शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

मास्क नाही, काढा उठाबशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 5:00 AM

देशभर लॉकडाऊन आहे. घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आवश्यक कामासाठीच बाहेर निघण्याची मुभा संचारबंदीच्या काळात देण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे करण्यात आले, ही सुरक्षा नागरिकांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी असतानाही परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरातील काही नागरिक काही ऐकच नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देवाहनांची काढली हवा : वारंवार सांगूनही नागरिक ऐकेना, नगरपालिका प्रशासन सक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जगावर कोरोनाचे भयंकर संकट ओढावले असताना जुळ्या शहरातील नागरिक सुरक्षिततेसंबंधी उपाययोजनांवर अंमल करण्याच्या स्थितीत नाहीत. तोंडाला मास्क न बांधणाऱ्यांना सोमवारी अचलपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सक्त होत प्रत्येकी शंभर उठाबशा आठवडी बाजारातच काढायला लावल्या. यात जवळपास २० नागरिक सहभागी झाले. अकारण बाहेर फिरणाºया काही नागरिकांच्या वाहनांच्या चाकाची हवा सोडण्यात आलीदेशभर लॉकडाऊन आहे. घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आवश्यक कामासाठीच बाहेर निघण्याची मुभा संचारबंदीच्या काळात देण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे करण्यात आले, ही सुरक्षा नागरिकांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी असतानाही परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरातील काही नागरिक काही ऐकच नसल्याचे चित्र आहे. त्यावर आता अचलपूर नगरपालिकेने सोमवारी सकाळी आठवडी बाजारातील परिसरात तोंडाला मास्क न बांधणाऱ्यां नागरिकांना उठाबशा काढायला लावल्या. पथकात अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, बांधकाम अभीयंता रमेश तायडे, आरोग्य विभागाचे जहीर, पाणीपुरवठ्याचे पोटे यांच्यासह कर निरीक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी प्रसाद दिला, तर कुठे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले. महसूल, नगरपालिका, पोलीस प्रशासनाच्यावतीने रात्रंदिवस घराबाहेर न निघण्याच्या सूचना मोबाइल, लाऊडस्पीकर अशा विविध माध्यमांतून दिल्या जात आहेत. तरीसुद्धा नागरिक कशाचीच भीती न बाळगता सूचनांचे पालन करता दिसत नाहीत.नेहमीप्रमाणे फिरत असल्याचे चित्र संचारबंदी काळात आहे. सर्वसामान्य नागरिकांना औषधे, किराणा, भाजी खरेदीसाठी दिलेली सूट मोजक्या टवाळखोरांमुळे सर्वांना वेठीस धरणारी ठरली आहे. अचलपूर नगरपालिका पथकामार्फत परतवाडा शहरातील सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या.बँकांसमोर वाहने लावून लोकांना उभे राहण्यास अडचण निर्माण करणाऱ्या वाहनांचीसुद्धा हवा सोडण्यात आली.सूचना संपल्या; आता आर्थिक दंडवारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने अचलपूर नगरपालिकेच्या कोरोनाविरोधी पथकाने आता यापुढे आर्थिक दंड आकारणीसुद्धा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यानुसार आता दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस