शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

८८ हजार हेक्टरमधील संत्र्याला उष्माघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 11:30 IST

पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआंबिया बहराच्या लहान फळांची गळ, नवीन कलमांमध्ये ‘मर’

गजानन मोहोड

अमरावती : मार्च ‘हीट’चा तडाखा होताच ८ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट आहे. याशिवाय यंदाचा उन्हाळा सर्वाधिक हॉट राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविली आहे. काही भागात आंबियाची गळ होत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

सध्या दिवसाचे तापमान ४२ अंशांवर गेले आहे. अद्याप मे व जून शिल्लक आहे. उष्ण तापमानामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू फळबागांमध्ये कोवळी नवती करपणे, आंबिया बहराच्या लहान फळांची गळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये ‘मर’, कोवळ्या रोपांचे शेंडे वाळणे, पाने गळणे, आदी दुष्परिणाम दिसू लागले आहेत. पीकेव्हीच्या संत्रा मिशन शास्त्रज्ञांनी पाहणीदरम्यान ही निरीक्षणे नोंदविली आहेत.

तापमानातील अचानक बदल किंवा उष्ण वाऱ्यामुळे अचानक तापमानवाढ होऊन किंवा ओलावा कमी झाल्यानेही फळगळ होण्याची शक्यता आहे. यासाठी झाडांमध्ये समतोल साधणे महत्त्वाचे आहे. याशिवाय झाडांच्या दोन ते तीन फूट परिघात गवत, पालापाचोळा, कुटार, तणस यासारख्या सेंद्रिय पदार्थांचे १० सेंमी आच्छादन महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी सांगितले.

उन्हामुळे बाष्पीभवन, पर्णोत्सर्जन अधिक

उन्हामुळे झाडातील पाणी उडून जाते. झाडे निस्तेज व मलूल पडतात. अशावेळी बाष्परोधकाचा वापर करून पर्णोत्सर्जन कमी करता येते. बाष्परोधकाची २ टक्के तीव्रतेची केओलीन किंवा पोटॅशिअम नायट्रेट एक टक्के तीव्रतेची फवारणी करावी. केओलीनची फवारणी हलके ओलीत झाल्यावर करावी. चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. नत्राची अर्धी मात्रा त्वरित द्यावी.

संत्रा, मोसंबी फळपिकांचे क्षेत्र

पश्चिम विदर्भात संत्र्याचे ८८,८४८ हेक्टरमध्ये क्षेत्र आहे. यामध्ये संत्र्याच्या आंबियाचे ३२,०३६ हेक्टर व मृग बहराचे ३५,७०७ हेक्टर क्षेत्र आहे. संत्र्याचे सर्वाधिक क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७५,३७१ हेक्टर आहे. बुलडाणा ३,४७५, अकोला ४,९७२, वाशिम ३,२५२ व यवतमाळ जिल्ह्यात १,७७७ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय मोसंबीचे ४,६९१ व लिंबूचे १,७४४ हेक्टर क्षेत्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीHeat Strokeउष्माघात