एसटीकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:01:02+5:30

गेल्या मार्च महिन्यापासून सतत लॉकडाऊन वाढल्याने बसफेºया बंद करण्यात आल्या. २२ मेनंतर ग्रामीण भागातील सहा आगारातून बससेवा सुरु करण्यात आली खरी; परंतु प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. याकारणाने आता एसटीने मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. कोरोनाच्या भीतीने एसटीतून प्रवास करायला नागरिक नकार देत आहेत.

Passenger back to ST | एसटीकडे प्रवाशांची पाठ

एसटीकडे प्रवाशांची पाठ

ठळक मुद्देदिवसाला ३५ हजारांचे उत्पन्न : दररोज धावतात २५ बस

संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गरिबांचा रथ मानल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडे कोरोनामुळे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. ग्रामीण भागात तीन आठवड्यांपासून बससेवा सुरू झाल्यानंतरही प्रवाशांची त्याकडे पाठ आहे. दिवसाला फक्त ३० ते ३५ हजारांचे उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक माहिती महामंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे.
जिल्ह्यातून पूर्वी दिवसाला ४०५ एसटी बस धावायच्या; आता फक्त २५ बसेस ग्रामीण भागात धावत आहेत. एसटीला प्रतिदिन ४० ते ४५ लाखाचे उत्पन्न मिळायचे. मात्र, गेल्या मार्च महिन्यापासून सतत लॉकडाऊन वाढल्याने बसफेºया बंद करण्यात आल्या. २२ मेनंतर ग्रामीण भागातील सहा आगारातून बससेवा सुरु करण्यात आली खरी; परंतु प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. याकारणाने आता एसटीने मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. कोरोनाच्या भीतीने एसटीतून प्रवास करायला नागरिक नकार देत आहेत. त्यातच अमरावती व बडनेरा क्षेत्रात एसटीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्याकारणानेही एसटीच्या उत्पन्नाला फटका बसत आहेत.
अमरावती शहराकरिता बससेवा सुरू झाल्यास एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. सद्यस्थितीत ग्रामीण भागात २५ बस अडीच ते तीन हजार किमीचा प्रवास करीत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनच्या पूर्वी प्रतिदिन एक ते दीड लाख किमी बस अंतर कापायच्या त्यातून ४० ते ४५ लाखाचे उत्पन्न मिळायचे. आत ते उत्पन्न ठप्प झाले आहे. दर्यापूर, परतवाडा, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, मोर्शी, वरूड या आगारांतून सद्यस्थितीत बससेवा सुरू असून अमरावती वगळता जिल्ह्याच्या सीमारेषांपर्यंत त्यांच्याकडून प्रवाशांची ने-आण होत आहे.

तीन आठवड्यांपासून प्रवाशांची संख्या वाढली नाही. बस कमी करण्यात आल्या. आता २५ बसेस धावत आहेत. अडीच हजार किमीचा प्रवास होत असून प्रतिदिन ३५ हजाराचे उत्पन्न येत आहे. लवकरच स्थिती सुधारेल.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक अमरावती

Web Title: Passenger back to ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.