शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

८८ हजार हेक्टरमधील संत्र्याला उष्माघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 11:30 IST

पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआंबिया बहराच्या लहान फळांची गळ, नवीन कलमांमध्ये ‘मर’

गजानन मोहोड

अमरावती : मार्च ‘हीट’चा तडाखा होताच ८ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट आहे. याशिवाय यंदाचा उन्हाळा सर्वाधिक हॉट राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविली आहे. काही भागात आंबियाची गळ होत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

सध्या दिवसाचे तापमान ४२ अंशांवर गेले आहे. अद्याप मे व जून शिल्लक आहे. उष्ण तापमानामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू फळबागांमध्ये कोवळी नवती करपणे, आंबिया बहराच्या लहान फळांची गळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये ‘मर’, कोवळ्या रोपांचे शेंडे वाळणे, पाने गळणे, आदी दुष्परिणाम दिसू लागले आहेत. पीकेव्हीच्या संत्रा मिशन शास्त्रज्ञांनी पाहणीदरम्यान ही निरीक्षणे नोंदविली आहेत.

तापमानातील अचानक बदल किंवा उष्ण वाऱ्यामुळे अचानक तापमानवाढ होऊन किंवा ओलावा कमी झाल्यानेही फळगळ होण्याची शक्यता आहे. यासाठी झाडांमध्ये समतोल साधणे महत्त्वाचे आहे. याशिवाय झाडांच्या दोन ते तीन फूट परिघात गवत, पालापाचोळा, कुटार, तणस यासारख्या सेंद्रिय पदार्थांचे १० सेंमी आच्छादन महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी सांगितले.

उन्हामुळे बाष्पीभवन, पर्णोत्सर्जन अधिक

उन्हामुळे झाडातील पाणी उडून जाते. झाडे निस्तेज व मलूल पडतात. अशावेळी बाष्परोधकाचा वापर करून पर्णोत्सर्जन कमी करता येते. बाष्परोधकाची २ टक्के तीव्रतेची केओलीन किंवा पोटॅशिअम नायट्रेट एक टक्के तीव्रतेची फवारणी करावी. केओलीनची फवारणी हलके ओलीत झाल्यावर करावी. चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. नत्राची अर्धी मात्रा त्वरित द्यावी.

संत्रा, मोसंबी फळपिकांचे क्षेत्र

पश्चिम विदर्भात संत्र्याचे ८८,८४८ हेक्टरमध्ये क्षेत्र आहे. यामध्ये संत्र्याच्या आंबियाचे ३२,०३६ हेक्टर व मृग बहराचे ३५,७०७ हेक्टर क्षेत्र आहे. संत्र्याचे सर्वाधिक क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७५,३७१ हेक्टर आहे. बुलडाणा ३,४७५, अकोला ४,९७२, वाशिम ३,२५२ व यवतमाळ जिल्ह्यात १,७७७ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय मोसंबीचे ४,६९१ व लिंबूचे १,७४४ हेक्टर क्षेत्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीHeat Strokeउष्माघात