जिल्हा परिषदेमार्फत २०१७-१८ मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने बुधवारी गौरविण्यात आले. चार शिक्षकांना विशेष पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ...
गटर साफ नाही, कचरा उचलला नाही यांसारख्या तक्रारी करण्यासाठी आता महापालिकेत जाण्याची गरज नाही, तर स्वत:च्या मोबाइलवर क्षणात याची तक्रार करता येणार आहे. नगर विकास विभागाने एमओएचयूए अॅप विकसित केले आहे. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी आहे. ही केंद्र शासना ...
आॅक्टोबर महिन्यात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेऊन नरभक्षक वाघाने तिवसा तालुक्यातही नागरिकांना जेरीस आणले होते. या मुद्द्यावर बुधवारी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर विधानसभेत लक्षवेधी मांडत राज्याचे वनमंत् ...
प्रथमेश तलावात विर्सजित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विघटनासाठी महापालिकेने काहीच केले नसल्यामुळे पर्यावरणाची हानी व मूर्तीची विटंबना होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी जनदरबारात मांडले. याची गंभीर दखल घेत संबंधित चार विभागांनी बुधवारी या ...
कुपोषणमुक्तीकरिता राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी मेळघाटातील बालके या दुष्टचक्रातून बाहेर आलेली नाहीत. धारणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १६४१, तर आॅक्टोबर महिन्यात १५०२ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत आढळून आली आहेत. ...
पाणीपुरवठा योजनेतील सात कोटी रुपयांची कामे झालेली नसताना, ती योजना पूर्ण झाल्याची बतावणी करून त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले. सबब, पालिका प्रशासनाने शासनाची दिशाभूल केल्याची तक्रार नगरसेविका शोभा मुगल यांनी नगर प्रशासन संचालनालयाच्या ...
भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवी म्हणून पुजले जाते अन् त्याच स्त्रीला जगण्याचा हक्कदेखील नाकारला जातो. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, तर ज्याच्या पदरी पाप, त्यानेच व्हावे पोरीचा बाप; असे का? ...
विटा बनविण्यासाठी औष्णिक वीज केंद्रात वापरलेल्या कोळशाच्या राखेचा वापर वीटभट्टीधारकांकडून होत असल्याने बडनेराच्या आसमंतात तिची धूळ पसरली आहे. त्यापासून खोकला व डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यावर नियंत्रण कुणाचेच नसल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत. ...