शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'...तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू'; रवी राणा यांनी लोकसभेवरुन बजावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:49 IST

बच्चू कडूंच्या विधानावर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

सध्या आम्ही कोणाच्याही बाजुने नाही आहोत. आमच्या पक्षाला राजकीय ताकद जिथून मिळेल त्याचा आम्ही विचार करणार, असल्याचं ठाकरे सरकारमधील माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटासोबत असलेल्या बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. 

महायुतीत अमरावतीची जागा आम्हाला हवी आहे, असे सांगताना अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी हवे तर प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. अकोला, अमरावतीसह तीन जागा आम्हाला हव्या आहेत, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडूंच्या या विधानावर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे एकमेव आमदार वेगळ्या वाटेवर, कारण त्यांना प्रहारवर विजयी होणार याची शाश्वती नाही, असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे. तसेच बच्चू कडू महायुती धर्म पाळावा लागेल. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी मदत केली. तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू, असं सांगत लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी राजकारण केल्यास त्याचे परिणाम होतील, असा इशारा देखील रवी राणा यांनी दिला आहे.

विधानसभेला १५ जागांवर लढणार- बच्चू कडू

लोकसभेला ३ आणि विधानसभेला १५ जागांवर लढणार आहोत. येत्या १५ जानेवारीनंतर बैठक घेऊन पुढील भुमिका मांडू असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न करणे म्हणजे आगीत उडी घेतल्यासारखे झाले आहे. शिपायाला, हॅाटेलमध्ये काम करणाऱ्यांना मुली देतात. पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पॅकेज देऊन काही उपयोग नाही, कायमस्वरुपी तोडगा हवाय. या साऱ्याला सरकार जबाबदार आहे, असा आरोपही कडू यांनी शिंदे सरकारवर केला आहे.  

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाElectionनिवडणूक