शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

मेडिकल व्यावसायिक हत्येच्या तपासासाठी ‘एनआयए’चे पथक अमरावतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:47 IST

‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले.

ठळक मुद्देपोलिसांकडून जाणून घेतली स्थिती : घटनास्थळाची पाहणी

अमरावती : गेल्या २१ जून रोजी गळा कापून झालेल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील ‘फॅक्ट’ शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या एनआयएची चार ते पाच सदस्यीय चमू अमरावतीत दाखल झाल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून संबंधितांकडून त्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली तथा अटक आरोपींचीही झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्याला अधिकृत दुजोरा दिला नाही.

‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले. येथील उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नूपुर शर्मा वादाशी संबंधित आहे का, याचा काटेकोर तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी तपासही केला. मात्र, कोल्हे यांच्या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध नसल्याचा निर्वाळा अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिला.

अमरावतीत हत्येचा थरार! मुलगा, सुनेसमोर मेडिकल स्टोअर संचालकाचा गळा चिरला

या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेपासून दूर असलेला सहावा आरोपीच या संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार आहे. त्यानेच आपल्याला कामे वाटून दिल्याची कबुली अन्य आरोपींनी दिली. शुक्रवारी एनआयएच्या नागपूरस्थित कार्यालयाची एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चमू पोहोचली. दरम्यान, या घटनेचा तपास एनआयएकडे सोपविला गेलेला नाही. मात्र, ती केवळ फॅक्ट फाइंडिंगसाठी आल्याचे एका अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.

...तर सत्यता पुढे येईल : खासदार डॉ. अनिल बोंंडे

येथील मेडिकल व्यवसायी उमेश कोल्हे यांचा खून झाला. यामागे बरेच काही दडले आहे. विशिष्ट प्रवृत्ती यामागे सूत्रधार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ने करावा, अशी मागणी केली होती. ती शासनाने मान्य केली असून, तपास चमू अमरावती येथे पोहोचल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच कोल्हे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आता एनआयएच्या माध्यमातून तपास झाला तर कोल्हे कुटुंबीयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीAnil Bondeअनिल बोंडेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा