शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पुरुष माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:14 IST

महाराष्ट्र शासनाने कुटुंब कल्याण योजना ५० वर्षांपासून अंमलात आणलेली आहे. यात पुरुषांनी सहभाग नोंदवावा म्हणून काही प्रमाणात लाभाचीदेखील तरतूद ...

महाराष्ट्र शासनाने कुटुंब कल्याण योजना ५० वर्षांपासून अंमलात आणलेली आहे. यात पुरुषांनी सहभाग नोंदवावा म्हणून काही प्रमाणात लाभाचीदेखील तरतूद केलेली आहे. स्त्रीयांऐवजी पुरुषांनी शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजनास मदत व्हावी, हा यामागील उद्देश आहे. मात्र, अलीकडे पुरुषांनी या शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सन २०-२१ ७३ पुरुषांनीच ही शस्त्रक्रिया केल्याचे जिल्हा परिषदेच्या दफ्तरी नोंद आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागात ८८५ आणि शहरी भागात १९६ पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु ग्रामीण भागात ६५, तर शहरी भागात केवळ ८ पुरुषांनी वर्षभरात ही शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. स्त्रीयांना १२९९७ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. यात ग्रामीण भागात १०६०५ आणि शहरी भागात १४२९ शस्त्रक्रिया अपेक्षित होत्या. मात्र, एप्रिल ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ग्रामीण भागात ९६२, तर शहरी भागात २३९१ स्त्रीयांची शस्त्रक्रिया आटोपली. याची टक्केवारी १८.४० इतकी आहे. ८७ बिनटाका शस्त्रक्रिया झालेल्या आहे. टाका ॲब्डोमिनलच्या २२३१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. याची टक्केवारी १८.७२ इतकी आहे. अनावश्यक गर्भधारणा रोखण्याकरिता पर्यायी व्यवस्था म्हणून तांबीचा वापर वाढला. त्यामुळे आता कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

बॉक्स

तालुकानिहाय शस्त्रक्रिया

तालुका उद्दिष्ट प्रगतीपर टक्केवारी

वरूड ११७७ ४५० ३८.२

चिखलदरा ६४९ २३८ ३६.५

अचलपूर १६४५ ५८५ ३५.६

धारणी ११८९ २३३ १९.६

मोर्शी १०४२ १८४ १७.७

नांदगाव ७९५ १३९ १७.५

भातकुली ६८१ ११९ १७.५

धामणगाव ७६६ १२० १५.७

दर्यापूर ९६० १२० १२.५

अमरावती ७६९ ७१ ९.२

तिवसा ७३६ ४८ ६.५

चांदूर बाजार ११०५ ५५ ५.०

चांदूर रेल्वे ५२५ १५ २.९

अंजनगाव ९५८ १५ १.६

अमरावती जिल्हा १२९९७ २३९१ १८.४

--------

सन २०१९ मध्ये

उद्दिष्ट १२९९२

शस्त्रक्रिया ५१५७

सन २०२० मध्ये

उद्दिष्ट १२९९७

शस्त्रक्रिया २३९१

कोट

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्जनद्वारा केल्या जातात. यासाठी नियोजित शिबिराचे आयोजन केले जातात. मात्र यंदा कोरोनामुळे शक्य तितकेच शिबिर घेता आले. त्यामुळे उद्दिष्ट गाठता आले नाही.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी.