शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान

By admin | Updated: June 19, 2014 23:37 IST

ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी कसे साठवता येईल, यावर उपाययोजना म्हणून ग्रामविकास विभागाच्यावतीने पाणी अव्यवस्थापनासाठी आता पाणी

अमरावती : ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी कसे साठवता येईल, यावर उपाययोजना म्हणून ग्रामविकास विभागाच्यावतीने पाणी अव्यवस्थापनासाठी आता पाणी साठवा आणि गाव वाचवा अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जाणार आहेत. पाणी वाचवा, गाव वाचवा या अभियानाची निश्चित योजना तयार करण्यासाठी जलतज्ज्ञ, सेवाभावी संस्थांच्या सदस्य, कल्पक उपक्रमामध्ये काम करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.या अभियानासंदर्भात गाव पातळीवर अस्तित्वात असलेल्या मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता, खडकाची पाणी पातळी व साठवण क्षमता याचे निश्चित नियोजन केले जाणार आहे. संबंधित गावातील तलाव, विहिरींच्या पाण्याच्या पातळीचे मोजमाप करुन पाणी स्त्रोताच्या पद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे. या संपूर्ण घटकाच्या अभ्यास अहवालाचे नियोजन आराखडा या माध्यमातून तयार केला जाणार आहे.ज्या ग्रामपंचातींना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पुरवठा केला जातो अशी गावे प्राधान्याने सहभागी व्हावीत यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय समितीने धोरण ठरवणे व वार्षिक आराखडा निश्चित करणे अपेक्षित आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमाची अंमलबजावणीची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुक्यांची जबाबदारी पंचायत समितीचे बीडीओ यांची असणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची प्रत्येक टप्प्यावर कामांची तपासणी करुन शिफारस केलेल्या ग्रामपंचायतींना जिल्हा स्तरावर पुरस्कारासाठी निवडण्यात येणार आहेत. या अभियानाचा कालबाह्य कार्यक्रम १५ जून ते १५ आॅक्टोबर असा आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत ग्रामपंचायतींकडून तालुकास्तरावर पंचायत समितीकडे अर्ज पाठविण्याची मुदत देण्यात आली आहे. ३१ जानेवारी २०१५ पर्यंत जिल्हास्तरीय स्पर्धाकरिता उत्सुक व पात्र ग्रामपंचायतींचे अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाकडे पाठविण्याकरिता मुदत ठरविण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड करणार आहेत. १० एप्रिल २०१५ रोजी पुस्कार वितरण होणार आहे. (प्रतिनिधी)