शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मेळघाटातील 'त्या' नऊ गावांची व्यथा संपता संपेना; स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही परिस्थिती जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:38 IST

सहा किलोमीटरसाठी ३२ किलोमीटरचा फेरा; वीज, पाणी केव्हा?

नरेंद्र जावरे  

परतवाडा (अमरावती) :मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही विकासाचा प्रकाश पोहोचला नसल्याचे वास्तव आहे. चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांची व्यथा प्रशासनालाही लाजीरवाणी ठरली आहे.

मेळघाटमधील अतिदुर्गम व जिल्ह्यातील कायम दुर्लक्षित भाग म्हणून गणला गेलेला एकताई परिसर विकासापासून कोसोदूर आहे. परिसरातील खुटिदा, सलिता, सुमिता, एकताई, भांडुम, बोरधा, टेम्बरू, पिपल्या, हिल्डा आदी गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. यापैकी अनेक गावांमध्ये डांबरी रस्ते, त्यावर पूल नाहीत.

आरोग्य सुविधेसाठी ग्राऊंड झिरोवर नियोजन हवे

एकताई परिसरातील नऊ गावे हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न आहेत. भौगोलिकदृष्ट्या हतरू पीएससीपासून या गावाचे अंतर सहा ते दहा किमीच्या आत आहे. मात्र, रस्तेच नसल्याने हतरू आरोग्य केंद्रात पोहोचण्यासाठी रुग्णांना राहू-कारंजखेडा-हतरू असा २५ ते ३० किमी असा उलट प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

होमिओपॅथिक दवाखाना बंदच

एकताई येथे आरोग्य विभागाने होमिओपॅथिक दवाखान्याची नवीन प्रशस्त इमारत बांधली. पण, मनुष्यबळ व सुविधा पुरविल्या नाहीत. आजपर्यंत आदिवासी रुग्णांसाठी हा दवाखाना बंद आहे.

पूल बांधण्यासाठी आठ कोटींची गरज

खुटिदा गावासाठी एकताई येथून प्रस्तावित पूल बांधण्यासाठी जवळपास आठ कोटी खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रस्तावसुद्धा तयार केला. मोठा निधी उपलब्ध होणे कठीण असल्याने उपविभागाच्या अभियंत्यांनी प्रस्तावात बदल करून खर्च निम्मा केला तरी निधी मिळाला नसल्याची खंत आहे.

तत्कालीन पालकमंत्र्यांचे लक्ष

तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटकडे सर्वाधिक लक्ष दिले. कोट्यवधीचा निधी दिला. विशेषतः अतिदुर्गम हतरू व जारिदा परिसराच्या ४२ गावांची विद्युत व्यवस्था ३३ केव्हीमध्ये रूपांतरित करण्यासह पुलासाठी प्रयत्न केले. कोरोना काळात खर्चात कपात सुरू असल्याने पुलाचे काम रखडले. आता शिंदे सरकारने त्यावर लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एकताई परिसरातील नऊ गावांचा आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने एकताई येथे आरोग्य केंद्र द्यावे. आरोग्य विभागाच्या निकषात बसत नसली तरी या इमारतीचा उपयोग व दुर्गम भाग असल्यामुळे मेळघाटकरिता ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी द्यावी

- पीयूष मालवीय, सदस्य, रुग्ण कल्याण समिती

टॅग्स :SocialसामाजिकTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाMelghatमेळघाटAmravatiअमरावती