शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

'...तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू'; रवी राणा यांनी लोकसभेवरुन बजावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:49 IST

बच्चू कडूंच्या विधानावर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

सध्या आम्ही कोणाच्याही बाजुने नाही आहोत. आमच्या पक्षाला राजकीय ताकद जिथून मिळेल त्याचा आम्ही विचार करणार, असल्याचं ठाकरे सरकारमधील माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटासोबत असलेल्या बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. 

महायुतीत अमरावतीची जागा आम्हाला हवी आहे, असे सांगताना अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी हवे तर प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. अकोला, अमरावतीसह तीन जागा आम्हाला हव्या आहेत, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडूंच्या या विधानावर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे एकमेव आमदार वेगळ्या वाटेवर, कारण त्यांना प्रहारवर विजयी होणार याची शाश्वती नाही, असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे. तसेच बच्चू कडू महायुती धर्म पाळावा लागेल. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी मदत केली. तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू, असं सांगत लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी राजकारण केल्यास त्याचे परिणाम होतील, असा इशारा देखील रवी राणा यांनी दिला आहे.

विधानसभेला १५ जागांवर लढणार- बच्चू कडू

लोकसभेला ३ आणि विधानसभेला १५ जागांवर लढणार आहोत. येत्या १५ जानेवारीनंतर बैठक घेऊन पुढील भुमिका मांडू असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न करणे म्हणजे आगीत उडी घेतल्यासारखे झाले आहे. शिपायाला, हॅाटेलमध्ये काम करणाऱ्यांना मुली देतात. पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पॅकेज देऊन काही उपयोग नाही, कायमस्वरुपी तोडगा हवाय. या साऱ्याला सरकार जबाबदार आहे, असा आरोपही कडू यांनी शिंदे सरकारवर केला आहे.  

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाElectionनिवडणूक