शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

संचारबंदीत नऊ तासांची शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

शहरात झालेल्या दंगलीच्या संदर्भाने खोटे मॅसेज किंवा अफवा सोशल मीडियावर पसरविण्यास, तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यास व ग्रुप ॲडमिनला प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे कृत्य केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपी व एसीपीद्वय फ्रंटफूटवर खेळत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शनिवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून लागू केलेली इंटरनेट बंदी १९ रोजी दुपारी ३ वाजता संपुष्टात आली. संचारबंदीत सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ९ पर्यंत संचारबंदी ‘जैसे थे’ असेल.   पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शुक्रवारी हे आदेश पारित केले. बँक, शासकीय कार्यालये, जीवनावश्यक वस्तू, कृषी केंद्र,  विद्यार्थ्यांसाठी हा हितकारी निर्णय घेण्यात आला. दरम्यान, इंटरनेट सेवा पूर्ववत झाल्याने अमरावतीकरांचा जीव भांड्यात पडला आहे. शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली असली तरी आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती, धर्म, पंथ, अशांच्या भावना दुखावल्यास समाजात तणाव निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती पोस्ट करणाऱ्या इसमास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शुक्रवारी पारित केले आहेत. दरम्यान, आतापयर्यंत २९८ आरोपींना अटक करण्यात आली असून दाखल गुन्ह्यांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर  व्हॉटस्ॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या समाज माध्यमांवर व्यक्त होतानाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी आयुक्तालय क्षेत्रात सोशल माॅनिटरिंग सेल’ स्थापन करण्यात आला आहे. शहरात झालेल्या दंगलीच्या संदर्भाने खोटे मॅसेज किंवा अफवा सोशल मीडियावर पसरविण्यास, तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यास व ग्रुप ॲडमिनला प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे कृत्य केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपी व एसीपीद्वय फ्रंटफूटवर खेळत आहेत. नागपुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम, गाडगेनगरचे आसाराम चोरमले व खोलापुरी गेटचे पंकज तामटे हे रात्रीचा दिवस करीत आहेत. दररोज  ठाणेदार जागत आहेत. त्यात सहायक पोलीस आयुक्तद्वय पूनम पाटील व भारत गायकवाड हेदेखील तसूभरही कमी नाहीत. ते ‘२४ बाय ७ ऑन फिल्ड’ आहेत. 

यांनीही सांभाळली धुरावरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटेंकडे आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी असली तरी त्यांच्यातील अनुभव हेरून त्यांनादेखील फ्रंटफूटवर उतरविण्यात आले. सोबतीला शहरातील गुन्ह्यातील गुन्हेगारांची खडानखडा माहिती असणाऱ्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनादेखील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. दोन्ही डीसीपीदेखील अतिसंवेदनशील व संवेदनशील अशा स्थळांसह नजर रोखून आहेत. शहरात इंटरनेट बंदी असली तरी अनेक ठिकाणी ते सुरू असल्याने कुणी आक्षेपार्ह संदेश व्हायरल तर करीत नाही ना, यावर सायबर ठाणेप्रमुख सीमा दाताळकर, एपीआय रवींद्र सहारे हे लक्ष ठेवून आहेत.

गंभीर गुन्ह्यांची नोंदआरोपींच्या अटकेपूर्वी सूक्ष्म परिस्थितीजन्य पुरावे एकत्र केले जात आहेत. त्यामुळेच १३ नोव्हेंबर रोजी झालेली जाळपोळ, दगडफेक, चिथावणीखोर वक्तव्य व हिंसाचारापोटी १८ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अव्याहत सुरू आहे. आंदोलक व हल्लेखोरांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने हजारो जणांनी शहरातून पळ काढला आहे. अटकसत्रात सबब अडचणी निर्माण होत आहेत.

'ओन्ली ॲडमिन'पुढील काही दिवसांकरिता व्हॉटस्ॲप ग्रुप ॲडमिननी ‘ओन्ली ॲडमिन’ अशी सेटिंग करावी तथा सजग राहून शहरात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया