शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

 आता सिंचनासाठी नलिका वितरणाला प्राधान्य,  जलसंपदाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:44 IST

सूक्ष्म सिंचनास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापराचे शासन धोरण आहे. यामध्ये नलिकांद्वारे वितरण प्रणाली अभिप्रेत आहे. मात्र यापूर्वी लाभक्षेत्रात विकेंद्रित साठे निर्माण करण्यात येणार आहे.

 अमरावती -  सूक्ष्म सिंचनास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापराचे शासन धोरण आहे. यामध्ये नलिकांद्वारे वितरण प्रणाली अभिप्रेत आहे. मात्र यापूर्वी लाभक्षेत्रात विकेंद्रित साठे निर्माण करण्यात येणार आहे. आता सिंचन प्रकल्पांच्या वितरण व्यवस्थेत नलिका वितरण प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

वितरण प्रणाली व सिंचन प्रणाली ह्या जरी दोन भिन्न बाबी असल्या तरी वितरण प्रणालीद्वारेच पाणी क्षेत्रापर्यंत पोहोचवणे त्यांनतर पाटच-या किंवा तुषार व ठिबक सिंचनाद्वारे पाणी कार्यान्वित करणे अभिप्रेत आहे. नलिका वितरण प्रणाली स्वीकारली असली तरी सिंचनाची कोणतीही पद्धती अवलंबिता येते. मात्र उपलब्ध पाणीसाठा व लागवडयोग्य क्षेत्र विचारात घेता सूक्ष्म सिंचन हेच जलसंपदा विभागाचे दूरगामी उद्दिष्ट आहे. जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लाभक्षेत्रातील जमिनीचा उतार तीव्र असल्यास कालव्यावर उपलब्ध ऊर्जेचा व्यय करण्यासाठी धबधब्याची शृंखला बांधावी लागते. यावर आगाऊ खर्च करण्यापेक्षा कमी खर्चात नलिका वितरण प्रणाली संकल्पित करण्यास वाव आहे व सर्वसाधारणपणे जमिनीचा उतार १:५०० पेक्षा असल्यास गुरूत्वाकर्षण ऊर्जेद्वारे नलिका वितरण व्यवहार्य बाब आहे.लाभक्षेत्रातील जमिनीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार असल्यास कालवा बांधकामाचा खर्च वाढतो व शेतच-यांवरील धबधब्याचा खर्च वाढतो अशा प्रकरणी नलिका वितरण व्यवहार्य बाब ठरणारी असल्याचे जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शक सूचनामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.

 वहन व्ययाची बचत, कार्यक्षमतेमध्येही वाढनवीन प्रकल्पांच्या बाबतीत पांरपरिक कालवा वितरण प्रणाली भूसंपादनाच्या खर्चामुळे महाग पडू शकते, अशा प्रकरणी अभियांत्रिकी निकषानुसार नलिका वितरण प्रणाली तांत्रिक व आर्थिकदृट्या व्यवहार्य ठरणार आहे. तसेच नलिका वितरणामुळे वहन व्ययाची बचत होणार आहे व पाणी वापराची कार्यक्षमताही वाढणार आहे. काळ्या मातीच्या लाभक्षेत्रात पाया खोल जात असल्याने कालव्यावरील बांधकामाचा भांडवली खर्च जास्त येतो व अस्तरीकरणाचा खर्चही अधिक असल्याने अशा प्रदेशात तांत्रिक निकषानुसार नलिका वितरण प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Waterपाणी