी झाल्याची खात्री करूनच परवानगी द्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा दंडाधिकारी नवाल यांनी दिले आहेत. लग्नसमारंभ वर किंवा वधूचे घर, त्याचप्रमाणे, नॉन एसी मंगल कार्यालये, खुले लॉन, सभागृहात करता येईल. मात्र, एका ठिकाणी एका दिवशी एकच लग्नसमारंभ होईल व केवळ ५० व्यक्तीच उपस्थित असतील. वाजंत्री पथकाला केवळ लग्नस्थळीच वाद्य वाजविण्याची मुभा राहील. त्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे.