शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

तर  मंत्रालयात, कृषी सचिवांच्या कार्यालयात 'फवारणी'करू - आ. बच्चू कडू यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:52 IST

शेतीतील पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या २० शेतकरी,शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला,७०० ते ८०० शेतकरी,शेतमजुरांना विषबाधा झाली,अनेक अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.

यवतमाळ  -  शेतीतील पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या २० शेतकरी,शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला,७०० ते ८०० शेतकरी,शेतमजुरांना विषबाधा झाली,अनेक अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.या अवस्थेत मृतकांच्या कुटूंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची सरकारने तातडीने मदत करावी, विषबाधा झालेल्याना प्रत्येकी १ लाख रुपये सानुग्रह मदत करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केली. जर शासन मदत करत नसेल तर मंत्रालयातील कृषी सचिवांच्या कार्यालयात आपण त्यात कीटकनाशकांची फवारणी करू असा इशारा त्यांनी दिला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.दि.२ ऑक्टोबर रोजी आ. बच्चूभाऊ कडू यांनी यवतमाळ येथे येऊन विषबाधा झालेल्या शेतकरी,शेतमजुरांच्या प्रकृतीची यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयात विचारपूस केली केली. रात्री ८ वाजता च्या सुमारास आमदार कडू जिल्हा रुग्णालयात पोहचले त्यानी उपचार घेत असलेल्या शेतकरी,शेतमजुरांच्या प्रकृतीची विचारपूस करून उपस्थित डॉक्टर कडून या संदर्भात माहिती घेतली.शेकडो रुग्ण विषबाधित झाल्या नंतर सुद्धा गरीब रुग्णांना 'बाहेरन औषध'आणावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या सोबत प्रहार चे महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे यवतमाळ जिल्हाप्रमुख नितीन मिर्झापुरे,विलास पवार,जिल्हासंपर्क प्रमुख आशिष तुपटकर,उपजिल्हाप्रमुख नितीन महल्ले,चंद्रकांत बोरले,आकाश चिंचोळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार बच्चूभाऊ कडू यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देण्यापूर्वी घाटंजी तालुक्यातील आकपुरी येथील आत्महत्याग्रस्त दोन शेतकरी कुटुंबास भेट देऊन सांत्वन केले. त्या नंतर टिटवी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास भेट दिली. 

सरकार 'मरणात'सुद्धा भेदभाव करत आहे 

मुंबईत रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला ते सर्व कस्टकरी होते. त्यांना राज्य सरकारने तातडीने ५ लाख रुपयांची व रेल्वे प्रशासनाने ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली.  तर दुसरी कडे यवतमाळ जिल्ह्यात कस्टकरी शेतकरी व शेतमजुरांच्या जीवाचे मोल सरकारला का कळत नाही..?शेतातील पिकं वाचविण्यासाठी कीटकनाशक फवारणी करणारे २० अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर आपला जीव गमावतात शेकडो शेतकरी, मजूर मृत्यूशी झुंज देत आहेत मात्र सरकार व जिल्हाप्रशासन पाहू,चौकशी करू अशा थापा मारण्यात वेळ घालवत आहे. शहरी व ग्रामीण असा भेद करणाऱ्या सरकारने कस्टकरी माणसांच्या मरणात सुद्धा भेद करत असल्याचा आरोप बच्चूभाऊ कडू यांनी केला. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार