शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आता वृक्षतोडीसाठी लागणार ३० प्रकारची कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:21 IST

अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.

अमरावती : राज्य ३३ टक्के वृक्ष आच्छादनाखाली आणण्यासाठी शासनाने १३ कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली असली तरी अवैध वृक्षतोड कायम आहे. मात्र, आता शासनाने मालकी प्रकरणाच्या वृक्षतोडीसाठी ३० प्रकारची कागदपत्रे आवश्यक केली आहेत. त्याशिवाय वृक्षतोडीची परवानगी मिळणार नाही, शिवाय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील, असे आदेश शासनाने निर्गमित केले. वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या मालकी प्रकरणातील वृक्षतोड करावयाची असल्यास नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. अवैध वृक्षतोडीचे प्रकरण निदर्शनास आल्यास त्या भागातील संबंधित अधिकाºयांना जबाबदार धरले जाईल, ही बाब वनसचिव खारगे यांनी स्पष्ट केली आहे. एकीकडे १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी चालविली असताना, अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. मालकी जागेवरील वृक्षतोड परवानगीबाबत अर्ज आल्यास वनपाल, वनक्षेत्रपालांना घटनास्थळी जाऊन वृक्षाचे मूल्यांकन करावे लागणार आहे. वृक्षतोडीसाठी आलेल्या अर्जात त्याची कारणे, वृक्षांच्या प्रजाती, गाव नमुना, ७/१२, तहसलीदाराकडून स्वामित्वाचा दाखला, तलाठ्याचा चतु:सीमा दाखला, खाते उतारा, प्रतिज्ञापत्र, भोगवटदार-२ असल्यास झाडांचा मालकी दाखला, रहिवासी दाखला, आदिवासी नसल्याबाबत दाखला, सर्वे क्रमांक व गाव नमुना ६, झाडोरा असल्यास साक्षांकित हद्दीचा दाखला, मंडळ निरीक्षकांचे नाहरकत प्रमाणपत्र, उभ्या झाडांची प्रजातीवार यादी, धारणक्षेत्र १२ हेक्टर असल्याचे तहसीलदारांची एनओसी, पुन:स्थापित असल्यास उपजिल्हाधिकाºयांचे पत्र, अर्जदार एसटी असल्यास महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या भोगवटारांच्या झाडांची विक्री करणे अधिनियम १९६९ अंतर्गत विहित अर्ज अनिवार्य, नैसर्गिक उगवणीतून वृक्ष निर्माण झाली असल्यास राजस्व शुल्क भरल्याची पावती, सदर झाडे ही बारमाही पाण्याच्या स्रोतापासून १०० फूट अंतरावर नाहीत असा वनपालांकडून दाखला, वनसर्वेक्षकांचा दाखला, भूमिअभिलेख निरीक्षक किंवा  उपअधीक्षकांचा दाखला, फळझाडांच्या तोडीस फलोत्पादन अधिकाºयांचा दाखला, भोगवटदार-२ असल्यास सदर क्षेत्राचे मूळ वाटप आदेश अशा ३० प्रकारांची कागदपत्रे वृक्षतोडीसाठी अनिवार्य करण्यात आली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालनवृक्षतोडीची परवानगी देताना वनाधिकाºयांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल. याचिका क्रमांक २०२/९५ : १७१/९६ (पी.एम. गोदावरम विरुद्ध भारत सरकार निकाल दि. १२/१२/१९९६, एआयआर १९९७ एससी १२२८-१२३४) मधील परिच्छेद क्रमांक ३ दिलेल्या ‘वन’ या व्याख्येत सदर झाडांचे क्षेत्र मोडत नाही, असा तालुका भूमिअभिलेख निरीक्षक, उपअधीक्षकांचा दाखला आवश्यक असणार आहे.

अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी यापूर्वी अनेकदा सूचना वजा आदेश निगर्मित केलेले आहे. मात्र, आता वृक्षतोड परवानगीची नियमावली कठोर केली आहे. वनाधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली असून, अवैध वृक्षतोड झाल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.- विकास खारगे, प्रधान वनसचिव, महाराष्ट्र 

टॅग्स :environmentवातावरण