शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कालव्याचे नव्हे, हे तर पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 21:53 IST

ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे.

ठळक मुद्देनिर्ढावलेल्या अधिकाऱ्यांचा कांगावा : दुष्काळी जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे. प्रशासनाला मुठेच्या घटनेची पुनरावृत्तीची प्रतीक्षा आहे काय, असा नागरिकांचा संतप्त सवाल आहे.तिवसा तालुक्यात सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी झालेला आहे. तालुक्यातील भिवापूर, जळका व अमदोरी हे लघुप्रकल्प आताच पूर्णत: कोरडे पडले असताना, उजवा मुख्य कालव्याच्या किमी ४० मध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूला कोट्यवधी लिटर पाणी साचले. हे पावसाचे पाणी असल्याचा जावईशोध जलसंपदा विभागाने लावला आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात केवळ ४१ टक्केच साठा असल्याने अमरावतीला एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. रबीला पाणी मिळणार नाही, तर कपाशी व तूर पिकांसाठी केवळ पाण्याच्या दोन पाळ्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी एक पाळी सोडण्यात आली. आता तीन आठवड्यानंतर एक पाळी सोडण्यात येईल. त्यामुळे रबीचा गहू व हरभºयाला सिंचनासाठी पाणी मिळणार नाही, ही बाब स्पष्ट झालेली आहे.प्रकल्पाच्या उर्वरित पाण्याचे औद्योगिक व शहराच्या वापरासाठी आरक्षण झाले आहे. प्रकल्पाच्या पाण्याचा थेंब न थेब महत्त्वाचा असताना, पाळी सोडल्यानंतर जर लाखो लिटर पाणी वाया जात असेल, तर या विभागावर नियंत्रण कुणाचे, असा शेतकºयांचा संतप्त सवाल आहे. कालवा क्षतिग्रस्त झाल्यास पिकांसह लगतच्या वस्त्यांनाही धोका आहे. अशा स्थितीत कालव्याची आवश्यक ती दुरुस्ती करण्याऐवजी मूळ विषयाला बगल देण्याचा व वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल करण्याचा या विभागाचा प्रयत्न आहे.वास्तविक, या ठिकाणी गतवर्षीपासून कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाझर व सरळ विमोचकाच्या नादुरुस्तीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एप्रिलपर्यंत हीच स्थिती कायम होती, याविषयीचा अहवाल कार्यकारी अभियंता कार्यालयास सादर झालेला असताना थातूरमातूर दुरुस्तीवर बोळवण करण्यात आली. परिणामी यंदा कालव्यातून पाणी जायच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात उपअभियंत्याशी संपर्क केला असता, त्यांचा मोबाइल दोन दिवसांपासून ‘स्वीच आॅफ’ आहेत.मायनर बुजले झुडपांनीकालव्याचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी उखडले आहे. या भेगांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली असल्याने आधीच थातूरमातूर झालेले अस्तरीकरण उखडले आहे. परिणामी कालव्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मायनरमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याने पाणी ओसंडून मनमानी वाहते. त्यात झाडे उगविली असल्याने पाणी प्रवाह अडतो. कित्येक वर्षापासून दुरूस्तीच नसल्यामुळे या सर्व कामांचे व यावर खर्च झालेल्या निधीचे सोशल आॅडिट व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.कालव्यातून पाण्याचा अपव्यय झालेला नाही. कालवे निर्माण होत असताना कंत्राटदारांनी खड्डे केलेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांना अहवाल मागितला आहे.- रवींद्र लांडेकरमुख्य अभियंता, जलसंपदा