शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

८८ हजार हेक्टरमधील संत्र्याला उष्माघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 11:30 IST

पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआंबिया बहराच्या लहान फळांची गळ, नवीन कलमांमध्ये ‘मर’

गजानन मोहोड

अमरावती : मार्च ‘हीट’चा तडाखा होताच ८ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट आहे. याशिवाय यंदाचा उन्हाळा सर्वाधिक हॉट राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविली आहे. काही भागात आंबियाची गळ होत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

सध्या दिवसाचे तापमान ४२ अंशांवर गेले आहे. अद्याप मे व जून शिल्लक आहे. उष्ण तापमानामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू फळबागांमध्ये कोवळी नवती करपणे, आंबिया बहराच्या लहान फळांची गळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये ‘मर’, कोवळ्या रोपांचे शेंडे वाळणे, पाने गळणे, आदी दुष्परिणाम दिसू लागले आहेत. पीकेव्हीच्या संत्रा मिशन शास्त्रज्ञांनी पाहणीदरम्यान ही निरीक्षणे नोंदविली आहेत.

तापमानातील अचानक बदल किंवा उष्ण वाऱ्यामुळे अचानक तापमानवाढ होऊन किंवा ओलावा कमी झाल्यानेही फळगळ होण्याची शक्यता आहे. यासाठी झाडांमध्ये समतोल साधणे महत्त्वाचे आहे. याशिवाय झाडांच्या दोन ते तीन फूट परिघात गवत, पालापाचोळा, कुटार, तणस यासारख्या सेंद्रिय पदार्थांचे १० सेंमी आच्छादन महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी सांगितले.

उन्हामुळे बाष्पीभवन, पर्णोत्सर्जन अधिक

उन्हामुळे झाडातील पाणी उडून जाते. झाडे निस्तेज व मलूल पडतात. अशावेळी बाष्परोधकाचा वापर करून पर्णोत्सर्जन कमी करता येते. बाष्परोधकाची २ टक्के तीव्रतेची केओलीन किंवा पोटॅशिअम नायट्रेट एक टक्के तीव्रतेची फवारणी करावी. केओलीनची फवारणी हलके ओलीत झाल्यावर करावी. चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. नत्राची अर्धी मात्रा त्वरित द्यावी.

संत्रा, मोसंबी फळपिकांचे क्षेत्र

पश्चिम विदर्भात संत्र्याचे ८८,८४८ हेक्टरमध्ये क्षेत्र आहे. यामध्ये संत्र्याच्या आंबियाचे ३२,०३६ हेक्टर व मृग बहराचे ३५,७०७ हेक्टर क्षेत्र आहे. संत्र्याचे सर्वाधिक क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७५,३७१ हेक्टर आहे. बुलडाणा ३,४७५, अकोला ४,९७२, वाशिम ३,२५२ व यवतमाळ जिल्ह्यात १,७७७ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय मोसंबीचे ४,६९१ व लिंबूचे १,७४४ हेक्टर क्षेत्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीHeat Strokeउष्माघात