शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Floods: केरळच्या मदतीसाठी खासदारांना एक कोटींच्या निधीची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:23 IST

Kerala Floods: केरळमध्ये आलेला महापूर आणि भूस्खलनानंतरच्या बिकट स्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच खासदारांकडून एक कोटींचा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 - गणेश वासनिक 

अमरावती - केरळमध्ये आलेला महापूर आणि भूस्खलनानंतरच्या बिकट स्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच खासदारांकडून एक कोटींचा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागाचे मंत्री डी.वी.सदानंद गौडा यांनी २४ आॅगस्ट रोजी खासदारांना पत्र पाठविले आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने केरळ येथे उद्भवलेल्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी संसद सदस्य स्थानिक क्षेत्रविकास योजना (एमपीलॅण्डस) राज्यसभा समितीची बैठक घेतली. मुसळधार पाऊस व पुरामुळे प्रचंड वित्त व जिवितहानी केरळ राज्याला सोसावी लागली. परिणामी केंद्र सरकारकडून केरळचा महापूर ‘भीषण नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्यात आली. त्यामुळे एमपीलॅण्डस दिशा निर्देशाच्या अनुक्रमांक २.८ अन्वये देशाच्या कोणत्याही भागात ‘भीषण नैसर्गिक आपत्ती’ स्थिती आल्यास खासदारांना त्यांच्या निधीतून प्रभावित जिल्ह्यांसाठी कमीतकमी एक कोटी निधीची विकासकामे प्रस्तावित करता येते. त्याअनुषंगाने ना. डी.वी. सदानंद गौडा यांनी लोकसभा व राज्यसभा सदस्यांना पत्र पाठवून केरळच्या पुनर्वसनासाठी मदतीची हाक दिली आहे. खासदारांनी एमपीलॅण्डसमधून एक कोटी रुपयांचा निधी वापराचे सहमतीपत्र देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. निधी वापराचे नाहरकत                                                                             पत्र खासदारांनी आॅनलाईन देण्याच्या सूचना आहे. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने केरळच्या मदतीसाठी एमपीलॅण्डस निधीबाबतची माहिती संबंधित जिल्हाधिकाºयांकडून घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. आॅगस्टअखेरपर्यंत व्यक्ती, संस्थांकडून केरळसाठी रोख व वस्तुरूपात ५३७ कोटींची मदत झाली आहे. राज्यसभेचे २५०, तर लोकसभेचे ५४५ सदस्यांकडून निधी मागितला आहे. खासदारांना मेल अथवा संपर्क साधून निधी मान्यतेचे पत्र मिळविले जात आहे.

केंद्र सरकारकडे २६०० कोटींची मागणीकेरळ राज्यात पूर आणि पावसाने २० हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ३० आॅगस्ट रोजी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेऊन नैसर्गिक आपत्तीवर चर्चा केली. केरळला नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारकडे २६०० कोटी रूपयांचे विशेष आर्थिक साहाय्य मागण्यात आले आहे.           

केरळचे संकट हे दुर्देवी आहे. मात्र, महाराष्ट्रात काही वर्षांपासून अस्मानी संकट, सततच्या नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केरळच्या धर्तीवर राज्याच्या शेतकºयांसाठी विशेष पॅकेज द्यावे. अद्यापही शेतकरी कर्जमुक्त झाला नसून, त्याकरिता सकारात्मक निर्णय व्हावा.- आनंदराव अडसूळ,खासदार, अमरावती

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर