शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मेळघाटातील 'त्या' नऊ गावांची व्यथा संपता संपेना; स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही परिस्थिती जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:38 IST

सहा किलोमीटरसाठी ३२ किलोमीटरचा फेरा; वीज, पाणी केव्हा?

नरेंद्र जावरे  

परतवाडा (अमरावती) :मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही विकासाचा प्रकाश पोहोचला नसल्याचे वास्तव आहे. चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांची व्यथा प्रशासनालाही लाजीरवाणी ठरली आहे.

मेळघाटमधील अतिदुर्गम व जिल्ह्यातील कायम दुर्लक्षित भाग म्हणून गणला गेलेला एकताई परिसर विकासापासून कोसोदूर आहे. परिसरातील खुटिदा, सलिता, सुमिता, एकताई, भांडुम, बोरधा, टेम्बरू, पिपल्या, हिल्डा आदी गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. यापैकी अनेक गावांमध्ये डांबरी रस्ते, त्यावर पूल नाहीत.

आरोग्य सुविधेसाठी ग्राऊंड झिरोवर नियोजन हवे

एकताई परिसरातील नऊ गावे हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न आहेत. भौगोलिकदृष्ट्या हतरू पीएससीपासून या गावाचे अंतर सहा ते दहा किमीच्या आत आहे. मात्र, रस्तेच नसल्याने हतरू आरोग्य केंद्रात पोहोचण्यासाठी रुग्णांना राहू-कारंजखेडा-हतरू असा २५ ते ३० किमी असा उलट प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

होमिओपॅथिक दवाखाना बंदच

एकताई येथे आरोग्य विभागाने होमिओपॅथिक दवाखान्याची नवीन प्रशस्त इमारत बांधली. पण, मनुष्यबळ व सुविधा पुरविल्या नाहीत. आजपर्यंत आदिवासी रुग्णांसाठी हा दवाखाना बंद आहे.

पूल बांधण्यासाठी आठ कोटींची गरज

खुटिदा गावासाठी एकताई येथून प्रस्तावित पूल बांधण्यासाठी जवळपास आठ कोटी खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रस्तावसुद्धा तयार केला. मोठा निधी उपलब्ध होणे कठीण असल्याने उपविभागाच्या अभियंत्यांनी प्रस्तावात बदल करून खर्च निम्मा केला तरी निधी मिळाला नसल्याची खंत आहे.

तत्कालीन पालकमंत्र्यांचे लक्ष

तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटकडे सर्वाधिक लक्ष दिले. कोट्यवधीचा निधी दिला. विशेषतः अतिदुर्गम हतरू व जारिदा परिसराच्या ४२ गावांची विद्युत व्यवस्था ३३ केव्हीमध्ये रूपांतरित करण्यासह पुलासाठी प्रयत्न केले. कोरोना काळात खर्चात कपात सुरू असल्याने पुलाचे काम रखडले. आता शिंदे सरकारने त्यावर लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एकताई परिसरातील नऊ गावांचा आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने एकताई येथे आरोग्य केंद्र द्यावे. आरोग्य विभागाच्या निकषात बसत नसली तरी या इमारतीचा उपयोग व दुर्गम भाग असल्यामुळे मेळघाटकरिता ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी द्यावी

- पीयूष मालवीय, सदस्य, रुग्ण कल्याण समिती

टॅग्स :SocialसामाजिकTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाMelghatमेळघाटAmravatiअमरावती