शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

जुनी पाठयपुस्तके आता रद्दीऐवजी दप्तरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST

अमरावती : वर्ष सुरू झाले की, नवीकोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके रद्दीत गेल्याचे ...

अमरावती : वर्ष सुरू झाले की, नवीकोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके रद्दीत गेल्याचे दिसून येतात. मात्र, हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने आता पुस्तकांचा पुनर्वापर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यात लाखो पुस्तके वापरात येणार असल्याने यात लाखो रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे.

सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी झाल्यानंतर २००९ पासून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी संस्थांच्या पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके वाटप केली जातात. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा त्यामागील उद्देश आहे. या योजनेत सुमारे लाखाेच्या संख्येने पुस्तकांचे वाटप केले जातात. यापोटी लाखो रुपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. विशेष म्हणजे एका पाठ्यपुस्तकाचा संच विद्यार्थ्यांनी चांगला वापरल्यास दोन ते तीन वर्षे सहज उपयोगात येतो. मात्र, यापूर्वी या पुनर्वापरावर विशेष लक्ष न दिल्याने दरवर्षी नवी पुस्तके वाटपाची योजना सुरू आहे.

बॉक्स

पुनर्वापराचा निर्णय

शिक्षण विभागाने पर्यावरणाचे संवर्धन आणि कागदाची बचत करण्यासाठी एकदा वापरलेल्या पाठपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतनासाठी वापर कमी करणे आणि पुनर्वापर करणे ही संकल्पनाही या माध्यमातून रुजविली जावी, हा यामागील उद्देश आहे.

बॉक्स

प्रायोगिक तत्त्वावर निर्णय

यापुढे आता विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठपुस्तकांपैकी ज्यांची पुस्तके योग्यरीतीने जपवणूक करून सुस्थितीत ठेवलेली आहे अशी पुस्तके संकलित करून पुढील वर्षी विद्यार्थ्यांना वाटावीत, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जून २०२१ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी दिलेली आहे. यावषी प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमातून किती पाठपुस्ते जमा होतील. तसेच विद्यार्थी किंवा पालकांचा किती प्रतिसाद मिळतो, यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कोट

यासंदर्भात शासन पातळीवरून पत्र मिळाले आहे. सदर पत्रातील सूचनेप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.

- ई.झेड.खान,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)