शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याचे नव्हे, हे तर पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 21:53 IST

ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे.

ठळक मुद्देनिर्ढावलेल्या अधिकाऱ्यांचा कांगावा : दुष्काळी जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे. प्रशासनाला मुठेच्या घटनेची पुनरावृत्तीची प्रतीक्षा आहे काय, असा नागरिकांचा संतप्त सवाल आहे.तिवसा तालुक्यात सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी झालेला आहे. तालुक्यातील भिवापूर, जळका व अमदोरी हे लघुप्रकल्प आताच पूर्णत: कोरडे पडले असताना, उजवा मुख्य कालव्याच्या किमी ४० मध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूला कोट्यवधी लिटर पाणी साचले. हे पावसाचे पाणी असल्याचा जावईशोध जलसंपदा विभागाने लावला आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात केवळ ४१ टक्केच साठा असल्याने अमरावतीला एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. रबीला पाणी मिळणार नाही, तर कपाशी व तूर पिकांसाठी केवळ पाण्याच्या दोन पाळ्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी एक पाळी सोडण्यात आली. आता तीन आठवड्यानंतर एक पाळी सोडण्यात येईल. त्यामुळे रबीचा गहू व हरभºयाला सिंचनासाठी पाणी मिळणार नाही, ही बाब स्पष्ट झालेली आहे.प्रकल्पाच्या उर्वरित पाण्याचे औद्योगिक व शहराच्या वापरासाठी आरक्षण झाले आहे. प्रकल्पाच्या पाण्याचा थेंब न थेब महत्त्वाचा असताना, पाळी सोडल्यानंतर जर लाखो लिटर पाणी वाया जात असेल, तर या विभागावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकºयांचा संतप्त सवाल आहे. कालवा क्षतिग्रस्त झाल्यास पिकांसह लगतच्या वस्त्यांनाही धोका आहे. अशा स्थितीत कालव्याची आवश्यक ती दुरुस्ती करण्याऐवजी मूळ विषयाला बगल देण्याचा व वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल करण्याचा या विभागाचा प्रयत्न आहे.वास्तविक, या ठिकाणी गतवर्षीपासून कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाझर व सरळ विमोचकाच्या नादुरुस्तीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एप्रिलपर्यंत हीच स्थिती कायम होती, याविषयीचा अहवाल कार्यकारी अभियंता कार्यालयास सादर झालेला असताना थातूरमातूर दुरुस्तीवर बोळवण करण्यात आली. परिणामी यंदा कालव्यातून पाणी जायच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात उपअभियंत्याशी संपर्क केला असता, त्यांचा मोबाइल दोन दिवसांपासून ‘स्वीच आॅफ’ आहेत.मायनर बुजले झुडपांनीकालव्याचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी उखडले आहे. या भेगांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली असल्याने आधीच थातूरमातूर झालेले अस्तरीकरण उखडले आहे. परिणामी कालव्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मायनरमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याने पाणी ओसंडून मनमानी वाहते. त्यात झाडे उगविली असल्याने पाणी प्रवाह अडतो. कित्येक वर्षापासून दुरूस्तीच नसल्यामुळे या सर्व कामांचे व यावर खर्च झालेल्या निधीचे सोशल आॅडिट व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.कालव्यातून पाण्याचा अपव्यय झालेला नाही. कालवे निर्माण होत असताना कंत्राटदारांनी खड्डे केलेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांना अहवाल मागितला आहे.- रवींद्र लांडेकरमुख्य अभियंता, जलसंपदा