शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

कालव्याचे नव्हे, हे तर पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 21:53 IST

ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे.

ठळक मुद्देनिर्ढावलेल्या अधिकाऱ्यांचा कांगावा : दुष्काळी जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे. प्रशासनाला मुठेच्या घटनेची पुनरावृत्तीची प्रतीक्षा आहे काय, असा नागरिकांचा संतप्त सवाल आहे.तिवसा तालुक्यात सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी झालेला आहे. तालुक्यातील भिवापूर, जळका व अमदोरी हे लघुप्रकल्प आताच पूर्णत: कोरडे पडले असताना, उजवा मुख्य कालव्याच्या किमी ४० मध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूला कोट्यवधी लिटर पाणी साचले. हे पावसाचे पाणी असल्याचा जावईशोध जलसंपदा विभागाने लावला आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात केवळ ४१ टक्केच साठा असल्याने अमरावतीला एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. रबीला पाणी मिळणार नाही, तर कपाशी व तूर पिकांसाठी केवळ पाण्याच्या दोन पाळ्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी एक पाळी सोडण्यात आली. आता तीन आठवड्यानंतर एक पाळी सोडण्यात येईल. त्यामुळे रबीचा गहू व हरभºयाला सिंचनासाठी पाणी मिळणार नाही, ही बाब स्पष्ट झालेली आहे.प्रकल्पाच्या उर्वरित पाण्याचे औद्योगिक व शहराच्या वापरासाठी आरक्षण झाले आहे. प्रकल्पाच्या पाण्याचा थेंब न थेब महत्त्वाचा असताना, पाळी सोडल्यानंतर जर लाखो लिटर पाणी वाया जात असेल, तर या विभागावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकºयांचा संतप्त सवाल आहे. कालवा क्षतिग्रस्त झाल्यास पिकांसह लगतच्या वस्त्यांनाही धोका आहे. अशा स्थितीत कालव्याची आवश्यक ती दुरुस्ती करण्याऐवजी मूळ विषयाला बगल देण्याचा व वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल करण्याचा या विभागाचा प्रयत्न आहे.वास्तविक, या ठिकाणी गतवर्षीपासून कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाझर व सरळ विमोचकाच्या नादुरुस्तीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एप्रिलपर्यंत हीच स्थिती कायम होती, याविषयीचा अहवाल कार्यकारी अभियंता कार्यालयास सादर झालेला असताना थातूरमातूर दुरुस्तीवर बोळवण करण्यात आली. परिणामी यंदा कालव्यातून पाणी जायच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात उपअभियंत्याशी संपर्क केला असता, त्यांचा मोबाइल दोन दिवसांपासून ‘स्वीच आॅफ’ आहेत.मायनर बुजले झुडपांनीकालव्याचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी उखडले आहे. या भेगांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली असल्याने आधीच थातूरमातूर झालेले अस्तरीकरण उखडले आहे. परिणामी कालव्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मायनरमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याने पाणी ओसंडून मनमानी वाहते. त्यात झाडे उगविली असल्याने पाणी प्रवाह अडतो. कित्येक वर्षापासून दुरूस्तीच नसल्यामुळे या सर्व कामांचे व यावर खर्च झालेल्या निधीचे सोशल आॅडिट व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.कालव्यातून पाण्याचा अपव्यय झालेला नाही. कालवे निर्माण होत असताना कंत्राटदारांनी खड्डे केलेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांना अहवाल मागितला आहे.- रवींद्र लांडेकरमुख्य अभियंता, जलसंपदा