शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

किडनी स्टोन पाचवीला पुजलेला, प्रत्येक घर आजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 10:44 AM

Amravati : मेळघाटातील शुद्ध पेयजलाची व्यवस्था आहे कुठे? ; जनुन्यात अनेकांनी गमावले प्राण

अमरावती : क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी स्टोन होऊन तडफडत प्राण गमावणे हेच जनुनावासीयांचे विधिलिखित असावे, अशी स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या आजाराने प्रत्येक घरातील सदस्य ग्रासलेला आहे, तर अनेकांनी प्राण गमावले आहेत. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या मेळघाटातील प्रत्येक गावात काही गोष्टी समान आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आणि शुद्ध पेयजल नसणे हे त्यापैकी प्रमुख.

मेळघाट हे आधीपासूनच अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. याच मेळघाटात असणारे, पण अचलपूर तालुक्याच्या टोकावरील जनुना हे गाव जेमतेम दोन हजार लोकवस्तीचे. या गावात अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा स्रोत म्हणजे भूगर्भातील क्षारयुक्त पाणी. विहिरीतून ओढून घागरीत आणि थेट घशात. ना तपासणी, ना फिल्टर. यामुळे गेल्या काही वर्षांत या गावातील अनेक जण मूत्राशयाचा विकार बळावल्याने दगावले आहेत. आजदेखील गावात अनेकजण आजारी आहेत.

जनुना गावातील या गंभीर परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला असता, या गावातील प्रत्येक घरात मूत्राशयाचा विकार असलेले रुग्ण आहेत. शिक्षणाचा अभाव व अंधश्रद्धेमुळे गावातील अनेकांनी आपल्याला होणाऱ्या वेदना, आपला आजार यासंदर्भात कुठल्याच तपासण्या केल्या नाहीत. मात्र, असह्य वेदनेने घरातच विव्हळणारे अनेक जण या गावात पाहायला मिळतात. यापैकी काही रुग्ण स्वत:हून पुढे अकोल्याच्या डॉक्टरांकडे, तर काही रुग्ण परतवाडा आणि अमरावती येथील डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत.

गावात आरोग्य केंद्रच नाही

परतवाडा-अकोला मार्गावर असणाऱ्या पथ्रोट गावापासून १८ किलोमीटर अंतरावर उंच पहाडावर जनुना हे गाव आहे. शहानूर धरणापासून उंचावर सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. गावामध्ये कुठलाही दवाखाना नाही. गावातील रुग्णांना उपचारासाठी पथ्रोट हे गावच गाठावे लागते. 

सहा महिन्यांपासून डायलिसिसक्षारयुक्त पाण्यामुळे मूत्रपिंडाचा विकार झाल्यामुळे सुरेश महारनार हा २८ वर्षीय तरुण डायलिसिसवर आहे. त्याने अकोला येथील डॉक्टर भुसारी यांच्याकडे उपचार घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून परतवाडा येथील तालुका रुग्णालयामध्ये त्याच्यावर डायलिसिस केले जात आहे. गावातील पिण्याच्या पाण्यात क्षार असल्यामुळे माझ्यासह अनेकांची अशी अवस्था झाल्याचे सुरेश महारनार याने सांगितले.

काय झाले शुद्ध पाणीपुरवठ्याच्या आश्वासनाचे?शहानूर धरणातील पाणी दीडशे किलोमीटर लांब अंतरावर असणाऱ्या खारपाणपट्ट्यातील २३५ गावांना पुरविले जाते. ते पाणी दर्यापूर भातकुली तालुक्यात जात असताना धरणापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जनुना गावात पोहोचत नाही, ही खरी शोकांतिका आहे. दोन वर्षांपूर्वी गावात प्रत्येक घरात रुग्ण आढळून आल्यावर पिण्याचे शुद्ध पाणी गावात पुरविले जाईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत गावात पिण्यायोग्य पाणी मिळाले नाही. 

टॅग्स :Melghatमेळघाटwater scarcityपाणी टंचाईwater pollutionजल प्रदूषण