शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोड ढाब्यावर तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:01 IST

हॉटेल बंद असल्याने जेवण देता येणार नाही, असे म्हटल्याने त्या दोघांनी बिरे यांच्याशी वाद घातला. प्रसाद देशमुख व हॉटेलमधील वेटर दीपक आठवले हे वाद सोडविण्याकरिता गेले असता, दोनपैकी एका आरोपीने प्रसादच्या डाव्या मांडीवर चाकूने वार केला.  त्यातसमीर देशमुख व आठवलेदेखील जखमी झाले.  घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री प्रसादचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ढाबा बंद असताना भोजनाचा आग्रह धरणाऱ्या दोन आरोपींनी २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली.  रिंग रोडवरील एका ढाबा परिसरात २३ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद विनोद देशमुख (२४, रा. पंजाबराव देशमुख कॉलनी, व्हीएमव्ही रोड) असे मृताचे नाव आहे. या घटनेत समीर रत्नाकर देशमुख (५०, रा. विद्युतनगर) व दीपक आठवले (२८, रा. महाजनपुरा) हे जखमी झाले. याप्रकरणी २४ जुलै रोजी आरोपी सिद्धांत गुलाबराव वानखडे (२३) व संकेत गोवर्धन वानखडे (२२, दोघेही रा. शेगाव, अमरावती) यांना अटक करण्यात आली.  त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. समीर देशमुख यांनी याबाबत तक्रार नोंदविली. त्यानुसार, समीर व प्रसाद हे कठोरा रिंग रोडवरील एका ढाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करण्यास गेले. मात्र, ढाबा बंद असल्याने या दोघांनी संचालक शेखर बिरे यांना हॉटेलवर बोलावून घेतले. बिरे आल्यानंतर त्यांच्याशी बोलत असताना दोन अनोळखी इसम हॉटेलमध्ये आले व त्यांनी बिरे यांना जेवण मागितले. हॉटेल बंद असल्याने जेवण देता येणार नाही, असे म्हटल्याने त्या दोघांनी बिरे यांच्याशी वाद घातला. प्रसाद देशमुख व हॉटेलमधील वेटर दीपक आठवले हे वाद सोडविण्याकरिता गेले असता, दोनपैकी एका आरोपीने प्रसादच्या डाव्या मांडीवर चाकूने वार केला.  त्यातसमीर देशमुख व आठवलेदेखील जखमी झाले.  घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री प्रसादचा मृत्यू झाला. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शहरात रात्री १० ते ११ वाजेपर्यंत ढाबे सुरू राहतात अन् तेथे भोजन दिले जाते कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठाणेदार मुख्यालयातढाबा परिसरात उशिरा जेवणाच्या वादातून खून झाल्याने नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना तडकाफडकी मुख्यालयाशी संलग्न केले, तर बिट इंचार्ज सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चाैखट यांना निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी ही कारवाई केली. ठाणेदारपदाचा प्रभार गोरखनाथ गांगुर्डे यांना दिला आहे. 

ढाबा परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ठाणेदारांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. बिट इंचार्ज असलेल्या एएसआयला निलंबित करण्यात आले. - आरती सिंह, पोलीस आयुक्त

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस