शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Kerala Floods: केरळच्या मदतीसाठी खासदारांना एक कोटींच्या निधीची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:23 IST

Kerala Floods: केरळमध्ये आलेला महापूर आणि भूस्खलनानंतरच्या बिकट स्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच खासदारांकडून एक कोटींचा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 - गणेश वासनिक 

अमरावती - केरळमध्ये आलेला महापूर आणि भूस्खलनानंतरच्या बिकट स्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच खासदारांकडून एक कोटींचा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागाचे मंत्री डी.वी.सदानंद गौडा यांनी २४ आॅगस्ट रोजी खासदारांना पत्र पाठविले आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने केरळ येथे उद्भवलेल्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी संसद सदस्य स्थानिक क्षेत्रविकास योजना (एमपीलॅण्डस) राज्यसभा समितीची बैठक घेतली. मुसळधार पाऊस व पुरामुळे प्रचंड वित्त व जिवितहानी केरळ राज्याला सोसावी लागली. परिणामी केंद्र सरकारकडून केरळचा महापूर ‘भीषण नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्यात आली. त्यामुळे एमपीलॅण्डस दिशा निर्देशाच्या अनुक्रमांक २.८ अन्वये देशाच्या कोणत्याही भागात ‘भीषण नैसर्गिक आपत्ती’ स्थिती आल्यास खासदारांना त्यांच्या निधीतून प्रभावित जिल्ह्यांसाठी कमीतकमी एक कोटी निधीची विकासकामे प्रस्तावित करता येते. त्याअनुषंगाने ना. डी.वी. सदानंद गौडा यांनी लोकसभा व राज्यसभा सदस्यांना पत्र पाठवून केरळच्या पुनर्वसनासाठी मदतीची हाक दिली आहे. खासदारांनी एमपीलॅण्डसमधून एक कोटी रुपयांचा निधी वापराचे सहमतीपत्र देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. निधी वापराचे नाहरकत                                                                             पत्र खासदारांनी आॅनलाईन देण्याच्या सूचना आहे. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने केरळच्या मदतीसाठी एमपीलॅण्डस निधीबाबतची माहिती संबंधित जिल्हाधिकाºयांकडून घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. आॅगस्टअखेरपर्यंत व्यक्ती, संस्थांकडून केरळसाठी रोख व वस्तुरूपात ५३७ कोटींची मदत झाली आहे. राज्यसभेचे २५०, तर लोकसभेचे ५४५ सदस्यांकडून निधी मागितला आहे. खासदारांना मेल अथवा संपर्क साधून निधी मान्यतेचे पत्र मिळविले जात आहे.

केंद्र सरकारकडे २६०० कोटींची मागणीकेरळ राज्यात पूर आणि पावसाने २० हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ३० आॅगस्ट रोजी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेऊन नैसर्गिक आपत्तीवर चर्चा केली. केरळला नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारकडे २६०० कोटी रूपयांचे विशेष आर्थिक साहाय्य मागण्यात आले आहे.           

केरळचे संकट हे दुर्देवी आहे. मात्र, महाराष्ट्रात काही वर्षांपासून अस्मानी संकट, सततच्या नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केरळच्या धर्तीवर राज्याच्या शेतकºयांसाठी विशेष पॅकेज द्यावे. अद्यापही शेतकरी कर्जमुक्त झाला नसून, त्याकरिता सकारात्मक निर्णय व्हावा.- आनंदराव अडसूळ,खासदार, अमरावती

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर