शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कालव्याचे नव्हे, हे तर पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 21:53 IST

ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे.

ठळक मुद्देनिर्ढावलेल्या अधिकाऱ्यांचा कांगावा : दुष्काळी जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे. प्रशासनाला मुठेच्या घटनेची पुनरावृत्तीची प्रतीक्षा आहे काय, असा नागरिकांचा संतप्त सवाल आहे.तिवसा तालुक्यात सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी झालेला आहे. तालुक्यातील भिवापूर, जळका व अमदोरी हे लघुप्रकल्प आताच पूर्णत: कोरडे पडले असताना, उजवा मुख्य कालव्याच्या किमी ४० मध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूला कोट्यवधी लिटर पाणी साचले. हे पावसाचे पाणी असल्याचा जावईशोध जलसंपदा विभागाने लावला आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात केवळ ४१ टक्केच साठा असल्याने अमरावतीला एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. रबीला पाणी मिळणार नाही, तर कपाशी व तूर पिकांसाठी केवळ पाण्याच्या दोन पाळ्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी एक पाळी सोडण्यात आली. आता तीन आठवड्यानंतर एक पाळी सोडण्यात येईल. त्यामुळे रबीचा गहू व हरभºयाला सिंचनासाठी पाणी मिळणार नाही, ही बाब स्पष्ट झालेली आहे.प्रकल्पाच्या उर्वरित पाण्याचे औद्योगिक व शहराच्या वापरासाठी आरक्षण झाले आहे. प्रकल्पाच्या पाण्याचा थेंब न थेब महत्त्वाचा असताना, पाळी सोडल्यानंतर जर लाखो लिटर पाणी वाया जात असेल, तर या विभागावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकºयांचा संतप्त सवाल आहे. कालवा क्षतिग्रस्त झाल्यास पिकांसह लगतच्या वस्त्यांनाही धोका आहे. अशा स्थितीत कालव्याची आवश्यक ती दुरुस्ती करण्याऐवजी मूळ विषयाला बगल देण्याचा व वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल करण्याचा या विभागाचा प्रयत्न आहे.वास्तविक, या ठिकाणी गतवर्षीपासून कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाझर व सरळ विमोचकाच्या नादुरुस्तीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एप्रिलपर्यंत हीच स्थिती कायम होती, याविषयीचा अहवाल कार्यकारी अभियंता कार्यालयास सादर झालेला असताना थातूरमातूर दुरुस्तीवर बोळवण करण्यात आली. परिणामी यंदा कालव्यातून पाणी जायच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात उपअभियंत्याशी संपर्क केला असता, त्यांचा मोबाइल दोन दिवसांपासून ‘स्वीच आॅफ’ आहेत.मायनर बुजले झुडपांनीकालव्याचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी उखडले आहे. या भेगांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली असल्याने आधीच थातूरमातूर झालेले अस्तरीकरण उखडले आहे. परिणामी कालव्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मायनरमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याने पाणी ओसंडून मनमानी वाहते. त्यात झाडे उगविली असल्याने पाणी प्रवाह अडतो. कित्येक वर्षापासून दुरूस्तीच नसल्यामुळे या सर्व कामांचे व यावर खर्च झालेल्या निधीचे सोशल आॅडिट व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.कालव्यातून पाण्याचा अपव्यय झालेला नाही. कालवे निर्माण होत असताना कंत्राटदारांनी खड्डे केलेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांना अहवाल मागितला आहे.- रवींद्र लांडेकरमुख्य अभियंता, जलसंपदा