शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मेडिकल व्यावसायिक हत्येच्या तपासासाठी ‘एनआयए’चे पथक अमरावतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:47 IST

‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले.

ठळक मुद्देपोलिसांकडून जाणून घेतली स्थिती : घटनास्थळाची पाहणी

अमरावती : गेल्या २१ जून रोजी गळा कापून झालेल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील ‘फॅक्ट’ शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या एनआयएची चार ते पाच सदस्यीय चमू अमरावतीत दाखल झाल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून संबंधितांकडून त्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली तथा अटक आरोपींचीही झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्याला अधिकृत दुजोरा दिला नाही.

‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले. येथील उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नूपुर शर्मा वादाशी संबंधित आहे का, याचा काटेकोर तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी तपासही केला. मात्र, कोल्हे यांच्या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध नसल्याचा निर्वाळा अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिला.

अमरावतीत हत्येचा थरार! मुलगा, सुनेसमोर मेडिकल स्टोअर संचालकाचा गळा चिरला

या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेपासून दूर असलेला सहावा आरोपीच या संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार आहे. त्यानेच आपल्याला कामे वाटून दिल्याची कबुली अन्य आरोपींनी दिली. शुक्रवारी एनआयएच्या नागपूरस्थित कार्यालयाची एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चमू पोहोचली. दरम्यान, या घटनेचा तपास एनआयएकडे सोपविला गेलेला नाही. मात्र, ती केवळ फॅक्ट फाइंडिंगसाठी आल्याचे एका अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.

...तर सत्यता पुढे येईल : खासदार डॉ. अनिल बोंंडे

येथील मेडिकल व्यवसायी उमेश कोल्हे यांचा खून झाला. यामागे बरेच काही दडले आहे. विशिष्ट प्रवृत्ती यामागे सूत्रधार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ने करावा, अशी मागणी केली होती. ती शासनाने मान्य केली असून, तपास चमू अमरावती येथे पोहोचल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच कोल्हे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आता एनआयएच्या माध्यमातून तपास झाला तर कोल्हे कुटुंबीयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीAnil Bondeअनिल बोंडेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा